शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

जग ब्रह्म रूप जाण! हेची साधुचे लक्षण!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 15:46 IST

ब्रह्मज्ञान मिळवून जो स्वतःचा उद्धार करतो पण इतर जीवाचा करीत नाही. त्याचे ज्ञान खरे नसून ते भंडपण आहे.

- हभप भरतबुवा रामदासी. बीड. 

मध्यम भक्ताची भक्ती ही उदात्त असते. त्याच्या अंतःकरणात भगवंताबद्दल अत्यंतिक प्रेम असते. भगवंताची भक्ती करणाऱ्या साधकाबद्दल मैत्रीपूर्ण भाव असतो. हे सगळे खरे असले तरी, मध्यम भक्ताची भक्ती ही फक्त आत्मोद्धाराच्या साधनेनेच चाललेली असते. समाजकल्याणाची किंवा समाज उद्धाराची तळमळ मध्यम भक्ताला मुळीच नसते. संत एकनाथ महाराज मध्यम भक्ताचे वर्णन करतांना म्हणतात; 

पावोनिया ब्रह्मज्ञान! स्वयें उद्धरी आपण! न करी जो दीनोध्दारण! हे भंडपण झाल्याचे!!

ब्रह्मज्ञान मिळवून जो स्वतःचा उद्धार करतो पण इतर जीवाचा करीत नाही. त्याचे ज्ञान खरे नसून ते भंडपण आहे. वैयक्तिक मोक्षाच्या मागे लागलेले योगी व समाजकल्याणाची तळमळ असणारे संत यांच्यात हाच मोठा फरक आहे. 

जग ब्रह्म रूप जाण! हेची साधुचे लक्षण!!

जगाला ब्रह्म रूप समजून जगातील प्राणिमात्रांकडे ब्रह्म भावाने बघणें हाच खरा भागवत धर्म आहे. ईश्वर सर्वत्र आहे या अद्वैत भुमीकेतून भक्तीची साधना केली तरच विश्वोद्धार व आत्मोद्धार होईल. सर्व भूतमात्रांमध्ये ईश्वरभाव ठेवून जो भक्ती करतो तोच उत्तम भक्त होय. उत्तम भक्तांचे लक्षण सांगतांना व्यास महाराज म्हणतात; 

न काम कर्म बीजानां यस्य चेतसि संभवः !वासुदेवैक निलयाःस वै भागवतोत्तमः!!

उत्तम भक्ताच्या चित्ताला राग, द्वेष, इर्षा, मोह, हर्ष, विषाद इ.विकार कधीच शिवत नाहीत.कारण त्याचे चित्त फक्त परमेश्वराचे ठिकाणीच स्थिर असते. त्यामुळे कुठलेही काम विकार उत्तम भक्ताला निर्माण होत नाहीत. काम नाही म्हणून त्या पासून निर्माण होणारे कर्म नाही. कारण कर्माला कारण असणारे  अज्ञानाचे बीजच नष्ट झालेले असते. उत्तम भक्त हा कर्म करून देखील अकर्मीच राहतो. भक्ती साधनेतून सर्व भूतमात्रात एक परमेश्वर भरलेला असल्याची त्याला प्रचिती आलेली असते. तुकाराम महाराज आपला स्वानुभव वर्णन करतात; 

विठ्ठल जळी स्थळी भरला! रिता ठाव नाही उरला! तो म्या दृष्टीने पाहिला! विठ्ठलाची विठ्ठलची !!

देव सर्वत्र आहे. सर्वांभूती आहे. त्या परमेश्वराला देश, काल, आणि वस्तु मर्यादा नाही. असा अमर्याद असणारा तो परमात्मा सर्वत्र व्यापून दशांगुले उरला आहे. उत्तम भक्ताला. .सर्वं विष्णुमयं जगत्. ...! हे ज्ञान झालेले असल्यामुळे त्याचे भेदाभेद संपलेले असतात. भगवान अर्जुनाला सांगतात; 

समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम्! न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम् !!

समत्व प्राप्त झालेल्या भक्तालाच उत्तम भक्त असे म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात; 

जो सर्व भूतांचे ठायी ! द्वेषातें नेणेंचि कांही! आपपरू नाही!  चैतन्य जैसा!!

( लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत; त्यांचा संपर्क 8329878467 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक