शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
7
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
8
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
11
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
12
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
13
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
14
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
15
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
16
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
17
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
18
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
19
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
20
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम

बदला: कमकुवत,अतृप्त मनाचे अघोरी कृत्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 15:39 IST

आजकाल हा शहाणपणा कमी होत चालला असून माणूस द्वेष, मत्सर, राग, लोभ, तिरस्कार मनात ठेवून जगतात. त्यातूनच काही लोकांच्या मनात बदला घेण्याची वृत्ती वाढते.

समाज हा मानवी जीवनाचा सामूहिकपणे जीवन जगण्याचे माध्यम आहे. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तो समाजात जगणे सुरक्षित समजतो. एकटा मनुष्य जीवन जगू शकत नाही त्याला इतरांची गरज असते. म्हणूनच कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था अस्तित्वात आहे. समाजात जगतांना समाजाचे काही संकेत असतात ते पाळणे गरजेचे असते. समाजाच्या चाली रिती प्रथा भिन्न भिन्न असतात.मात्र काळानुसार त्यात बदल करून समाज जीवन सुकर करण्याचा प्रयत्न सतत होत असतो. समाजाने टाकाऊ रूढी परंपरा नाकारल्याच पाहिजेत. तरच समाज प्रगती करू शकतो. समाजात वावरताना प्रत्येक जण आपली प्रतिष्ठा जोपासण्याचा प्रयत्न करीत असतो, समाजात आपला मानसन्मान व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. पण समाजात वावरतांना माणसाचे जे परस्परांशी संबंध येतात त्यात कुठल्या ना कुठल्या कारणांनी म्हणा, किंवा माणसाचा स्वभाव, प्रवृत्ती, मानसिकता या कारणांनी बेबनाव होतातच. ते साहजिकच आहे. पण बेबनाव झाला, पटत नाही म्हणून परस्परांचा द्वेष न ठेवता संबंध न ठेवणे व आपण चांगले शांतपणे जगणं यातच शहाणपण आहे. पण आजकाल हा शहाणपणा कमी होत चालला असून माणूस द्वेष, मत्सर, राग, लोभ, तिरस्कार मनात ठेवून जगतात. त्यातूनच काही लोकांच्या मनात बदला घेण्याची वृत्ती वाढते. या वृत्तीतून माणूस सतत त्या व्यक्तीच्या विरुद्ध बोलतात, त्याच्या कुचाळ्या, कांड्या करतात. त्या संबंधित व्यक्तीला त्रास देतात. ही प्रवृत्ती म्हणजे कमकुवत, अतृप्त मनाचे अघोरी कृत्य होय. अशी माणसं स्वत: कधीच समाधानी नसतात.असं म्हणतात की, वैराने कधी वैर संपत नाही, वैराला प्रेमानेच जिंकावे लागते. तथागताने समस्त मानव जातीला हाच संदेश दिला. पण हा संदेश माणूस कधी समजूनच घेत नाही म्हणून तो सतत दु:खात असतो. माणूस सतत भ्रमात जगतो. सत्ता, संपत्ती, पद व प्रतिष्ठा, श्रीमंतीच्या पाठीमागे धावत राहतो, अतिलोभामुळे तो भ्रष्ट बनतो, अनैतिक मागार्चा अवलंब करतो. तो जीवनात फक्त धावत राहतो जगत नाही. त्याच्या मनाला शांती, समाधान नाही तो सतत अस्वस्थ राहतो. यातून त्याच्या मनात इतरांचा द्वेष वाढतो. द्वेषातून बदला घेण्याची प्रवृत्ती वाढते. बदला घेण्याच्या भावनेतून हाणामाऱ्या, भांडणे, खून, हत्या घडतात. इतरांच्या जीवनात दु:ख निर्माण करणारी माणसे स्वत: कधी सुखी जगूच शकत नाहीत हे सत्य कधी समजून घेत नाही. म्हणून जग अस्वस्थ आहे. युद्धाच्या मार्गावर आहे. त्याला यातून मार्ग काढण्यासाठी बुद्धाकडे जाणे आहे. कारण बुद्ध धम्म हा सदाचारी जीवनाचा मार्ग आहे. सुख, शांती, समाधान येथेच आहे. प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री, ममता, समता, स्वातंत्र्य,बंधुता, न्याय व मानवता त्यातच आहे. तोच खरा माणुसकीचा जीवन मार्ग आहे. भवतु सब्ब मंगलम ...- प्रा.डॉ.एम.आर. इंगळे, अकोला

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक