शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

समृद्धी

By admin | Updated: August 12, 2016 13:21 IST

प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या समृद्धीची ‘ओढ’ कमी-अधिक प्रमाणात असतेच. त्यासाठी धडपड व प्रयत्नही असतात.

- प्रा. डॉ. यशवंत पाटील
 
प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या समृद्धीची ‘ओढ’ कमी-अधिक प्रमाणात असतेच. त्यासाठी धडपड व प्रयत्नही असतात. ते विशिष्ट मर्यादेपर्यंत आवश्यकही आहे. ही धडपड, पळापळ, जीवघेणे प्रयत्न मनाला स्वस्थ बसू देत नाहीत व चित्तही स्थिर ठेवत नाही. पण यामुळेच मानवी जीवन ‘चैतन्य’मय झाले आहे. हे खरेच. पण यास सद्सद् विवेक, सकारात्मक दृष्टिकोन, चिंतन आणि संयम लाभला तर जीवन हा एक आनंदी उत्सव बनेल. असे बरेच काही आचार्य विनोबा भावे यांच्या ‘गीताई’ प्रवचनातून विविध उदाहरणे आणि दृष्टांत देऊन जीवन ‘समृद्धी’विषयी सांगत.
व्यक्ती तितक्या प्रकृतीनुसार जीवन समृद्धीची समज, उमज आणि आकलन भिन्न-भिन्न असू शकते. त्यामुळे ‘समृद्धी’ची साचेबंद व्याख्या करणे कठीण आहे. ‘पणज्यातून मनाला चिरकालीन, टिकाऊ आनंद-समाधान-शांती मिळू शकते. मनाची प्रसन्नता अधिक उमलते-फुलते त्यास समृद्धी समजावे’ असे जे सॉक्रेटीसय म्हणतो ते अधिक संयुक्तीक आहे. उदा. एका विशिष्ट कार्याने स्वामी विवेकानंद समृद्ध होते. स्वत:च्या घरा-दारात आणि शेतात राबणारी खान्देशी कवयित्री बहिणाबाई समृद्ध समजली जाते.
खेड्या-पाड्यात वाडी-वस्तीवर काम करणारी अंगणवाडीतील गरीब शिक्षिका जेव्हा आनंदी, तृप्त दिसते तेव्हा ती ‘समृद्ध’ असते. अस्वस्थतेचा भोवरा मनात भिर-भिरणारा, बाह्यता समृद्ध दिसणारा आपल्या दृष्टीने ‘समृद्ध’ वाटतो. पण तसा तो अनेकदा नसतो.
स्वत:प्रती आणि इतरांसाठीही ‘प्रेम’ हा अडीच अक्षरी शब्द ज्या व्यक्तीच्या आचार-विचार, व्यवहारात ओत-प्रोत, ठासून भरलेला आहे तो समृद्ध, भौतिकदृष्ट्या त्याच्याजवळ काही असेल, नसेलही, प्रेमातून निर्माण झालेले अनुबंधच समृद्धी वाढवित असतात. ‘प्रेम’ हा अंतर्मनावर झालेला समृद्धीसाठीचा संस्कार आहे.