शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

काशी, हिमालय, गंगेपेक्षाही संत श्रेष्ठच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 15:51 IST

तीर्थाला जे तीर्थपण येते ते संतांमुळेच येते. संत हे तीर्था लाही  शुचित्व देतात.

- हभप भरतबुवा रामदासी, बीड.

संतांचे श्रेष्ठत्व तीर्थापेक्षाही महान आहे. या जगात तीन गोष्टी अत्यंत पवित्र आहेत. काशी क्षेत्र, हिमालय आणि गंगा. ...पण संत या तिघांपेक्षाही पवित्र आहेत. आपण म्हणाल कसे. .? तर या प्रश्नाचे उत्तर आपण क्रमवार बघु या. ..!काशी क्षेत्र सर्वात पवित्र आहे. ज्या साधकाला काशी क्षेत्री मृत्यू येतो, त्याला पुन्हा भव चक्राच्या आवर्तनात यावे लागत नाही. त्या साधकाला तात्काळ मोक्ष प्राप्त होतो. पण हे सर्व त्या काशी क्षेत्रात राहणाऱ्यासाठीच आहे. समजा एखादा व्यक्ती अन्य ठिकाणी मृत्यू पावला तर, त्याचा उद्धार काशी करणार नाही. माउली म्हणतात; मोक्ष देऊनी उदार! काशी होय कीर! परी वेचणे लागे शरीर ! तये गावी !!आता मला सांगा मरण कुणाला आवडेल. ...? ही मरणाची अट जाचकच नाही का. .? मरणानंतर मोक्ष मिळणार हे खरे. ..पण सगळ्यांना काशीतच मरण येईल हे कसं शक्य आहे. .? जर मग अन्य ठिकाणी मृत्यू आला तर, मोक्ष मिळणारच नाही का. .? अहो. ..! संतांच्या तर फक्त दर्शनातच मोक्ष आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, अलिंगणे घडे मोक्ष सायुज्यता जोडे! 

हिमालय हा ही सर्वात पवित्र आहे. परंतु हिमालयाची यात्रा करण्यासाठी शरीर सदृढ पाहिजे. जवळ पैसा पाहिजे. शिवाय यात्रा करतांना हा देह जर त्या हिमालयावर पडला तरच, मोक्ष प्राप्ती होते. संत दर्शनात पैसा खर्च करण्याची गरज नाही व त्यांच्या सानिध्यात मरण्याचीही गरज नाही. फक्त कृपा दृष्टीनेच मोक्ष मिळतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात; हिमवंतु दोष खाये ! परी जीविताची हानी होये ! तैसे शुचित्व नोहे ! सज्जनांचे !! 

सर्व तिर्थात गंगा अत्यंत पवित्र आहे. गंगा स्नानाचे पुण्य अवर्णनीय आहे. गंगा स्नान घडले तर, देह पवित्र होतो. पण. ..या गंगा तीर्थाचीही मरण्याची अट आहेच. गंगेत मृत्यू यावा लागतो. तरच जन्म मरण परंपरा टळते. माऊली म्हणतात; शुचित्वे गंगा होये ! आणि पाप ताप ही जाये! परी तेथे आहे ! बुडणे एक!!

संताजवळ मात्र मोक्ष प्राप्तीसाठी कुठल्याच जाचक अटी नाहीत. अहो. ...! संताजवळच जगातली सगळी तीर्थे शुचित्वासाठी येतात.गंगेत पापी लोक स्नान करतात, त्यामुळे गंगेलाही अपवित्रपणा येतो. हा अपवित्रपणा जाण्यासाठी गंगेलाही संताच्या चरण रजाचा आश्रय घ्यावा लागतो. संतांनी जर गंगेमध्ये स्नान केले तरच हा अपवित्रपणा नष्ट होतो. माऊली वर्णन करतात,संताचेनि अंग लगे! पापाते जिणणे गंगे ! तेणे संत संगे! शुचित्व कैसे!!तीर्थाला जे तीर्थपण येते ते संतांमुळेच येते. संत हे तीर्था लाही  शुचित्व देतात. एवढा महान अधिकार संताचा आहे. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात; तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया. !पर्व काळ पायतळी वसे वैष्णवा !! 

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्रमांक 8329878467 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक