शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

प्रकाशित चिंतन नि प्रज्ज्वलित मन हाच आनंदाचा चिंतामणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 17:51 IST

काही वर्षापूर्वी दूरदर्शनवर मार्च महिन्याच्या आसपास एक मजेदार जाहिरात यायची.

- रमेश सप्रेकाही वर्षापूर्वी दूरदर्शनवर मार्च महिन्याच्या आसपास एक मजेदार जाहिरात यायची. ‘चिंतामणी, चिंता मनी! चिंतामणी योजना! एका बँकेची जाहिरात होती ती. चिंतामणी नावाचा एक माणूस मार्च संपण्यापूर्वी पैसे कुठे कुठे गुंतवायचे या चिंतेत असतो. त्याच्या मनी (मनात) चिंता असते ‘मनी’ची (पैशाची) त्यासाठी करमुक्त गुंतवणुकीची चिंतामणी योजना होती ती. यातील शब्दांवरती कसरत जाहिरातीचा भाग म्हणून सोडली तरी मुद्दा महत्त्वाचाच आहे. आपण सारे ‘चिंतातूर जंतू’ असतो ‘चिंता मृत देहाला एकदाच जाळते, पण चिता जिवंत माणसाला जन्मभर जाळत असते.’ ‘चिता नि चिंता फरक फक्त अनुस्वाराचा. पण परिणाम?’ असे अनेक विचार, सुविचार आपण वाचत असतो, म्हणत असतो. ‘चिंतामणी’ या जादुई मण्याबद्दल आपण ऐकलेलं असतं. हा असा चमत्कार घडवणारा मणी आहे की हा हातात धरून मनात चिंतन करू ती वस्तू प्रत्यक्षात साकारते. तो एकदा मिळाला की सा-या चिंताच मिटल्या असं आपण समजतो. चिंता मिटल्या म्हणजे संपल्या असं नव्हे तर त्या वेळेपुरत्या पु-या झाल्या. पुन्हा नव्या चिंता निर्माण होतातच. आपल्या चिंताचं एक वैशिष्टय़ म्हणजे त्या सर्व नकारात्मक, भयावह, जीवनातील आनंदाला ग्रहण लावणा-या अशा असतात. महाभारतात ‘यक्षप्रश्न’ नावाच्या प्रसंगात पिता यम (यक्ष बनून) आपला पुत्र युधिष्ठिर याला काही प्रश्न विचारून अज्ञातवासाच्या वर्षात सर्वानी लपून राहण्याची युक्ती किंवा योजना सुचण्यासाठी त्याची बुद्धी तेजस्वी करतो. त्यातलं एक प्रश्नोत्तर या संदर्भात महत्त्वाचं आहे. यक्ष विचारतो, ‘जगात गवतापेक्षा विपुल काय आहे?’ त्याला युधिष्ठिर उत्तर देतो, मानवाच्या मनातील चिंता’. किती खरंय हे उत्तर! एकवेळ पृथ्वीच्या पाठीवरचं गवत संपेल किंवा संपवून टाकता येईल; पण माणसांच्या चिंता काही नष्ट होणार नाहीत. या चिंतांवर उपाय काही आहे का? निश्चितच आहे चिंतन! तेही नकारात्मक नव्हे तर सकारात्मक चिंतन (पॉझिटिव्ह थिंकिंग). आनंदाच्या चिंतामणीचा अशा सकारात्मक चिंतनाशी संबंध आहे. सकारात्मकसाठी दुसरा शब्द आहे भावात्मक. साहजिकच त्याच्याविरुद्ध अभावात्मक (निगेटिव्ह) चिंतन, आनंदासाठी चिंतनाची याहून वरची पायरी गाठणं आवश्यक असतं. नुसतं भावात्मक नव्हे तर प्रभावात्मक चिंतन (इफेक्टिव्ह थिंकिंग).असं भविष्याबद्दलचं भावी संकल्प प्रकल्पाबद्दलचं, येऊ घातलेल्या ब-या वाईट घटना संबंधातलं प्रभावात्मक चिंतन हीच खरी आनंदाची खाण आहे. एकाच प्रसंगाकडे पाहताना एकाला ‘अंधार’ दिसतो तो निराश होतो. खचून जातो. तर त्याच परिस्थितीकडे दुसरा प्रकाशाच्या दृष्टीनं पाहतो. हेच पाहा ना!एका गावात दोन पादत्राणं तयार करणा-या कंपन्यांचे प्रतिनिधी येतात. निरीक्षणानंतर दोघांच्याही लक्षात येतं की पाच हजार लोकवस्ती असलेल्या या गावात एकही जण चप्पल, बूट वगैरे काहीही वापरत नाहीत. सारे अनवाणी फिरतात हे पाहून एका प्रतिनिधीनं आपल्या कंपनीला कळवलं, ‘या गावात आपली पादत्राणं विकायला बिलकुल संधी नाहीये कारण इथं कुणीही पादत्राणं वापरत नाहीत.’याचवेळी दुस-यानं कळवलं होतं आपल्या कंपनीला इथं योग्य प्रचार नि जाहिरात केल्यास पादत्राणं विकायला पूर्ण संधी आहे. पाच हजार पादत्राणांचे जोड (पेअर्स) निश्चित खपवता येतील. या दुस-या प्रतिनिधीला खरा चिंतामणी म्हणता येईल. पहिला प्रतिनिधी ‘फक्त चिंता मनी’ धरून ठेवणाराच आहे. ‘पेला अर्धा भरलाय, अर्धा सरलाय’ या म्हणण्यात विरोधाभास नाहीये. उलट अर्धा कुणीतरी वापरलाय कुणाची तरी गरज (तहान) भागवलीय, निदान अर्धा पाण्यानं किंवा दुधानं भरलेला असेल तर उरलेला अर्धा हवेनं तरी भरलेला आहेच की! अन् हवा ही कोणत्याही पेयापेक्षा अधिक जीवनदायी आहे. खरं ना?समर्थ रामदास ‘मनाचे श्लोक’मध्ये म्हणतात करीं सार चिंतामणी, काचखंडे। तया मागतां देत आहे उदंडे।।म्हणजे हातात चिंतामणी असताना मनात काचेचे तुकडे (काचखंडे) असले तर तसेच उदंड तुकडे चिंतामणी तुम्हाला प्रत्यक्ष देणार आहे. ‘आनंदाचा चिंतामणी’ ही कविकल्पना नाही. सतत सर्व घटनाप्रसंगांबद्दल, वस्तू गोष्टीबद्दल प्रसन्न, प्रभावी चिंतन करत राहणं हाच आनंदाचा राजमार्ग आहे. ‘तुम्ही मार्ग शोधा, मुक्काम (मंजिल) तुम्हाला शोधत येईलच’ या वाक्यात हेच सुचवलं आहे. मनात, विचारात सतत भाविकालाबद्दलची प्रकाशित चित्रं असतील, तसंच बुद्धीत चिंतनात नेहमी प्रसन्न स्वप्नं  असतील, नवनवीन उत्कटभव्य ध्येय असतील तर जीवन आनंदानं ओतप्रोत भरून जाईल यात शंका नाही. लक्षात ठेवू या प्रकाशित चिंतन नि प्रज्ज्वलीत मन (इग्नायटेड माईंड) हाच सतत तेजोमय चिंतामणी आहे, आनंदाचा!