शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - आहार तसा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 05:36 IST

‘भूक’ ही माणसाच्या पाठीमागे लागलेली नैसर्गिक प्रक्रिया आहे

प्रा. शिवाजीराव भुकेले‘भूक’ ही माणसाच्या पाठीमागे लागलेली नैसर्गिक प्रक्रिया आहे. उच्चपदस्थापासून ते भणंग भिकाऱ्यापर्यंत साऱ्यांचीच धडपड भाकरीसाठी चाललेली आहे. फरक एवढाच की, भणंग भिकाºयाच्या झोळीत कोरभर भाकरी पडली की, तो देणाºयाला आशीर्वाद देऊन एखाद्या खडकावर बसून भाकरी खातो. याउलट अनेक उच्चपदस्थ पंचतारांकित हॉटेलमध्ये साजूक तुपातल्या नळ्यांवर आणि कधीतरी पोळ्यांवर ताव मारतात, पण नळ्या आल्या की, मद्याचे चषक रिते होणे आलेच. एकदा नळी आणि मदिरा नावांची चंचला पोटात रिचवली की, चालणारा रांगू लागतो आणि रांगणारा आडवा होऊ लागतो. तेव्हा एक गोष्ट लक्षात असू द्यावी की, माणसाचे जर पशूत रूपांतर व्हायचे नसेल, तर माणसाने जगण्यासाठी खावे खाण्यासाठी जगू नये. कारण माणूस हा एकमेव प्राणी असा आहे की, त्याला पोटाच्या भुकेबरोबर वेगवेगळ्या ‘भुका’ लागलेल्या आहेत. कधी-कधी तो गरज नसताना नको ते खात राहतो, तर कधी गरज असताना त्याला खायलाच मिळत नाही. जर त्याचा प्राण अन्नमय आहे, तर त्याने खाल्लेच पाहिजे, परंतु काय खाल्ले पाहिजे, याचा सारासार विवेक प्रकट करताना ज्ञानेश्वर माउली म्हणतात,

जैसा घेणे आहार, धातु तैसाची होय आकारआणि धातु ऐंसा अकार, भाव पोखे ॥म्हणौनिक सात्त्विक रस सेवीजे, तै सत्त्वीच वाढी पाविजें ।राजसा तमसा होईजे, येरी रजीं॥

ज्ञानेश्वर माउलीने आहाराचे तामस, राजस आणि सात्त्विक असे तीन प्रकार सांगितले आहेत. सर्वसाधारणपणे जे माणसाने खाणे योग्य नाही, तो तामस आहार होय. वाघ-सिंंहाने अख्खी बकरी आणि हरीण खावे, पण माणसाने मात्र मेंदूला चांगल्या रक्ताचा पुरवठा होण्यासाठी व चांगल्या विचारांचा प्रवाह प्रवाहित करण्यासाठी सात्त्विकआहार घ्यावा. याचा अर्थ असाही नाही की, सगळीच शाकाहारी माणसे सात्त्विक विचारांची असतात. बºयाच वेळी त्यांच्यासुद्धा ‘मुँह में राम आणि बगल में छुरी’ असते. आहार घेताना वृत्ती जर तमोगुणी असेल, तर शुद्ध शाकाहार घेऊन तरी काय उपयोग? पण त्याने वाघासारखी अख्खी बकरी किंवा हरीणही खाऊ नये आणि कुत्र्या-मांजरासारखे चार-आठ दिवस कुजवून ठेवलेले ‘धाबा संस्कृती’मधील मद्य, मासही खाऊ-पिऊ नये. निरुपद्रवी प्राण्यांना खाऊन टाकणाºया अशा माणसांच्या विषयी संत कबिराने म्हटले होते -

बकरी पाँती खात है, ताकी काढीखालजो जान बकरी खात है, उनका कौन हवाल।

आपण काय खातोय? हे सुद्धा न दिसण्याच्या ‘रात्री’ भारतात पशुत्वाचा अंधकार दाटून आणत असताना सात्त्विकशाकाहाराचा माझ्यासारख्या पापभिरूमाणसांनी आग्रह धरणे हे फारच मागासलेपणाचे होईल नाही का? पण निदान आपण काय खातो? कोठे खातो? कुणाचे खातो? जो आज फुकटचे खायला घालतोय, त्याने आज बकºयाच्या मानेवर सुरी फिरवलीय. उद्या आपल्याच मानेवर तर फिरवणार नाही ना? याचा विवेक तरी खाणाºयाच्या ठिकाणी असावा. सर्वांनीच शाकाहारी खाणे सुरूकेले, तर उद्या पृथ्वीचा लगेच स्वर्ग होणार नाही, पण ज्यावेळी जेवढे आवश्यक आहे तेवढेच खाल्ले, तर अनेक निरोगी माणसेच या पृथ्वीचा स्वर्ग करतील, या वैद्यकीय तत्त्वावर मात्र माझा विश्वास आहे. महावीर, कबीर, बसवेश्वर, ज्ञानेश्वर, तुकाराम आदी प्रेषितांनी शुद्ध शाकाहाराचा आग्रह केवळ एवढ्यासाठीच धरला होता की, यामुळे अहिंसक प्रवृत्तीच्या सज्जनांची मांदियाळी निर्माण होईल. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक