शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

भगवद्गीता भाष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 02:51 IST

ज्ञानेंद्रियादी इंद्रियांना या संवादाची जाणीव होऊ न देता, गीतेमधल्या श्रेष्ठ तत्त्वज्ञानाचा रस प्रत्यक्ष चाखावा. गीतेमधले अर्थभारले श्लोक त्यातला प्रत्येक शब्द प्रकट होण्यापूर्वीच त्यातून व्यक्त होणाऱ्या शाश्वत सिद्धांतांना आपण गाढ आलिंगन द्यावे.

- वामन देशपांडे

ज्ञानदेवांनी भगवद्गीतेविषयी विचार प्रगट करीत असताना श्रोत्यांना मोठ्या प्रेमाने सांगतात की,हे शब्देंवीण संवादिजे। इंद्रिया नेणतां भोगिजे।बोलाआदि झोंबिजे। प्रमेयासी।जैसे भ्रमर परागु नेती। परी कमळदकें नेणती।तैसी परी आहे सेविती। ग्रंथी इथे।ज्ञानेंद्रियादी इंद्रियांना या संवादाची जाणीव होऊ न देता, गीतेमधल्या श्रेष्ठ तत्त्वज्ञानाचा रस प्रत्यक्ष चाखावा. गीतेमधले अर्थभारले श्लोक त्यातला प्रत्येक शब्द प्रकट होण्यापूर्वीच त्यातून व्यक्त होणाऱ्या शाश्वत सिद्धांतांना आपण गाढ आलिंगन द्यावे. भोवती गुणगुणणारा भ्रमर जसा, जे कमळ उमलून आलेले असते, त्या कमळाला अजिबात जाणीव होणार नाही याची काळजी घेत, त्यातल्या परागाचे जसे सेवन करतो ना, तसा गीतार्थाचा शाश्वत आनंद आपण मनमोकळेपणाने लुटावा. चित्त एकाग्र करून गीतेची अत्यंत संवेदनशील मनाने आनंद घेत, गीतार्थाचा पूर्ण उपभोग घ्यावा. ज्ञानदेव अत्यंत विनम्र स्वरात गीताभाष्य सुरू होण्यापूर्वी म्हणतात, माझे गीताभाष्य म्हणजे तुम्हा पंडित मंडळींना बोबडे बोल वाटतील. मी तर तुमच्यासमोर लहान मूलच आहे. तुम्ही तर माझे मायबाप आहात. मूल बोबडे जरी बोलले, तरी आईवडिलांना आनंदच होतो. कारण एकच ते बोबडे बोलणारे बाळ त्यांचेच असते. श्रोतेहो, तुम्ही संतहृदयी आहात, हे मला ज्ञात आहे. म्हणून मला खात्री वाटते की, या माझ्या गीताभाष्यप्रसंगी काही चुका झाल्या, तुम्हाला माझ्या या भाष्यामध्ये जरी दोष आढळले, तरी तुम्ही माझे दोष आणि झालेल्या चुका पोटात घालाल. तरीही एक मी कबूल करतोपरी अपराधु तो आणीक आहे।जे मी गीतार्थु कवळू पाहें।ते अवधारा विनवू लाहे। म्हणउनिया।श्रोतेहो, तुम्ही माझे मायबाप आहात, म्हणून माझ्या मनातले गीतेविषयीचे जे भाव आहेत, ते प्रकट करतो. मला हे ज्ञात आहे की, गीतेवर भाष्य करणे सोपे काम नाही, तरीही मी गुर्वाज्ञेने गीताभाष्य करायला तुमच्यासमोर बसलो, हाच माझा फार मोठा अपराध आहे. मी गीतार्थाला आलिंंगन देऊ पहातोय, परंतु मी दुर्बल आहे, हे ठाऊक असूनही मी तुम्हाला विनवणी केली. गीताभाष्यापूर्वी ज्ञानदेवांनी विनम्र भूमिका घेतली. ज्ञानदेवांचे सद्गुरू श्रीनिवृत्तीनाथ, त्यांच्यासमोरच बसलेले होते. वास्तविक पाहता, हा श्रोतृसंवाद आपल्या सद्गुरूंना आपली मर्यादा कथन करण्यासाठी ज्ञानदेव प्रगट करीत होते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक