शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
4
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
5
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
6
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
7
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
8
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
9
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
12
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
13
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
15
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
16
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
17
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
18
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
19
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
20
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा

पावावया ब्रह्मपूर्ण । सांडुनि देई दोषगुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 13:22 IST

आषाढी वारी...

पावावया ब्रह्मपूर्ण । सांडुनि देई दोषगुण ।।१।।सर्वांभूती समदृष्टि । हेचि भक्ति गोड मोठी ।।२।।या वेगळें थोर नाहीं । बरवें शोधूनियां पाही ।।३।।येणे संसार सुखाचा । म्हणे नामा शिंपीयाचा ।।४।।- संत नामदेव महाराजसंत शिरोमणी नामदेव महाराजांनी संसार सुखाचा होण्यासाठी आणि परमात्म्याच्या कृपेसाठी दोन महत्त्वाचे मार्ग सांगितले आहेत.पहिला मार्ग आहे, दोष गुण सोडून द्यायचा. मुळात परमेश्वराची करुणा भाकणाºया संतांनी आपल्या गुणदोषांची प्रांजळ कबुली दिली आहे. देवापासून त्यांनी दोष लपविलेले नाही. कारण तो सर्वज्ञ आहे, हे त्यांना माहिती होते. आपल्यातील दोष गुण टाकून सद्गुण अंगी बाणवणे हीच परमार्थाची खरी वाटचाल आहे. वास्तविक पाहता हे दोष आपल्याला कळायला हवेत. आपण ते आपल्यात शोधून त्याचा त्याग करायला हवा. ‘माझे मज कळे । येती अवगुण । काय करू मन अनावर ।। असा जगद्गुरू तुकोबारायांचा कबुली जबाब महत्त्वाचा आहे. परनिंदा, स्वार्थीपणा, लोभीपणा इत्यादी अनेक दोष गुण आपल्यात आहेत, ते आपण सांडायला म्हणजे टाकायला हवेत.

पुढे नामदेवराय सर्वांभूती समभाव ठेवणं हीच गोड भक्तीची खूण म्हणून सांगतात. सर्वत्र समान भाव ठेवून भक्ती केली की भक्ताचे ज्ञानचक्षू उघडतात. कांदा, मुळा, भाजी, लसूण, मिरची, कोथिंबिरी हे रोजच्या जेवणातले पदार्थ. पण श्रीसंत सावता महाराजांची ज्ञानदृष्टी इतकी व्यापक की त्यांना सारेच हरिरुप वाटत असे. माझा मळा हा भावच संपुष्टात आला. सावतोबांचा मळाही विठ्ठलरुप झाला. ‘जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत’ हा सर्वांभूती भगवद् भावनेचा वस्तूपाठच ज्ञानदेवांनी दिला. अशा सर्वांभूती भगवत् भावनेलाच नामदेवांनी गोड भक्ती म्हटले आहे; आणि याच्यापेक्षा मोठे काहीही नाही, शोधून पहा हेही आवर्जून सांगायला विसरत नाहीत, तसेच अभंगाच्या शेवटच्या चरणात दोषगुणांचा त्याग व सर्वांभूती भगवद् भावना याच दोन गोष्टी सुखाचा संसार होण्याचा व पर्यायाने परमार्थ यशस्वी होण्याला कारणीभूत ठरतात, अशी ग्वाही नामदेवराय देतात.

अभंगातील या दोन बाबींचा विचार वारीच्या संदर्भाने केल्यास आपला परमार्थ सुखकर होण्यास मदत होईल. वारीला निघताना प्रत्येक वारकरी जी जबाबदारी आहे ती पूर्ण करून तरी किंवा तिची व्यवस्था लावून निघतो. घरात खायला मीठसुद्धा नाही आणि निघाला वारीला अशी वारी दोषपूर्ण ठरते म्हणून तर प्रपंच करावा नेटका असे आपल्याला संतांनी आवर्जून सांगितले. वारीत चालताना प्रत्येक वारकरी हा केवळ पांडुरंगांसाठीच चालत असतो, एकमेकाला धक्का जरी लागला तरी माऊली म्हणायचे, काही विचारायचे नाही, काही घ्यायचे, काही द्यायचे तरीही माऊली संबोधन ही वारीतली एकवाक्यता सर्वांभूती भगवद्भाव शिकवणुकीची पहिली पायरी होय. हाच वारीतला भाव आपल्याला जीवनात दृढ करायचा म्हणजे नक्की आपला संसार सुखाचा होईल. सर्वांभूती भगवद्भाव अंत:करणात साठल्याचा तपकिरे बाबांना आलेला प्रत्यय पाहून श्री शितोळे सरकार बाबांच्या पायावर नतमस्तक झाले.

आपला दैनंदिन संसार सुखाचा व्हावा असे ज्या साधक भक्ताला वाटत असेल त्याने गुणदोषांचा त्याग व सर्वांभूती भगवद्भाव या बाबी मनापासून स्वीकारून त्याप्रमाणे आचरण करायला हवे. परंतु, या गोष्टी समजण्यासाठी, आकलनासाठी आणि आचरणात आणताना सोप्या होण्यासाठी नामस्मरण सांगितले. पारमार्थिक जीवनाचा अविभाज्य अंग असलेल्या नामस्मरणाचा महिमा संत चोखोबांच्या शब्दात आपण उद्याचा अंकात पाहणार आहोत, क्रमश :- ह. भ. प. डॉ. अनंत महाराज बिडवे

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाAdhyatmikआध्यात्मिक