शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

लोभ सर्प डंखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 05:38 IST

एखाद्या निसर्ग चमत्काराचा मोह होणे ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे.

एखाद्या निसर्ग चमत्काराचा मोह होणे ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. जीवनाचे गीत गाणाऱ्या खळखळणाºया सलीलाचा, उंच-उंच डोंगरकड्यांवरून कोसळणाºया धबधब्याचा, इंद्रधनुष्याच्या सप्तरंगी मांडवाखाली पिसारा फुलविणाºया मयूराचा आनंदोत्सव पाहत राहणे हा माणसाच्या अंत:करणातील केवळ मोहच नाही, तर त्याच्या रसिक प्रवृत्तीचे शुभ लक्षण आहे. अशा काही स्वाभाविक मोहामुळे माणूस आतून निरोगी होतो व निकोप प्रवृत्तीने जगाकडे पाहू लागतो. जे आपले आहे, त्याला चिकटून बसणे आणि जे आपले नाही, ते ओरबाडण्यासाठी संपूर्ण समाज जीवनाला भयग्रस्त करणे, हेच खरे विकारी मनोवृत्तीचे लक्षण आहे. ही मोहग्रस्ताची जमात केवळ आजच वळवळ करत आहे असे नाही, तर अगदी महाभारताच्या कालखंडापासूनही धृतराष्ट्री प्रवृत्ती थैमान घालत आहे. या मोहरूपी सर्पाचे वर्र्णन करताना निर्मोही संत एकनाथ महाराज म्हणाले होते,लोभ सर्प डंखला करू काय?स्वार्थ संपत्तीने जड झाले पाय।गुरू गारुडी आला धावुनीविवेक अंजन घातले नयनी वों ॥गुरू नावाचा गारुडी जोपर्यंत डोळ्यांत विचारांचे अंजन घालत नाही, तोपर्यंत डोक्यात सद्विचारांचे संवर्धन होत नाही आणि जोपर्यंत विचारांच्या खºया-खुºया परमार्थाचे जल समाजातील शेवटच्या घटकापर्यंत झुळझुळत नाही, तोपर्यंत स्वार्थ आणि संपत्तीच्या बाजारात हजारो पामरे रडतच राहतात. हे काम समाजातील ज्या कर्णधाराकडे आहे, तेच आज दुर्दैवाने मोहफणीने ग्रस्त होऊन रम, रमा, रमीमध्ये रममाण होत आहेत. अंगावर एक लंगोटी, झोपायला धरतीचे आसन, पांघरायला आकाशाचे पांघरुण आणि खायला चार घरांतील भिक्षा एवढीच ज्याची संपत्ती असावी, असा साधू, संत आज आकाश पुष्पाप्रमाणे दुर्मीळ होत आहे.- प्रा. शिवाजीराव भुकेलें