शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

घोसपुरीत वीज पडून १४ शेळ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:19 IST

केडगाव (जि. अहमदनगर) : नगर तालुक्यातील घोसपुरी येथे सोमवारी दुपारी वीज पडून दोन शेतकऱ्यांच्या १४ शेळ्यांचा मृत्यू झाला. ...

केडगाव (जि. अहमदनगर) : नगर तालुक्यातील घोसपुरी येथे सोमवारी दुपारी वीज पडून दोन शेतकऱ्यांच्या १४ शेळ्यांचा मृत्यू झाला. प्रशासनाने पंचनामा केला असून, शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

नगर तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. अनेक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरीही लावली. काही गावात जोराचा वारा वाहत आहे. घोसपुरीतील बाळासाहेब दातीर व भगवान बुलाखे हे आपल्या शेळ्या चारण्यासाठी माळरानावर गेले होते. दुपारी दोनच्या सुमारास विजांचा कडकडाट सुरू झाला. वीज शेळ्यांवर पडल्याने या दोन्हीही शेतकऱ्यांच्या मिळून १४ शेळ्या जागेवरच मृत्युमुखी पडल्या. दातीर व बुलाखे हे दोघेही शेळ्या पालन करून आपला उदरनिर्वाह करतात. जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी प्रशासनाला याची माहिती दिल्याने तलाठी व पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी मृत शेळ्यांचा पंचनामा केला. या दोन्ही शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.