शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

यवतमाळ नगरपरिषदेचा अर्थसंकल्प २५० कोटींचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 06:00 IST

यवतमाळ नगरपरिषदेत लगतच्या ग्रामपंचायतींना विलीन करण्यात आले. तेव्हापासून शहराच्या विकासाची गती मंदावल्याचा आरोप होत आहे. अर्थसंकल्पामध्ये ही झिज भरून काढण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. २५० कोटींच्या बजेटमध्ये ८९ कोटींचे शिलकीचे बजेट शुक्रवारी सभागृहात सादर होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे५१ कोटींची कामे प्रस्तावीत : हद्दवाढ क्षेत्रासाठी पाच कोटींचा निधी राखीव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेचे यंदाचे बजेट शिलकीचा सादर केले जाण्याची शक्यता आहे. हे बजेट २५० कोटींच्या घरात असण्याचा अंदाज आहे. हद्दवाढ क्षेत्रासाठी मोठा निधी आरक्षित करण्यात आला आहे. महाविकास आघाडी शासनाने हरितपट्ट्यावर विशेष लक्ष केंद्र्रित केले आहे. त्यानुसार शहराच्या हरितपट्टे विकासाकरिता तीन कोटींचा निधी आरक्षित केला आहे.यवतमाळ नगरपरिषदेत लगतच्या ग्रामपंचायतींना विलीन करण्यात आले. तेव्हापासून शहराच्या विकासाची गती मंदावल्याचा आरोप होत आहे. अर्थसंकल्पामध्ये ही झिज भरून काढण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.२५० कोटींच्या बजेटमध्ये ८९ कोटींचे शिलकीचे बजेट शुक्रवारी सभागृहात सादर होण्याची शक्यता आहे. यामध्ये शहर विकासाकरिता ५१ कोटींचे बजेट सादर होण्याचा अंदाज आहे. ३ कोटी रूपये हरितपट्टे विकासाकरिता राखीव होणार आहे. नाट्यगृह, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, नगरपरिषद क्षेत्रातील हद्दवाढीसह विकास, प्रधानमंत्री जनविकास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, घनकचरा डीपीआर यासारख्या विविध योजनांवर केंद्र आणि राज्य शासनाकडून येणारा निधी प्रस्तावित ठेवण्यात आला आहे.याशिवाय नगरपरिषदेच्या दैनंदिन कामकाजाचा खर्चही मोठा आहे. या कामासाठी तरतूदही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. साफसफाई गाड्या, डिझेल पेट्रोल खर्च, संडास दुरूस्ती, घनकचरा विल्हेवाट, शहरातील प्रमुख नाल्याची सफाई, मोकाट जनावरे, कोंडवाडा यासह विविध उपाययोजनांचा खर्च मोठा आहे. यवतमाळ नगरपालिकेच्या अर्थसंकल्पाकडे जवळपास पावणे तीन लाख लोकांच्या नजरा आहे.केंद्र व राज्याच्या निधीचीच आकडेमोडनगरपरिषदेच्या स्वत:च्या उत्पन्नाचा अर्थसंकल्प अपेक्षित आहे. मात्र केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा प्रस्तावित निधी दाखवून हा बजेट तयार केला आहे. पालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत मजबूत करण्याचे काम झाले नाही. दुकान गाळ्यांची भाडेवाढ, अवैध बांधकामावरचा दंड, विविध जागांवर व्यापार संकुलाची निर्मिती, कचऱ्यापासून खताची निर्मिती याकडे दुर्लक्ष आहे.नगराध्यक्षांना डावलून बनला अर्थसंकल्पनगरपरिषदेचे बजेट नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि लेखापालांच्या स्वाक्षरीने सादर होते. २०२०-२१ वर्षाचे बजेट नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीविनाच सादर होणार आहे. हे बजेट बनविताना नगराध्यक्षांना विश्वासात घेतले गेले नाही. यामुळे अनेक विकास योजनांच्या नवीन कल्पना थांबल्या आहेत. एकूणच कुरघोडीच्या राजकारणाचे चित्र अर्थसंकल्पीय सभेत दिसण्याची शक्यता आहे.बीओटी तत्वावर बगीचांची देखभाल दुरूस्तीशहरातील बगीचांची दैनावस्था झाली आहे. त्याचे मेन्टनंस नगरपरिषदेच्या हाताबाहेर गेले. यामुळे बगीच्यांना बकाल रूप प्राप्त झाले आहे. पुढील काळात बगीचा टिकविण्यासाठी बीओटी तत्वावरील प्रस्ताव अर्थसंकल्पातून पुढे येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका