शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

यवतमाळ बाजार समितीत लूट

By admin | Updated: January 24, 2015 02:03 IST

लिलाव म्हटला की स्पर्धा आलीच. मात्र केवळ दोन व्यापारी बोली बोलण्यासाठी उपलब्ध असतील तर ही स्पर्धाच संपुष्टात येते.

यवतमाळ : लिलाव म्हटला की स्पर्धा आलीच. मात्र केवळ दोन व्यापारी बोली बोलण्यासाठी उपलब्ध असतील तर ही स्पर्धाच संपुष्टात येते. पर्यायाने शेतमालाचे भाव संगनमताने पाडून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. हा प्रकार शुक्रवारी यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत बघायला मिळाला. सोयाबीन आणि तूर या शेतमालाचे शेकडो ढीग ओट्यावर असताना केवळ तीन व्यापारी (त्यातही दोघे भागीदार) लिलावात बोली बोलत होते. सोन्यासारखा शेतमाल कवडीमोल भावात लिलाव केल्याचे पाहून एका शेतकऱ्याने तर चक्क माल विकायचा नाही, असे म्हणून संताप व्यक्त केला. मात्र या गंभीर बाबीकडे बाजार समिती प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. बहुदा हा प्रकार आर्थिक हितसंबंधातून चालत असावा, असाही संशय यावेळी उपस्थित होत होता.निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. ऐनवेळी पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतमालाचे उत्पन्न घटले. कापूस आणि सोयाबीनने दगा दिल्यानंतर शेतकऱ्यांची तूर पिकावर भिस्त होती. सध्या तूर पिकाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे. सोयाबीन आणि कापूस ही पिके हातून गेल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी काढणी झाल्याबरोबर नड भागविण्यासाठी तूर विक्रीस आणण्याचा सपाटा चालविला आहे. काही शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक असल्याने त्याचीही आवक आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळीच वाहनाद्वारे, बैलगाडीने शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि तूर विक्रीस आणली. पाहता पाहता बाजार समितीच्या आवारातील ओट्यांवर शेतकऱ्यांच्या मालाचे शेकडो ढीग लागले. मात्र रेकॉर्डवर असलेले परवानाधारक व्यापारी यावेळी उपस्थित नव्हते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास तुरीच्या लिलावाला सुरुवात झाली. मात्र केवळ तीन व्यापारी लिलावात सहभागी झाले. ‘एक ढीग तू आणि एक ढीग मी’ असा प्रकार साधारणत: त्या व्यापाऱ्यांमध्ये दिसून येत होता. तीनच व्यापारी असल्याने कुठलीही स्पर्धा नव्हती. त्यामुळे अपेक्षित भाव शेतकऱ्यांच्या मालाला मिळत नव्हते. तुरीच्या बाबतीत नव्हे तर सोयाबीनच्या बाबतीतही हाच प्रकार दिसून आला. बाजार समितीच्या रेकॉर्डवर परवानाधारक अनेक व्यापारी (खरेदीदार) आहेत. असे असताना केवळ तीन व्यापारीच बोली बोलत असताना दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. काही शेतकऱ्यांनी तर बाजार समितीच्या आणि व्यापाऱ्यांच्या साखळीची तीव्र शब्दात निंदा केली. बाजार समितीच्या प्रशासनाची सहमती असल्याशिवाय असा प्रकार घडू शकत नाही. लिलाव सुरू असताना त्यांनी या बाबीकडे लक्ष द्यायला पाहिजे. खरेदीदार अत्यल्प असतील तर त्यांना जाब विचारला पाहिजे. तेव्हाच शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे योग्य दर मिळतील, असा सूरही शेतकऱ्यातून यावेळी उमटत होता. (स्थानिक प्रतिनिधी)