शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
2
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
3
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
4
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
5
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
6
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
7
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
8
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
9
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
10
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
11
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
12
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
13
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
15
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
16
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
17
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
18
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
19
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
20
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ

२२०० बालके डायरीयाने बाधित

By admin | Updated: August 17, 2014 23:45 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने राबविलेल्या अतिसार नियंत्रण सप्ताहात जिल्ह्यात २ हजार १७९ बालके डायरीयाचे शिकार झाल्याचे आढळून आले आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने राबविलेल्या अतिसार नियंत्रण सप्ताहात जिल्ह्यात २ हजार १७९ बालके डायरीयाचे शिकार झाल्याचे आढळून आले आहे. यात १९५ बालकांना जलशुष्कतेची बाधा झाली असून या सर्व बालकांवर उपचार सुरू आहेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५० हजार ओआरएस पाकिटांचे वाटप करण्यात आले आहे. देशात अतिसार या आजारामुळे दरवर्षी ११ टक्के बालकांचा मृत्यू होतो. यामुळे केंद्र सरकारने प्रत्येक राज्यात अतिसार नियंंत्रण पंधरवाडा कार्यक्रम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने प्रत्येक जिल्हा परिषदेला अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यास सांगितले. जिल्ह्यात ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गंत येणाऱ्या गावात तीन हजार आशा स्वयंसेविकांना जिल्हास्तरावर प्रशिक्षण दिले. त्यानंतर त्यांनी जिल्हाभर गृहभेटी देत पाच वर्षाखालील बालकांची तपासणी केली. यात २ लाख ६ हजार ९७ बालकांपैकी २ हजार १७९ बालके अतिसारग्रस्त आढळून आली. या बालकांवर घरगुती जलसंजीवनी, ओआरएस पावडर आणि झिंक गोळ्याव्दारे उपचार केले. १९५ बालके जलशुष्कतेची बाधा झालेली असल्याचे आढळून आले. जिल्ह्यात सुदैवाने अतिसारामुळे एकही बळी गेला नसला तरी डायरीयाग्रस्तांची संख्या मोठी असल्याने आरोग्य विभागाने काळजी व्यक्त केली आहे. यासाठी ५० हजार ओआरएस पाकिटांचे आणि ५० हजार ३२३ झिंक गोळ्यांचे वाटप केले. (प्रतिनिधी)या कार्यक्रमाला ३१ तारखेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. डायरीयाग्रस्तांवर उपचार सुरू करण्यात आले असून त्यांना सलग १४ दिवस ओआरएस सोबत झिंक औषध देण्यात येत आहे. प्रामुख्याने दूषित पाण्यामुळे आणि अस्वच्छतेमुळे हा आजार होतो. पिण्याचे पाणी शुध्द आहे की नाही, याची खात्री आवश्यक आहे.- पी. बी. गांडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी.