शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

सुखी होणे सोपे, दु:खी होणे कठीण - भाग 1

By admin | Updated: August 12, 2016 14:55 IST

सुखी होणे सोपे, दु:खी होणे कठीण. हा विषय अगदी आगळा व वेगळा असा आहे. सुखी होणे सोपे, दु:खी होणे कठीण हे वाचल्यानंतर माझी खात्री आहे की

- सदगुरू श्री वामनराव पै
 
आपण सर्व सुखी होवूया.
सुखी होणे सोपे, दु:खी होणे कठीण. हा विषय अगदी आगळा व वेगळा असा आहे. सुखी होणे सोपे, दु:खी होणे कठीण हे वाचल्यानंतर माझी खात्री आहे की तुम्हांला असे वाटले असेल की वामनराव कुठेतरी चुकत आहेत. दु:खी होणे सोपे सुखी होणे कठीण असे म्हणायला पाहिजे होते हयाऐवजी वामनराव चुकीने उलट सांगत आहेत असे तुम्हांला वाटण्याची शक्यता आहे. तुम्हांला असे वाटण्याचे कारण असे की आपण आतापर्यत जे काही वाचत आलो, ऐकत आलो ते असे की सुख पहाता जवापाडे दु:ख पर्वताएवढे. सुख किती? जवाएवढे व दु:ख किती? पर्वताएवढे, पण जीवनविद्या असे सांगते की सुख पर्वताएवढे व दु:ख जवाएवढे असे व्हायला पाहिजे. असे होवू शकते पण त्यासाठी काय केले पाहिजे हे महत्वाचे आहे. दु:ख हे जन्मापासूनच माणसाच्या पाठीमागे लागते असे म्हटले जाते. जन्म दु:खम जरा दु:खम असे कुणीतरी एके ठिकाणी म्हटलेले आहे. जन्माला आल्यापासून दु:ख जे मागे लागते ते अगदी मरेपर्यंत असे म्हणण्याचा हेतू आहे. एके ठिकाणी असेही म्हटलेले आहे की “संसारा मानी जो सुख तो परममुर्ख“.  “संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची” असेही म्हटलेले आहे. कुणी काय काय म्हटलेले आहे हयाची मला जाणीव आहे तरीही मी सांगतो सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण. तुम्ही म्हणाल वामनराव आम्ही जे काही आतापर्यंत ऐकले त्याच्या नेमके उलट तुम्ही सांगता हे कसे. आम्ही आतापर्यंत ऐकत आलो की परमेश्वर कॄपा करतो किंवा कोप करतो पण तुम्ही म्हणता परमेश्वर कॄपाही करत नाही व कोपही करत नाही. तुमच्या जीवनविद्येत सगळेच आगळे वेगळे कसे? जीवनविद्येचे तत्वज्ञान खरेच आगळेवेगळे आहे ते तुम्ही समजावून घ्यावे, ते तुम्ही आचरणांत आणावे व तुम्ही सुखी व्हावे किंबहूना तुम्ही आम्ही सगळेच सुखी व्हावेत अशी जीवनविद्येची संकल्पना आहे. जीवनविद्येला असे मनापासून वाटते आपण सर्वांनी सुखी होवूया. काही जण सुखी तर काही जण दु:खी हे काही बरोबर नाही. आपण सर्व सुखी होवूया ही जीवनविद्येची भावना आहे, धारणा आहे. जीवनविद्येची ही धारणा लक्षांत घेवून जर तुम्ही जीवनविद्येचे तत्वज्ञान समजून घेतलेत तर तुम्हांला जीवनविद्येचे महत्व, महात्म्य कळून चुकेल. प्रश्न असा निर्माण होतो की सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण हे तुम्ही सांगता हे कसे काय कारण आमचा आतापर्यंतचा अनुभव असा आहे की दु:खी होणे सोपे सुखी होणे कठीण. बरे हा अनुभव आमचाच आहे असा नव्हे तर पुरातन काळापासून तर आजतागायत हाच अनुभव आहे.
क्रमश: