शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

प्रभाते मनी राम चिंतीत जावा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 18:40 IST

संसाराचे चिंतन केल्यास आपल्याला दुःख प्राप्त होईल आणि देवाचे चिंतन केले तर सुख प्राप्त होईल.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

श्री समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकांची रचना केली. त्यांनी मनाच्या श्लोकांतून मनाला उपदेश केला. अध्यात्मशास्त्रात मन नावाच्या इंद्रियावरच सगळे अवलंबून आहे. मानवी जीवनाचे अंतीम ध्येय मुक्ती हेच आहे पण प्रश्न असा आहे की, मुक्ती तरी कुणाला..? देहाला का..? आत्म्याला का..? मुक्त व्हावयाचे म्हणजे नेमके कशापासून मुक्त व्हावयाचे..? देहापासून तर सगळेच मुक्त होतात. आत्मा तर नित्यच मुक्त आहे कारण ते ईश्वरी चैतन्य आहे मग मुक्ती कुणाला..? तर ज्या वासनेमुळे पुन्हा पुन्हा अनेक देहांत जन्माला यावे लागते त्या वासनेपासून मुक्ती अभिप्रेत आहे कारण जन्म मरणाला कारण वासनाच आहे. तुकाराम महाराज म्हणतात -

जन्म घेणे लागे वासनेच्या संगे ।तोचि होय अंगे हरिरुप ॥

वासनेला कारण काय तर मन..! म्हणून श्रीसमर्थ मनाला उपदेश करतात, प्रभाते मनी राम चिंतीत जावा..!आता मन म्हणजे तरी काय..? शास्त्रकार सांगतात -

संकल्प विकल्पात्मकं मनः..!

संकल्प विकल्पात्मक वृत्ती म्हणजे मन..! अंतःकरणाचे चार भाग असतात.१.मन२.बुद्धी३.चित्त४.अहंकार

संकल्प विकल्पात्मक वृत्ती म्हणजे मन.!निर्णयात्मक भूमिका घेणारी वृत्ती म्हणजे बुद्धी.!चिंतन करणारी चित्त.!आणिअहंभावात्मक वृत्ती म्हणजे अहंकार.!

एखाद्या विषयाचे सतत अनुसंधान असणे याला चिंतन असे म्हणतात. मनुष्य सतत कशाचे तरी चिंतन करीतच असतो. चिंतनाशिवाय तो राहूच शकत नाही पण चिंतन तरी कुणाचे करावे..? आत्मवस्तूचे की अनात्म वस्तूचे..? चिंतनाचा परिणाम सांगतांना शास्त्रकार सांगतात - 

चिंतने चिंतने तद्रूपता..!

आपण ज्याचे चिंतन करु त्याचं स्वरुप आपल्याला प्राप्त होते. मग चिंतन कुणाचं करावे..? जर संसाराचे चिंतन केले तर संसाराचे स्वरुप आपल्याला प्राप्त होईल आणि देवाचे चिंतन केलं तर देवाचे स्वरुप प्राप्त होईल. आता संसाराचे स्वरुप कोणतं आहे. तुकाराम महाराज म्हणतात -

दुःख बांदवडी आहे हा संसार ।सुखाचा विचार नाही कोठे ॥

संसाराचे चिंतन केल्यास आपल्याला दुःख प्राप्त होईल आणि देवाचे चिंतन केले तर सुख प्राप्त होईल. म्हणून श्रीसमर्थ या मनाला उपदेश करतात -हे मना..! प्रभाते मनी राम चिंतीत जावा..!

( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणभाष - ८३२९८७८४६७ ) 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक