शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

१२ लाख विद्यार्थ्यांना वाटप होणार जंतनाशक गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:25 IST

कुपोषण, रक्ताक्षय आणि जंतापासून उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे जंतनाशक मोहीम राबविण्यात येते. १ ते १८ वर्षे वयोगटापर्यंत ...

कुपोषण, रक्ताक्षय आणि जंतापासून उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे जंतनाशक मोहीम राबविण्यात येते. १ ते १८ वर्षे वयोगटापर्यंत मुला-मुलींना दरवर्षी शाळेत जंतनाशक गोळीचे वाटप केले जाते. गतवर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शाळा बंदच आहेत. जे वर्ग बंद आहेत त्या वर्गातील मुलांना अंगणवाडी सेविका, आशा यांच्यामार्फत घरपोच गोळ्या दिल्या जात आहेत. तर शाळा सुरू असलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेत जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाते. जिल्ह्यात सध्या आठवी ते बारावी अशा एकूण २०२ शाळा सुरू असून, त्यात सुमारे १६ हजार उपस्थिती आहे.

जिल्ह्यात २१ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या आठवडाभरात सुमारे १२ लाख ७३ हजार लाभार्थ्यांना या गोळ्यांचे वाटप होणार आहे.

--------------

काय आहे जंतदोष?

जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतामुळे होतो. २८ टक्के बालकांना आतड्यांमध्ये वाढणाऱ्या परजीवी जंतापासून असा कृमी दोष होण्याची शक्यता आहे, असा जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे.

---------------

आरोग्य विभागातर्फे केले जाते वाटप

वयाच्या १८ वर्षापर्यंत आरोग्य विभागातर्फे मुला-मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येते. वर्षातून दोन वेळा ही मोहीम राबविण्यात येते. चालू वर्षात मार्चमध्ये गोळ्या वाटप झाल्या. आता पुढील आठवड्यात ही मोहीम सुरू होत आहे.

-------------

गोळ्यांसाठी कोणाकडे संपर्क साधायचा?

पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा बंद असल्याने आशा, अंगणवाडी सेविकांमार्फत घरपोच गोळ्यांचे वाटप होणार आहे. आठवी ते बारावीच्या शाळा सुरू आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळेत गोळ्यांचे वाटप होईल.

---------

वर्षभरातून दोनदा जंतनाशक गोळ्या वाटपाची मोहीम राबवली जाते. २१ ते २८ सप्टेंबरदरम्यान यंदाची दुसरी मोहीम राबवण्यात येईल. यात १२ लाख ७३ हजार लाभार्थ्यांना या गोळ्या देण्यात येणार आहेत.

- डाॅ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.