शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

मार्गदर्शक

By admin | Updated: August 12, 2016 13:22 IST

झोपेतून उठलेल्या भगवान श्रीकृष्णाचे लक्ष त्याच्या पायाशी बसलेल्या अर्जुनाकडे प्रथम जाते. नंतर त्याच्या उशाशी बसलेल्या दुर्योधनाकडे जाते.

- प्रा. डॉ. यशवंत पाटील
 
झोपेतून उठलेल्या भगवान श्रीकृष्णाचे लक्ष त्याच्या पायाशी बसलेल्या अर्जुनाकडे प्रथम जाते. नंतर त्याच्या उशाशी बसलेल्या दुर्योधनाकडे जाते. तेव्हा दुर्योधन श्रीकृष्णाकडे सर्व सैन्याची मागणी करतो. ‘तथास्तु’ म्हणून श्रीकृष्ण त्यास होकार देतो. प्रचंड सैन्यप्राप्तीमुळे दुर्योधन खूप आनंदी होतो. सारे काही मिळाल्याने युद्धात विजयी झाल्याचा ‘उन्मादी’ आनंद युद्ध सुरू होण्यापूर्वीच त्याला होतो.
नंतर अर्जुन श्रीकृष्णास आर्जवी नम्र स्वरांत विनंती करतो. ‘भगवान !, या युद्धात तुम्ही माझे मार्गदर्शक म्हणून रहा.’ ‘तथास्तु’ म्हणून श्रीकृष्ण मान्यता देतात. तेव्हा दुर्योधन अर्जुनास म्हणतो, ‘अरे अर्जुना, तुझ्या वाट्याला फक्त कृष्णच ! पण माझ्या वाट्याला बघ केवढे प्रचंड सैन्य !’ असे म्हणून तो उपहासाने हसतो.
महाभारतातील ही गोष्ट सर्व परिचित आहे. महाभारतात दुर्योधनासह प्रचंड फौज कशी पराभूत झाली आणि अर्जुन कसा विजयी झाला हे सर्वज्ञात आहे. अर्जुनाच्या विजयामागे त्याचा ‘कर्मयोग’ तर आहेच. पण त्याच्या रथाचे सारथ्य करणाऱ्या श्रीकृष्णाचे ‘मार्गदर्शन’ महत्त्वाचे आहे. त्या युद्धात श्रीकृष्ण योग्य दिशेने रथ नेत होता. अर्जुनाला सुयोग्य मार्गदर्शन करीत होता. त्याच्या मनात लढण्याची, योग्य-अयोग्य काय याची बिजे पेरीत होता. श्रीमद्भगवतगीतेत श्रीकृष्णाच्या मार्गदर्शक भूमिकेचे सर्व तत्त्वज्ञान व्यापक प्रमाणात आले आहे.
काल-मान-परिस्थिती कितीही बदलली तरीही ‘सत्यम्-शिवम्-सुंदरम्’सारखी मूल्ये चिरंतन असतात. उत्तम मार्गदर्शक व्यक्ती, कुटुंब, समाज, आजूबाजूचा भवताल सकारात्मक स्वरूपात बदलू शकतो, घडवू शकतो. विविध क्षेत्रात नावलौकिक, उत्तुंग यश मिळविणाऱ्या व्यक्तींनी ‘मार्गदर्शका’चे महत्त्व मान्य केले आहे. म्हणूनच मार्गदर्शकाची गरज आहे.