शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

यवतमाळ बाजार समितीत लूट

By admin | Updated: January 24, 2015 02:03 IST

लिलाव म्हटला की स्पर्धा आलीच. मात्र केवळ दोन व्यापारी बोली बोलण्यासाठी उपलब्ध असतील तर ही स्पर्धाच संपुष्टात येते.

यवतमाळ : लिलाव म्हटला की स्पर्धा आलीच. मात्र केवळ दोन व्यापारी बोली बोलण्यासाठी उपलब्ध असतील तर ही स्पर्धाच संपुष्टात येते. पर्यायाने शेतमालाचे भाव संगनमताने पाडून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. हा प्रकार शुक्रवारी यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत बघायला मिळाला. सोयाबीन आणि तूर या शेतमालाचे शेकडो ढीग ओट्यावर असताना केवळ तीन व्यापारी (त्यातही दोघे भागीदार) लिलावात बोली बोलत होते. सोन्यासारखा शेतमाल कवडीमोल भावात लिलाव केल्याचे पाहून एका शेतकऱ्याने तर चक्क माल विकायचा नाही, असे म्हणून संताप व्यक्त केला. मात्र या गंभीर बाबीकडे बाजार समिती प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. बहुदा हा प्रकार आर्थिक हितसंबंधातून चालत असावा, असाही संशय यावेळी उपस्थित होत होता.निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. ऐनवेळी पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतमालाचे उत्पन्न घटले. कापूस आणि सोयाबीनने दगा दिल्यानंतर शेतकऱ्यांची तूर पिकावर भिस्त होती. सध्या तूर पिकाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे. सोयाबीन आणि कापूस ही पिके हातून गेल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी काढणी झाल्याबरोबर नड भागविण्यासाठी तूर विक्रीस आणण्याचा सपाटा चालविला आहे. काही शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक असल्याने त्याचीही आवक आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळीच वाहनाद्वारे, बैलगाडीने शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि तूर विक्रीस आणली. पाहता पाहता बाजार समितीच्या आवारातील ओट्यांवर शेतकऱ्यांच्या मालाचे शेकडो ढीग लागले. मात्र रेकॉर्डवर असलेले परवानाधारक व्यापारी यावेळी उपस्थित नव्हते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास तुरीच्या लिलावाला सुरुवात झाली. मात्र केवळ तीन व्यापारी लिलावात सहभागी झाले. ‘एक ढीग तू आणि एक ढीग मी’ असा प्रकार साधारणत: त्या व्यापाऱ्यांमध्ये दिसून येत होता. तीनच व्यापारी असल्याने कुठलीही स्पर्धा नव्हती. त्यामुळे अपेक्षित भाव शेतकऱ्यांच्या मालाला मिळत नव्हते. तुरीच्या बाबतीत नव्हे तर सोयाबीनच्या बाबतीतही हाच प्रकार दिसून आला. बाजार समितीच्या रेकॉर्डवर परवानाधारक अनेक व्यापारी (खरेदीदार) आहेत. असे असताना केवळ तीन व्यापारीच बोली बोलत असताना दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. काही शेतकऱ्यांनी तर बाजार समितीच्या आणि व्यापाऱ्यांच्या साखळीची तीव्र शब्दात निंदा केली. बाजार समितीच्या प्रशासनाची सहमती असल्याशिवाय असा प्रकार घडू शकत नाही. लिलाव सुरू असताना त्यांनी या बाबीकडे लक्ष द्यायला पाहिजे. खरेदीदार अत्यल्प असतील तर त्यांना जाब विचारला पाहिजे. तेव्हाच शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे योग्य दर मिळतील, असा सूरही शेतकऱ्यातून यावेळी उमटत होता. (स्थानिक प्रतिनिधी)