शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

पैनगंगेच्या तीरावर पाणीटंचाई

By admin | Updated: November 22, 2014 02:01 IST

शेकडो वर्षांपासून पैनगंगा नदी तीरावर असलेल्या गावांचा नैसर्गिक अधिकार इसापूर धरण निर्मितीनंतर संपुष्टात आला.

बिटरगाव : शेकडो वर्षांपासून पैनगंगा नदी तीरावर असलेल्या गावांचा नैसर्गिक अधिकार इसापूर धरण निर्मितीनंतर संपुष्टात आला. आता पैनगंगा तीरावरील गावांमध्ये ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नदी काठच्या लोकांना पावसाळ्यात कृत्रिम पूर तर हिवाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी होत आहे.इसापूर धरणाची निर्मिती १९६७ साली झाली. तेव्हापासून धरणातील पावसाळ्यात जास्तीचे झालेले पाणी नदीपात्रात सोडल्याने महापुराची परिस्थिती निर्माण होते. या पूर परिस्थितीचा फटका नदी किनाऱ्यावरील गावांना व शेतजमिनींना मोठ्या प्रमाणात बसतो. या नदी तीरावरील गावांमध्ये आॅक्टोबर महिन्यापासूनच भीषण पाणीटंचाई निर्माण होते. नागरिकांना व गुराढोरांना देखील पिण्यासाठी पाणी मिळत नाही. यावर्षीचे चित्र तर अधिकच भयावह आहे. नदी किनाऱ्यावरील ४५ गावांची सार्वजनिक पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतींनी पैनगंगा नदीवरून केली आहे. परंतु पाण्याअभावी ही योजना आॅक्टोबर महिन्यापासूनच बिनकामाची ठरत आहे. गावातील महिलांना आपली रोजमजुरी बुडवून दोन ते तीन किलोमीटरवरून पाणी आणावे लागते. शिवाय शाळकरी मुलेसुद्धा शाळेत न जाता सायकलवरून दिवसभर पाणी आणतात. शेतकरी व शेतमजुरांनाही हेच काम दिवसभर करावे लागते. कुणी बैलबंडीने, कोणी सायकलने तर कोणी डोक्यावर पाणी आणताना दिसतात. या परिसरातील संपूर्ण ४५ गावांमध्ये हीच परिस्थिती आहे. या भागातील नागरिकांनी इसापूर धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्यासंबंधी ग्रामपंचायतीच्या ठरावासह निवेदनेसुद्धा सर्व संबंधितांना दिली आहे. सोबतच परिसरातील आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधींना देखील निवेदने देऊन हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. परंतु त्याचा काहीएक फायदा झालेला नाही. इसापूर धरणामुळे पावसाळ्यात प्रचंड नुकसान नागरिकांना सहन करावे लागते. नुकसानग्रस्त नागरिकांचा धरणातील पाण्यावर पहिला अधिकार आहे. परंतु त्याची दखल कुणी घेत नाही. पाणीटंचाईमुळे दरवर्षी होरपळणाऱ्या हजारो नागरिकांचा वालीच कुणी उरला नाही. त्यामुळे इसापूर धरण या परिसरातील ४५ गावातील नागरिकांसाठी अभिशाप तर ठरत नाही ना, असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. (वार्ताहर)