शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

काशी, हिमालय, गंगेपेक्षाही संत श्रेष्ठच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 15:51 IST

तीर्थाला जे तीर्थपण येते ते संतांमुळेच येते. संत हे तीर्था लाही  शुचित्व देतात.

- हभप भरतबुवा रामदासी, बीड.

संतांचे श्रेष्ठत्व तीर्थापेक्षाही महान आहे. या जगात तीन गोष्टी अत्यंत पवित्र आहेत. काशी क्षेत्र, हिमालय आणि गंगा. ...पण संत या तिघांपेक्षाही पवित्र आहेत. आपण म्हणाल कसे. .? तर या प्रश्नाचे उत्तर आपण क्रमवार बघु या. ..!काशी क्षेत्र सर्वात पवित्र आहे. ज्या साधकाला काशी क्षेत्री मृत्यू येतो, त्याला पुन्हा भव चक्राच्या आवर्तनात यावे लागत नाही. त्या साधकाला तात्काळ मोक्ष प्राप्त होतो. पण हे सर्व त्या काशी क्षेत्रात राहणाऱ्यासाठीच आहे. समजा एखादा व्यक्ती अन्य ठिकाणी मृत्यू पावला तर, त्याचा उद्धार काशी करणार नाही. माउली म्हणतात; मोक्ष देऊनी उदार! काशी होय कीर! परी वेचणे लागे शरीर ! तये गावी !!आता मला सांगा मरण कुणाला आवडेल. ...? ही मरणाची अट जाचकच नाही का. .? मरणानंतर मोक्ष मिळणार हे खरे. ..पण सगळ्यांना काशीतच मरण येईल हे कसं शक्य आहे. .? जर मग अन्य ठिकाणी मृत्यू आला तर, मोक्ष मिळणारच नाही का. .? अहो. ..! संतांच्या तर फक्त दर्शनातच मोक्ष आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, अलिंगणे घडे मोक्ष सायुज्यता जोडे! 

हिमालय हा ही सर्वात पवित्र आहे. परंतु हिमालयाची यात्रा करण्यासाठी शरीर सदृढ पाहिजे. जवळ पैसा पाहिजे. शिवाय यात्रा करतांना हा देह जर त्या हिमालयावर पडला तरच, मोक्ष प्राप्ती होते. संत दर्शनात पैसा खर्च करण्याची गरज नाही व त्यांच्या सानिध्यात मरण्याचीही गरज नाही. फक्त कृपा दृष्टीनेच मोक्ष मिळतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात; हिमवंतु दोष खाये ! परी जीविताची हानी होये ! तैसे शुचित्व नोहे ! सज्जनांचे !! 

सर्व तिर्थात गंगा अत्यंत पवित्र आहे. गंगा स्नानाचे पुण्य अवर्णनीय आहे. गंगा स्नान घडले तर, देह पवित्र होतो. पण. ..या गंगा तीर्थाचीही मरण्याची अट आहेच. गंगेत मृत्यू यावा लागतो. तरच जन्म मरण परंपरा टळते. माऊली म्हणतात; शुचित्वे गंगा होये ! आणि पाप ताप ही जाये! परी तेथे आहे ! बुडणे एक!!

संताजवळ मात्र मोक्ष प्राप्तीसाठी कुठल्याच जाचक अटी नाहीत. अहो. ...! संताजवळच जगातली सगळी तीर्थे शुचित्वासाठी येतात.गंगेत पापी लोक स्नान करतात, त्यामुळे गंगेलाही अपवित्रपणा येतो. हा अपवित्रपणा जाण्यासाठी गंगेलाही संताच्या चरण रजाचा आश्रय घ्यावा लागतो. संतांनी जर गंगेमध्ये स्नान केले तरच हा अपवित्रपणा नष्ट होतो. माऊली वर्णन करतात,संताचेनि अंग लगे! पापाते जिणणे गंगे ! तेणे संत संगे! शुचित्व कैसे!!तीर्थाला जे तीर्थपण येते ते संतांमुळेच येते. संत हे तीर्था लाही  शुचित्व देतात. एवढा महान अधिकार संताचा आहे. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात; तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया. !पर्व काळ पायतळी वसे वैष्णवा !! 

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्रमांक 8329878467 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक