शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक गेला! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दात म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशित चिंतन नि प्रज्ज्वलित मन हाच आनंदाचा चिंतामणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 17:51 IST

काही वर्षापूर्वी दूरदर्शनवर मार्च महिन्याच्या आसपास एक मजेदार जाहिरात यायची.

- रमेश सप्रेकाही वर्षापूर्वी दूरदर्शनवर मार्च महिन्याच्या आसपास एक मजेदार जाहिरात यायची. ‘चिंतामणी, चिंता मनी! चिंतामणी योजना! एका बँकेची जाहिरात होती ती. चिंतामणी नावाचा एक माणूस मार्च संपण्यापूर्वी पैसे कुठे कुठे गुंतवायचे या चिंतेत असतो. त्याच्या मनी (मनात) चिंता असते ‘मनी’ची (पैशाची) त्यासाठी करमुक्त गुंतवणुकीची चिंतामणी योजना होती ती. यातील शब्दांवरती कसरत जाहिरातीचा भाग म्हणून सोडली तरी मुद्दा महत्त्वाचाच आहे. आपण सारे ‘चिंतातूर जंतू’ असतो ‘चिंता मृत देहाला एकदाच जाळते, पण चिता जिवंत माणसाला जन्मभर जाळत असते.’ ‘चिता नि चिंता फरक फक्त अनुस्वाराचा. पण परिणाम?’ असे अनेक विचार, सुविचार आपण वाचत असतो, म्हणत असतो. ‘चिंतामणी’ या जादुई मण्याबद्दल आपण ऐकलेलं असतं. हा असा चमत्कार घडवणारा मणी आहे की हा हातात धरून मनात चिंतन करू ती वस्तू प्रत्यक्षात साकारते. तो एकदा मिळाला की सा-या चिंताच मिटल्या असं आपण समजतो. चिंता मिटल्या म्हणजे संपल्या असं नव्हे तर त्या वेळेपुरत्या पु-या झाल्या. पुन्हा नव्या चिंता निर्माण होतातच. आपल्या चिंताचं एक वैशिष्टय़ म्हणजे त्या सर्व नकारात्मक, भयावह, जीवनातील आनंदाला ग्रहण लावणा-या अशा असतात. महाभारतात ‘यक्षप्रश्न’ नावाच्या प्रसंगात पिता यम (यक्ष बनून) आपला पुत्र युधिष्ठिर याला काही प्रश्न विचारून अज्ञातवासाच्या वर्षात सर्वानी लपून राहण्याची युक्ती किंवा योजना सुचण्यासाठी त्याची बुद्धी तेजस्वी करतो. त्यातलं एक प्रश्नोत्तर या संदर्भात महत्त्वाचं आहे. यक्ष विचारतो, ‘जगात गवतापेक्षा विपुल काय आहे?’ त्याला युधिष्ठिर उत्तर देतो, मानवाच्या मनातील चिंता’. किती खरंय हे उत्तर! एकवेळ पृथ्वीच्या पाठीवरचं गवत संपेल किंवा संपवून टाकता येईल; पण माणसांच्या चिंता काही नष्ट होणार नाहीत. या चिंतांवर उपाय काही आहे का? निश्चितच आहे चिंतन! तेही नकारात्मक नव्हे तर सकारात्मक चिंतन (पॉझिटिव्ह थिंकिंग). आनंदाच्या चिंतामणीचा अशा सकारात्मक चिंतनाशी संबंध आहे. सकारात्मकसाठी दुसरा शब्द आहे भावात्मक. साहजिकच त्याच्याविरुद्ध अभावात्मक (निगेटिव्ह) चिंतन, आनंदासाठी चिंतनाची याहून वरची पायरी गाठणं आवश्यक असतं. नुसतं भावात्मक नव्हे तर प्रभावात्मक चिंतन (इफेक्टिव्ह थिंकिंग).असं भविष्याबद्दलचं भावी संकल्प प्रकल्पाबद्दलचं, येऊ घातलेल्या ब-या वाईट घटना संबंधातलं प्रभावात्मक चिंतन हीच खरी आनंदाची खाण आहे. एकाच प्रसंगाकडे पाहताना एकाला ‘अंधार’ दिसतो तो निराश होतो. खचून जातो. तर त्याच परिस्थितीकडे दुसरा प्रकाशाच्या दृष्टीनं पाहतो. हेच पाहा ना!एका गावात दोन पादत्राणं तयार करणा-या कंपन्यांचे प्रतिनिधी येतात. निरीक्षणानंतर दोघांच्याही लक्षात येतं की पाच हजार लोकवस्ती असलेल्या या गावात एकही जण चप्पल, बूट वगैरे काहीही वापरत नाहीत. सारे अनवाणी फिरतात हे पाहून एका प्रतिनिधीनं आपल्या कंपनीला कळवलं, ‘या गावात आपली पादत्राणं विकायला बिलकुल संधी नाहीये कारण इथं कुणीही पादत्राणं वापरत नाहीत.’याचवेळी दुस-यानं कळवलं होतं आपल्या कंपनीला इथं योग्य प्रचार नि जाहिरात केल्यास पादत्राणं विकायला पूर्ण संधी आहे. पाच हजार पादत्राणांचे जोड (पेअर्स) निश्चित खपवता येतील. या दुस-या प्रतिनिधीला खरा चिंतामणी म्हणता येईल. पहिला प्रतिनिधी ‘फक्त चिंता मनी’ धरून ठेवणाराच आहे. ‘पेला अर्धा भरलाय, अर्धा सरलाय’ या म्हणण्यात विरोधाभास नाहीये. उलट अर्धा कुणीतरी वापरलाय कुणाची तरी गरज (तहान) भागवलीय, निदान अर्धा पाण्यानं किंवा दुधानं भरलेला असेल तर उरलेला अर्धा हवेनं तरी भरलेला आहेच की! अन् हवा ही कोणत्याही पेयापेक्षा अधिक जीवनदायी आहे. खरं ना?समर्थ रामदास ‘मनाचे श्लोक’मध्ये म्हणतात करीं सार चिंतामणी, काचखंडे। तया मागतां देत आहे उदंडे।।म्हणजे हातात चिंतामणी असताना मनात काचेचे तुकडे (काचखंडे) असले तर तसेच उदंड तुकडे चिंतामणी तुम्हाला प्रत्यक्ष देणार आहे. ‘आनंदाचा चिंतामणी’ ही कविकल्पना नाही. सतत सर्व घटनाप्रसंगांबद्दल, वस्तू गोष्टीबद्दल प्रसन्न, प्रभावी चिंतन करत राहणं हाच आनंदाचा राजमार्ग आहे. ‘तुम्ही मार्ग शोधा, मुक्काम (मंजिल) तुम्हाला शोधत येईलच’ या वाक्यात हेच सुचवलं आहे. मनात, विचारात सतत भाविकालाबद्दलची प्रकाशित चित्रं असतील, तसंच बुद्धीत चिंतनात नेहमी प्रसन्न स्वप्नं  असतील, नवनवीन उत्कटभव्य ध्येय असतील तर जीवन आनंदानं ओतप्रोत भरून जाईल यात शंका नाही. लक्षात ठेवू या प्रकाशित चिंतन नि प्रज्ज्वलीत मन (इग्नायटेड माईंड) हाच सतत तेजोमय चिंतामणी आहे, आनंदाचा!