शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

प्रकाशित चिंतन नि प्रज्ज्वलित मन हाच आनंदाचा चिंतामणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 17:51 IST

काही वर्षापूर्वी दूरदर्शनवर मार्च महिन्याच्या आसपास एक मजेदार जाहिरात यायची.

- रमेश सप्रेकाही वर्षापूर्वी दूरदर्शनवर मार्च महिन्याच्या आसपास एक मजेदार जाहिरात यायची. ‘चिंतामणी, चिंता मनी! चिंतामणी योजना! एका बँकेची जाहिरात होती ती. चिंतामणी नावाचा एक माणूस मार्च संपण्यापूर्वी पैसे कुठे कुठे गुंतवायचे या चिंतेत असतो. त्याच्या मनी (मनात) चिंता असते ‘मनी’ची (पैशाची) त्यासाठी करमुक्त गुंतवणुकीची चिंतामणी योजना होती ती. यातील शब्दांवरती कसरत जाहिरातीचा भाग म्हणून सोडली तरी मुद्दा महत्त्वाचाच आहे. आपण सारे ‘चिंतातूर जंतू’ असतो ‘चिंता मृत देहाला एकदाच जाळते, पण चिता जिवंत माणसाला जन्मभर जाळत असते.’ ‘चिता नि चिंता फरक फक्त अनुस्वाराचा. पण परिणाम?’ असे अनेक विचार, सुविचार आपण वाचत असतो, म्हणत असतो. ‘चिंतामणी’ या जादुई मण्याबद्दल आपण ऐकलेलं असतं. हा असा चमत्कार घडवणारा मणी आहे की हा हातात धरून मनात चिंतन करू ती वस्तू प्रत्यक्षात साकारते. तो एकदा मिळाला की सा-या चिंताच मिटल्या असं आपण समजतो. चिंता मिटल्या म्हणजे संपल्या असं नव्हे तर त्या वेळेपुरत्या पु-या झाल्या. पुन्हा नव्या चिंता निर्माण होतातच. आपल्या चिंताचं एक वैशिष्टय़ म्हणजे त्या सर्व नकारात्मक, भयावह, जीवनातील आनंदाला ग्रहण लावणा-या अशा असतात. महाभारतात ‘यक्षप्रश्न’ नावाच्या प्रसंगात पिता यम (यक्ष बनून) आपला पुत्र युधिष्ठिर याला काही प्रश्न विचारून अज्ञातवासाच्या वर्षात सर्वानी लपून राहण्याची युक्ती किंवा योजना सुचण्यासाठी त्याची बुद्धी तेजस्वी करतो. त्यातलं एक प्रश्नोत्तर या संदर्भात महत्त्वाचं आहे. यक्ष विचारतो, ‘जगात गवतापेक्षा विपुल काय आहे?’ त्याला युधिष्ठिर उत्तर देतो, मानवाच्या मनातील चिंता’. किती खरंय हे उत्तर! एकवेळ पृथ्वीच्या पाठीवरचं गवत संपेल किंवा संपवून टाकता येईल; पण माणसांच्या चिंता काही नष्ट होणार नाहीत. या चिंतांवर उपाय काही आहे का? निश्चितच आहे चिंतन! तेही नकारात्मक नव्हे तर सकारात्मक चिंतन (पॉझिटिव्ह थिंकिंग). आनंदाच्या चिंतामणीचा अशा सकारात्मक चिंतनाशी संबंध आहे. सकारात्मकसाठी दुसरा शब्द आहे भावात्मक. साहजिकच त्याच्याविरुद्ध अभावात्मक (निगेटिव्ह) चिंतन, आनंदासाठी चिंतनाची याहून वरची पायरी गाठणं आवश्यक असतं. नुसतं भावात्मक नव्हे तर प्रभावात्मक चिंतन (इफेक्टिव्ह थिंकिंग).असं भविष्याबद्दलचं भावी संकल्प प्रकल्पाबद्दलचं, येऊ घातलेल्या ब-या वाईट घटना संबंधातलं प्रभावात्मक चिंतन हीच खरी आनंदाची खाण आहे. एकाच प्रसंगाकडे पाहताना एकाला ‘अंधार’ दिसतो तो निराश होतो. खचून जातो. तर त्याच परिस्थितीकडे दुसरा प्रकाशाच्या दृष्टीनं पाहतो. हेच पाहा ना!एका गावात दोन पादत्राणं तयार करणा-या कंपन्यांचे प्रतिनिधी येतात. निरीक्षणानंतर दोघांच्याही लक्षात येतं की पाच हजार लोकवस्ती असलेल्या या गावात एकही जण चप्पल, बूट वगैरे काहीही वापरत नाहीत. सारे अनवाणी फिरतात हे पाहून एका प्रतिनिधीनं आपल्या कंपनीला कळवलं, ‘या गावात आपली पादत्राणं विकायला बिलकुल संधी नाहीये कारण इथं कुणीही पादत्राणं वापरत नाहीत.’याचवेळी दुस-यानं कळवलं होतं आपल्या कंपनीला इथं योग्य प्रचार नि जाहिरात केल्यास पादत्राणं विकायला पूर्ण संधी आहे. पाच हजार पादत्राणांचे जोड (पेअर्स) निश्चित खपवता येतील. या दुस-या प्रतिनिधीला खरा चिंतामणी म्हणता येईल. पहिला प्रतिनिधी ‘फक्त चिंता मनी’ धरून ठेवणाराच आहे. ‘पेला अर्धा भरलाय, अर्धा सरलाय’ या म्हणण्यात विरोधाभास नाहीये. उलट अर्धा कुणीतरी वापरलाय कुणाची तरी गरज (तहान) भागवलीय, निदान अर्धा पाण्यानं किंवा दुधानं भरलेला असेल तर उरलेला अर्धा हवेनं तरी भरलेला आहेच की! अन् हवा ही कोणत्याही पेयापेक्षा अधिक जीवनदायी आहे. खरं ना?समर्थ रामदास ‘मनाचे श्लोक’मध्ये म्हणतात करीं सार चिंतामणी, काचखंडे। तया मागतां देत आहे उदंडे।।म्हणजे हातात चिंतामणी असताना मनात काचेचे तुकडे (काचखंडे) असले तर तसेच उदंड तुकडे चिंतामणी तुम्हाला प्रत्यक्ष देणार आहे. ‘आनंदाचा चिंतामणी’ ही कविकल्पना नाही. सतत सर्व घटनाप्रसंगांबद्दल, वस्तू गोष्टीबद्दल प्रसन्न, प्रभावी चिंतन करत राहणं हाच आनंदाचा राजमार्ग आहे. ‘तुम्ही मार्ग शोधा, मुक्काम (मंजिल) तुम्हाला शोधत येईलच’ या वाक्यात हेच सुचवलं आहे. मनात, विचारात सतत भाविकालाबद्दलची प्रकाशित चित्रं असतील, तसंच बुद्धीत चिंतनात नेहमी प्रसन्न स्वप्नं  असतील, नवनवीन उत्कटभव्य ध्येय असतील तर जीवन आनंदानं ओतप्रोत भरून जाईल यात शंका नाही. लक्षात ठेवू या प्रकाशित चिंतन नि प्रज्ज्वलीत मन (इग्नायटेड माईंड) हाच सतत तेजोमय चिंतामणी आहे, आनंदाचा!