शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
4
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
5
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
6
"पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
7
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
8
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
9
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
10
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
11
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
12
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
13
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
14
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
15
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
16
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
17
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
18
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
19
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
20
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जीवाची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

वणीचे जलवैभव झाले लुप्त

By admin | Updated: September 14, 2015 02:26 IST

एकेकाळी तालुक्यात जागोजागी झुळझुळणारे जलप्रवाह हे तालुक्याचे वैभव होते. तालुक्यातील जलयुक्त शिवार ही निसर्गाचीच देण होती. मात्र कालांतराने यामध्ये सतत घट होत गेली.

जलसंकट ओढवणार : उन्हाळ्यात उद्भवणार जनावरांच्या पाण्याचा प्रश्न विनोद ताजने ल्ल वणीएकेकाळी तालुक्यात जागोजागी झुळझुळणारे जलप्रवाह हे तालुक्याचे वैभव होते. तालुक्यातील जलयुक्त शिवार ही निसर्गाचीच देण होती. मात्र कालांतराने यामध्ये सतत घट होत गेली. आता तर वणीचे जलवैभव लुप्त झाल्याचा अनुभव घ्यावा लागत आहे. झुळझुळणाऱ्या वैभवाच्या ठिकाणी केवळ वाळूचे ढिगारे व दगडधोंडे पाहायला मिळत आहे. यावर्षी तर तालुक्यावर भीषण जलसंकट ओढवण्याची सूचक चिन्हे दिसायला लागली आहे.तालुक्याच्या पूर्व-उत्तर-दक्षिण या तिनही सीमारेषा पैनगंगा व वर्धा या मोठ्या नद्यांनीच ठरवून दिल्या आहेत. तर निर्गुडा व विदर्भा या दोन नद्या जणू तालुक्याच्या हृदयाच्या धमण्या म्हणून बारमाही वाहत असे. १२ महिन्यांपैकी आठ महिने प्रवाहीत असणारे अनेक नाले ओढे निसर्गाने तालुक्यात दिले आहेत. यामध्ये गुंज नाला, लाल्या नाला, नांदेपेराचा नाला, चारगावचा नाला, पंचधार नाला या नाल्यांची नावे सांगता येतील. तालुक्यात लहानमोठे तलाव व मालगुजारी मातीचे तलाव हे जनावरांसाठी उपयुक्त जलसाठे उपलब्ध होते. कायरजवळ भुडकेश्वराच्या वर सैदाबादजवळ उगम पावणारे जलप्रवाह विदर्भा नदीच्या उपधमण्या समजल्या जायच्या. त्यामुळेच भुडकेश्वराच्या देवस्थानासमोर असलेल्या टाक्यात गायमुखातून सतत जलप्रवाह पडायला. असेच गयमुखातून पडणारे जलप्रवाह तालुक्यातील वरझडी, वनोजादेवी व गोडगाव येथे असणाऱ्या देवी मंदिराच्या टाक्यामध्ये सतत सुरू असायचे. त्यामुळे ही मंदिरे परिसरातील नागरिकांना पर्यटनस्थळे म्हणून आसरा वाटायची. विदर्भा नदीवर देऊरवाडा गावाजवळ असलेला धबधबा तर पर्यटकांचे आकर्षण होता. याच धबधब्याजवळ विदर्भा व पैनगंगा नदीचा संगम आहे. जिकडे-तिकडे पाणीच पाणी असल्याने पावसाळ्यामध्ये अनेक शेतात कठ्ठे फुटून धरतीतील पाणी आपोआप वर यायचे. बिना विजेने व बिना मोटारपंपाने सुरू होणारे हे प्रवाह शेतकऱ्यांच्या नजरा दिपून टाकायचे. दिवसेंदिवस हे वैभव घटत आले. चारही गायमुखी प्रवाह बंद पडले. नदी नाले अर्ध्यातच कोरडे पडू लागले. एवढेच नव्हे तर बारमाही वाहणाऱ्या निर्गुडा व विदर्भा नद्यासुद्धा उन्हाळ्यात कोरड्या पडू लागल्या. या नद्यावरील कोल्हापुरी बंधारे केवळ शोभेच्या वास्तू म्हणून पाहायला मिळत आहे. काळाच्या ओघात ट्युबवेलद्वारे जमिनीतील पाण्याचा उपसा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे भूजल पातळी अतिखोल गेल्याने जमिनीतील नैसर्गिक झरे बंद झाले. पैनगंगा व वर्धा नदीचे प्रवाहही उन्हाळ्यात नाला-ओढ्याप्रमाणे बारीक होत असते. परिणामी नागरिकांना पाणी टंचाईची झळ बसू लागली आहे.यावर्षी तर ५० टक्केही पाऊस पडला नाही. कोणत्याही नदी व नाल्यांना पोटभरून पुराचे पाणी गेले नाही. त्यामुळे यावर्षी येत्या २०१६ च्या प्रारंभीच नद्यांचे प्रवाह खंडीत होण्याची शक्यता नव्हे, तर ती काळ्या दगडावरची रेघ आहे. जतनेला पाणी विकत घेण्याची वेळ येणार आहे. शिवार व जंगलात पाण्याचा थेंबही मिळणार नाही. त्यामुळे खरा प्रश्न जनावरांच्या वैरण व पाण्याचा निर्माण होणार आहे. जंगली श्वापदे पाण्यासाठी गावाकडे धाव घेण्याची शक्यता बळावली आहे. तर कित्येक जनावरांना तहानेने व्याकुळ होऊन प्राण त्यागावा लागणार आहे. प्रशासनाला, वन विभागाला आता भविष्याच्या नियोजनाला लागावे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता निर्गुडा नदीही फार दिवस साथ देणार नाही. तिला जीवनदान देणाऱ्या नवरगाव धरणाचेही पोट पूर्ण भरलेले नाही. त्यामुळे शहराच्या पाणी पुरवण्याचे नियोजन यंत्रणेला हाती घ्यावे लागणार आहे.