शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

पावावया ब्रह्मपूर्ण । सांडुनि देई दोषगुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 13:22 IST

आषाढी वारी...

पावावया ब्रह्मपूर्ण । सांडुनि देई दोषगुण ।।१।।सर्वांभूती समदृष्टि । हेचि भक्ति गोड मोठी ।।२।।या वेगळें थोर नाहीं । बरवें शोधूनियां पाही ।।३।।येणे संसार सुखाचा । म्हणे नामा शिंपीयाचा ।।४।।- संत नामदेव महाराजसंत शिरोमणी नामदेव महाराजांनी संसार सुखाचा होण्यासाठी आणि परमात्म्याच्या कृपेसाठी दोन महत्त्वाचे मार्ग सांगितले आहेत.पहिला मार्ग आहे, दोष गुण सोडून द्यायचा. मुळात परमेश्वराची करुणा भाकणाºया संतांनी आपल्या गुणदोषांची प्रांजळ कबुली दिली आहे. देवापासून त्यांनी दोष लपविलेले नाही. कारण तो सर्वज्ञ आहे, हे त्यांना माहिती होते. आपल्यातील दोष गुण टाकून सद्गुण अंगी बाणवणे हीच परमार्थाची खरी वाटचाल आहे. वास्तविक पाहता हे दोष आपल्याला कळायला हवेत. आपण ते आपल्यात शोधून त्याचा त्याग करायला हवा. ‘माझे मज कळे । येती अवगुण । काय करू मन अनावर ।। असा जगद्गुरू तुकोबारायांचा कबुली जबाब महत्त्वाचा आहे. परनिंदा, स्वार्थीपणा, लोभीपणा इत्यादी अनेक दोष गुण आपल्यात आहेत, ते आपण सांडायला म्हणजे टाकायला हवेत.

पुढे नामदेवराय सर्वांभूती समभाव ठेवणं हीच गोड भक्तीची खूण म्हणून सांगतात. सर्वत्र समान भाव ठेवून भक्ती केली की भक्ताचे ज्ञानचक्षू उघडतात. कांदा, मुळा, भाजी, लसूण, मिरची, कोथिंबिरी हे रोजच्या जेवणातले पदार्थ. पण श्रीसंत सावता महाराजांची ज्ञानदृष्टी इतकी व्यापक की त्यांना सारेच हरिरुप वाटत असे. माझा मळा हा भावच संपुष्टात आला. सावतोबांचा मळाही विठ्ठलरुप झाला. ‘जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत’ हा सर्वांभूती भगवद् भावनेचा वस्तूपाठच ज्ञानदेवांनी दिला. अशा सर्वांभूती भगवत् भावनेलाच नामदेवांनी गोड भक्ती म्हटले आहे; आणि याच्यापेक्षा मोठे काहीही नाही, शोधून पहा हेही आवर्जून सांगायला विसरत नाहीत, तसेच अभंगाच्या शेवटच्या चरणात दोषगुणांचा त्याग व सर्वांभूती भगवद् भावना याच दोन गोष्टी सुखाचा संसार होण्याचा व पर्यायाने परमार्थ यशस्वी होण्याला कारणीभूत ठरतात, अशी ग्वाही नामदेवराय देतात.

अभंगातील या दोन बाबींचा विचार वारीच्या संदर्भाने केल्यास आपला परमार्थ सुखकर होण्यास मदत होईल. वारीला निघताना प्रत्येक वारकरी जी जबाबदारी आहे ती पूर्ण करून तरी किंवा तिची व्यवस्था लावून निघतो. घरात खायला मीठसुद्धा नाही आणि निघाला वारीला अशी वारी दोषपूर्ण ठरते म्हणून तर प्रपंच करावा नेटका असे आपल्याला संतांनी आवर्जून सांगितले. वारीत चालताना प्रत्येक वारकरी हा केवळ पांडुरंगांसाठीच चालत असतो, एकमेकाला धक्का जरी लागला तरी माऊली म्हणायचे, काही विचारायचे नाही, काही घ्यायचे, काही द्यायचे तरीही माऊली संबोधन ही वारीतली एकवाक्यता सर्वांभूती भगवद्भाव शिकवणुकीची पहिली पायरी होय. हाच वारीतला भाव आपल्याला जीवनात दृढ करायचा म्हणजे नक्की आपला संसार सुखाचा होईल. सर्वांभूती भगवद्भाव अंत:करणात साठल्याचा तपकिरे बाबांना आलेला प्रत्यय पाहून श्री शितोळे सरकार बाबांच्या पायावर नतमस्तक झाले.

आपला दैनंदिन संसार सुखाचा व्हावा असे ज्या साधक भक्ताला वाटत असेल त्याने गुणदोषांचा त्याग व सर्वांभूती भगवद्भाव या बाबी मनापासून स्वीकारून त्याप्रमाणे आचरण करायला हवे. परंतु, या गोष्टी समजण्यासाठी, आकलनासाठी आणि आचरणात आणताना सोप्या होण्यासाठी नामस्मरण सांगितले. पारमार्थिक जीवनाचा अविभाज्य अंग असलेल्या नामस्मरणाचा महिमा संत चोखोबांच्या शब्दात आपण उद्याचा अंकात पाहणार आहोत, क्रमश :- ह. भ. प. डॉ. अनंत महाराज बिडवे

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाAdhyatmikआध्यात्मिक