शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ बाजार समितीत लूट

By admin | Updated: January 24, 2015 02:03 IST

लिलाव म्हटला की स्पर्धा आलीच. मात्र केवळ दोन व्यापारी बोली बोलण्यासाठी उपलब्ध असतील तर ही स्पर्धाच संपुष्टात येते.

यवतमाळ : लिलाव म्हटला की स्पर्धा आलीच. मात्र केवळ दोन व्यापारी बोली बोलण्यासाठी उपलब्ध असतील तर ही स्पर्धाच संपुष्टात येते. पर्यायाने शेतमालाचे भाव संगनमताने पाडून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. हा प्रकार शुक्रवारी यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत बघायला मिळाला. सोयाबीन आणि तूर या शेतमालाचे शेकडो ढीग ओट्यावर असताना केवळ तीन व्यापारी (त्यातही दोघे भागीदार) लिलावात बोली बोलत होते. सोन्यासारखा शेतमाल कवडीमोल भावात लिलाव केल्याचे पाहून एका शेतकऱ्याने तर चक्क माल विकायचा नाही, असे म्हणून संताप व्यक्त केला. मात्र या गंभीर बाबीकडे बाजार समिती प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. बहुदा हा प्रकार आर्थिक हितसंबंधातून चालत असावा, असाही संशय यावेळी उपस्थित होत होता.निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. ऐनवेळी पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतमालाचे उत्पन्न घटले. कापूस आणि सोयाबीनने दगा दिल्यानंतर शेतकऱ्यांची तूर पिकावर भिस्त होती. सध्या तूर पिकाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे. सोयाबीन आणि कापूस ही पिके हातून गेल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी काढणी झाल्याबरोबर नड भागविण्यासाठी तूर विक्रीस आणण्याचा सपाटा चालविला आहे. काही शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक असल्याने त्याचीही आवक आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळीच वाहनाद्वारे, बैलगाडीने शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि तूर विक्रीस आणली. पाहता पाहता बाजार समितीच्या आवारातील ओट्यांवर शेतकऱ्यांच्या मालाचे शेकडो ढीग लागले. मात्र रेकॉर्डवर असलेले परवानाधारक व्यापारी यावेळी उपस्थित नव्हते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास तुरीच्या लिलावाला सुरुवात झाली. मात्र केवळ तीन व्यापारी लिलावात सहभागी झाले. ‘एक ढीग तू आणि एक ढीग मी’ असा प्रकार साधारणत: त्या व्यापाऱ्यांमध्ये दिसून येत होता. तीनच व्यापारी असल्याने कुठलीही स्पर्धा नव्हती. त्यामुळे अपेक्षित भाव शेतकऱ्यांच्या मालाला मिळत नव्हते. तुरीच्या बाबतीत नव्हे तर सोयाबीनच्या बाबतीतही हाच प्रकार दिसून आला. बाजार समितीच्या रेकॉर्डवर परवानाधारक अनेक व्यापारी (खरेदीदार) आहेत. असे असताना केवळ तीन व्यापारीच बोली बोलत असताना दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. काही शेतकऱ्यांनी तर बाजार समितीच्या आणि व्यापाऱ्यांच्या साखळीची तीव्र शब्दात निंदा केली. बाजार समितीच्या प्रशासनाची सहमती असल्याशिवाय असा प्रकार घडू शकत नाही. लिलाव सुरू असताना त्यांनी या बाबीकडे लक्ष द्यायला पाहिजे. खरेदीदार अत्यल्प असतील तर त्यांना जाब विचारला पाहिजे. तेव्हाच शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे योग्य दर मिळतील, असा सूरही शेतकऱ्यातून यावेळी उमटत होता. (स्थानिक प्रतिनिधी)