शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
2
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
3
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
4
२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
5
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
6
“महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर, देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान”: DCM एकनाथ शिंदे
7
जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना
8
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
9
"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
10
VIDEO: पुतिन यांच्या भेटीनंतर किम जोंगच्या कर्मचाऱ्यांनी सर्व DNA पुरावे अन् बोटांचे ठसे पुसून टाकले
11
मृत्यू पंचकात खग्रास चंद्रग्रहण २०२५: सूतक काल कधी? काय करावे अन् काय करू नये; पाहा, नियम
12
Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी
13
'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी
14
४२ दिवसांत तब्बल १२ वेळा मुलीला चावला साप; पण नेमकं कारण तरी काय? डॉक्टर म्हणाले...
15
Palmistry: नशिबात राजयोग आहे की नाही, हे तळहाताच्या 'या' चिन्हावरुन ओळखू शकता!
16
मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
17
राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये नेमकं आहे काय? तो फुटणार कुठे, समोर येतेय अशी माहिती  
18
GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या
19
रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू
20
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...

पैनगंगेच्या तीरावर पाणीटंचाई

By admin | Updated: November 22, 2014 02:01 IST

शेकडो वर्षांपासून पैनगंगा नदी तीरावर असलेल्या गावांचा नैसर्गिक अधिकार इसापूर धरण निर्मितीनंतर संपुष्टात आला.

बिटरगाव : शेकडो वर्षांपासून पैनगंगा नदी तीरावर असलेल्या गावांचा नैसर्गिक अधिकार इसापूर धरण निर्मितीनंतर संपुष्टात आला. आता पैनगंगा तीरावरील गावांमध्ये ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नदी काठच्या लोकांना पावसाळ्यात कृत्रिम पूर तर हिवाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी होत आहे.इसापूर धरणाची निर्मिती १९६७ साली झाली. तेव्हापासून धरणातील पावसाळ्यात जास्तीचे झालेले पाणी नदीपात्रात सोडल्याने महापुराची परिस्थिती निर्माण होते. या पूर परिस्थितीचा फटका नदी किनाऱ्यावरील गावांना व शेतजमिनींना मोठ्या प्रमाणात बसतो. या नदी तीरावरील गावांमध्ये आॅक्टोबर महिन्यापासूनच भीषण पाणीटंचाई निर्माण होते. नागरिकांना व गुराढोरांना देखील पिण्यासाठी पाणी मिळत नाही. यावर्षीचे चित्र तर अधिकच भयावह आहे. नदी किनाऱ्यावरील ४५ गावांची सार्वजनिक पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतींनी पैनगंगा नदीवरून केली आहे. परंतु पाण्याअभावी ही योजना आॅक्टोबर महिन्यापासूनच बिनकामाची ठरत आहे. गावातील महिलांना आपली रोजमजुरी बुडवून दोन ते तीन किलोमीटरवरून पाणी आणावे लागते. शिवाय शाळकरी मुलेसुद्धा शाळेत न जाता सायकलवरून दिवसभर पाणी आणतात. शेतकरी व शेतमजुरांनाही हेच काम दिवसभर करावे लागते. कुणी बैलबंडीने, कोणी सायकलने तर कोणी डोक्यावर पाणी आणताना दिसतात. या परिसरातील संपूर्ण ४५ गावांमध्ये हीच परिस्थिती आहे. या भागातील नागरिकांनी इसापूर धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्यासंबंधी ग्रामपंचायतीच्या ठरावासह निवेदनेसुद्धा सर्व संबंधितांना दिली आहे. सोबतच परिसरातील आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधींना देखील निवेदने देऊन हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. परंतु त्याचा काहीएक फायदा झालेला नाही. इसापूर धरणामुळे पावसाळ्यात प्रचंड नुकसान नागरिकांना सहन करावे लागते. नुकसानग्रस्त नागरिकांचा धरणातील पाण्यावर पहिला अधिकार आहे. परंतु त्याची दखल कुणी घेत नाही. पाणीटंचाईमुळे दरवर्षी होरपळणाऱ्या हजारो नागरिकांचा वालीच कुणी उरला नाही. त्यामुळे इसापूर धरण या परिसरातील ४५ गावातील नागरिकांसाठी अभिशाप तर ठरत नाही ना, असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. (वार्ताहर)