शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

आनंद तरंग - आहार तसा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 05:36 IST

‘भूक’ ही माणसाच्या पाठीमागे लागलेली नैसर्गिक प्रक्रिया आहे

प्रा. शिवाजीराव भुकेले‘भूक’ ही माणसाच्या पाठीमागे लागलेली नैसर्गिक प्रक्रिया आहे. उच्चपदस्थापासून ते भणंग भिकाऱ्यापर्यंत साऱ्यांचीच धडपड भाकरीसाठी चाललेली आहे. फरक एवढाच की, भणंग भिकाºयाच्या झोळीत कोरभर भाकरी पडली की, तो देणाºयाला आशीर्वाद देऊन एखाद्या खडकावर बसून भाकरी खातो. याउलट अनेक उच्चपदस्थ पंचतारांकित हॉटेलमध्ये साजूक तुपातल्या नळ्यांवर आणि कधीतरी पोळ्यांवर ताव मारतात, पण नळ्या आल्या की, मद्याचे चषक रिते होणे आलेच. एकदा नळी आणि मदिरा नावांची चंचला पोटात रिचवली की, चालणारा रांगू लागतो आणि रांगणारा आडवा होऊ लागतो. तेव्हा एक गोष्ट लक्षात असू द्यावी की, माणसाचे जर पशूत रूपांतर व्हायचे नसेल, तर माणसाने जगण्यासाठी खावे खाण्यासाठी जगू नये. कारण माणूस हा एकमेव प्राणी असा आहे की, त्याला पोटाच्या भुकेबरोबर वेगवेगळ्या ‘भुका’ लागलेल्या आहेत. कधी-कधी तो गरज नसताना नको ते खात राहतो, तर कधी गरज असताना त्याला खायलाच मिळत नाही. जर त्याचा प्राण अन्नमय आहे, तर त्याने खाल्लेच पाहिजे, परंतु काय खाल्ले पाहिजे, याचा सारासार विवेक प्रकट करताना ज्ञानेश्वर माउली म्हणतात,

जैसा घेणे आहार, धातु तैसाची होय आकारआणि धातु ऐंसा अकार, भाव पोखे ॥म्हणौनिक सात्त्विक रस सेवीजे, तै सत्त्वीच वाढी पाविजें ।राजसा तमसा होईजे, येरी रजीं॥

ज्ञानेश्वर माउलीने आहाराचे तामस, राजस आणि सात्त्विक असे तीन प्रकार सांगितले आहेत. सर्वसाधारणपणे जे माणसाने खाणे योग्य नाही, तो तामस आहार होय. वाघ-सिंंहाने अख्खी बकरी आणि हरीण खावे, पण माणसाने मात्र मेंदूला चांगल्या रक्ताचा पुरवठा होण्यासाठी व चांगल्या विचारांचा प्रवाह प्रवाहित करण्यासाठी सात्त्विकआहार घ्यावा. याचा अर्थ असाही नाही की, सगळीच शाकाहारी माणसे सात्त्विक विचारांची असतात. बºयाच वेळी त्यांच्यासुद्धा ‘मुँह में राम आणि बगल में छुरी’ असते. आहार घेताना वृत्ती जर तमोगुणी असेल, तर शुद्ध शाकाहार घेऊन तरी काय उपयोग? पण त्याने वाघासारखी अख्खी बकरी किंवा हरीणही खाऊ नये आणि कुत्र्या-मांजरासारखे चार-आठ दिवस कुजवून ठेवलेले ‘धाबा संस्कृती’मधील मद्य, मासही खाऊ-पिऊ नये. निरुपद्रवी प्राण्यांना खाऊन टाकणाºया अशा माणसांच्या विषयी संत कबिराने म्हटले होते -

बकरी पाँती खात है, ताकी काढीखालजो जान बकरी खात है, उनका कौन हवाल।

आपण काय खातोय? हे सुद्धा न दिसण्याच्या ‘रात्री’ भारतात पशुत्वाचा अंधकार दाटून आणत असताना सात्त्विकशाकाहाराचा माझ्यासारख्या पापभिरूमाणसांनी आग्रह धरणे हे फारच मागासलेपणाचे होईल नाही का? पण निदान आपण काय खातो? कोठे खातो? कुणाचे खातो? जो आज फुकटचे खायला घालतोय, त्याने आज बकºयाच्या मानेवर सुरी फिरवलीय. उद्या आपल्याच मानेवर तर फिरवणार नाही ना? याचा विवेक तरी खाणाºयाच्या ठिकाणी असावा. सर्वांनीच शाकाहारी खाणे सुरूकेले, तर उद्या पृथ्वीचा लगेच स्वर्ग होणार नाही, पण ज्यावेळी जेवढे आवश्यक आहे तेवढेच खाल्ले, तर अनेक निरोगी माणसेच या पृथ्वीचा स्वर्ग करतील, या वैद्यकीय तत्त्वावर मात्र माझा विश्वास आहे. महावीर, कबीर, बसवेश्वर, ज्ञानेश्वर, तुकाराम आदी प्रेषितांनी शुद्ध शाकाहाराचा आग्रह केवळ एवढ्यासाठीच धरला होता की, यामुळे अहिंसक प्रवृत्तीच्या सज्जनांची मांदियाळी निर्माण होईल. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक