शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पावावया ब्रह्मपूर्ण । सांडुनि देई दोषगुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 13:22 IST

आषाढी वारी...

पावावया ब्रह्मपूर्ण । सांडुनि देई दोषगुण ।।१।।सर्वांभूती समदृष्टि । हेचि भक्ति गोड मोठी ।।२।।या वेगळें थोर नाहीं । बरवें शोधूनियां पाही ।।३।।येणे संसार सुखाचा । म्हणे नामा शिंपीयाचा ।।४।।- संत नामदेव महाराजसंत शिरोमणी नामदेव महाराजांनी संसार सुखाचा होण्यासाठी आणि परमात्म्याच्या कृपेसाठी दोन महत्त्वाचे मार्ग सांगितले आहेत.पहिला मार्ग आहे, दोष गुण सोडून द्यायचा. मुळात परमेश्वराची करुणा भाकणाºया संतांनी आपल्या गुणदोषांची प्रांजळ कबुली दिली आहे. देवापासून त्यांनी दोष लपविलेले नाही. कारण तो सर्वज्ञ आहे, हे त्यांना माहिती होते. आपल्यातील दोष गुण टाकून सद्गुण अंगी बाणवणे हीच परमार्थाची खरी वाटचाल आहे. वास्तविक पाहता हे दोष आपल्याला कळायला हवेत. आपण ते आपल्यात शोधून त्याचा त्याग करायला हवा. ‘माझे मज कळे । येती अवगुण । काय करू मन अनावर ।। असा जगद्गुरू तुकोबारायांचा कबुली जबाब महत्त्वाचा आहे. परनिंदा, स्वार्थीपणा, लोभीपणा इत्यादी अनेक दोष गुण आपल्यात आहेत, ते आपण सांडायला म्हणजे टाकायला हवेत.

पुढे नामदेवराय सर्वांभूती समभाव ठेवणं हीच गोड भक्तीची खूण म्हणून सांगतात. सर्वत्र समान भाव ठेवून भक्ती केली की भक्ताचे ज्ञानचक्षू उघडतात. कांदा, मुळा, भाजी, लसूण, मिरची, कोथिंबिरी हे रोजच्या जेवणातले पदार्थ. पण श्रीसंत सावता महाराजांची ज्ञानदृष्टी इतकी व्यापक की त्यांना सारेच हरिरुप वाटत असे. माझा मळा हा भावच संपुष्टात आला. सावतोबांचा मळाही विठ्ठलरुप झाला. ‘जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत’ हा सर्वांभूती भगवद् भावनेचा वस्तूपाठच ज्ञानदेवांनी दिला. अशा सर्वांभूती भगवत् भावनेलाच नामदेवांनी गोड भक्ती म्हटले आहे; आणि याच्यापेक्षा मोठे काहीही नाही, शोधून पहा हेही आवर्जून सांगायला विसरत नाहीत, तसेच अभंगाच्या शेवटच्या चरणात दोषगुणांचा त्याग व सर्वांभूती भगवद् भावना याच दोन गोष्टी सुखाचा संसार होण्याचा व पर्यायाने परमार्थ यशस्वी होण्याला कारणीभूत ठरतात, अशी ग्वाही नामदेवराय देतात.

अभंगातील या दोन बाबींचा विचार वारीच्या संदर्भाने केल्यास आपला परमार्थ सुखकर होण्यास मदत होईल. वारीला निघताना प्रत्येक वारकरी जी जबाबदारी आहे ती पूर्ण करून तरी किंवा तिची व्यवस्था लावून निघतो. घरात खायला मीठसुद्धा नाही आणि निघाला वारीला अशी वारी दोषपूर्ण ठरते म्हणून तर प्रपंच करावा नेटका असे आपल्याला संतांनी आवर्जून सांगितले. वारीत चालताना प्रत्येक वारकरी हा केवळ पांडुरंगांसाठीच चालत असतो, एकमेकाला धक्का जरी लागला तरी माऊली म्हणायचे, काही विचारायचे नाही, काही घ्यायचे, काही द्यायचे तरीही माऊली संबोधन ही वारीतली एकवाक्यता सर्वांभूती भगवद्भाव शिकवणुकीची पहिली पायरी होय. हाच वारीतला भाव आपल्याला जीवनात दृढ करायचा म्हणजे नक्की आपला संसार सुखाचा होईल. सर्वांभूती भगवद्भाव अंत:करणात साठल्याचा तपकिरे बाबांना आलेला प्रत्यय पाहून श्री शितोळे सरकार बाबांच्या पायावर नतमस्तक झाले.

आपला दैनंदिन संसार सुखाचा व्हावा असे ज्या साधक भक्ताला वाटत असेल त्याने गुणदोषांचा त्याग व सर्वांभूती भगवद्भाव या बाबी मनापासून स्वीकारून त्याप्रमाणे आचरण करायला हवे. परंतु, या गोष्टी समजण्यासाठी, आकलनासाठी आणि आचरणात आणताना सोप्या होण्यासाठी नामस्मरण सांगितले. पारमार्थिक जीवनाचा अविभाज्य अंग असलेल्या नामस्मरणाचा महिमा संत चोखोबांच्या शब्दात आपण उद्याचा अंकात पाहणार आहोत, क्रमश :- ह. भ. प. डॉ. अनंत महाराज बिडवे

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाAdhyatmikआध्यात्मिक