शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
2
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
3
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
4
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
6
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
7
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
8
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
9
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
10
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!
11
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
12
ICC Womens World Cup 2025 : युवराज सिंगच्या साक्षीनं हरमनप्रीत कौरनं दिला शब्द; आम्ही...
13
‘काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा अभाव,’’ हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला   
14
AUS vs SA: एकेकाळी 'मुंबई इंडियन्स'कडून खेळणाऱ्या फलंदाजांने मोडला सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम
15
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
16
आई दुसऱ्यांकडे काम करायची, वडील विटा उचलायचे; २२ व्या वर्षी लेक देशातील सर्वात तरुण IPS
17
VIDEO: महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
18
Viral Video: मध्यरात्री शौचालयासाठी बाहेर पडला, अचानक समोर दिसला बिबट्या, पहारेकरीसोबत असं घडलं की...
19
‘माझी पत्नी बाहेरच्या लोकांना घरी बोलावते’, व्हिडीओमध्ये सांगून पतीनं उचललं भयानक पाऊल...  
20
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?

४५ गावांत पाणीटंचाई

By admin | Updated: May 20, 2015 00:09 IST

उन्हाच्या तीव्रतेने पाणीटंचाईची तीव्रता वाढली असून, त्यातच पैनगंगा कोरडी पडल्याने उमरखेड तालुक्यातील ४५ गावात भीषण...

पैनगंगा कोरडी : ढाणकी, बिटरगावची नळयोजना बंदअविनाश खंदारे उमरखेड उन्हाच्या तीव्रतेने पाणीटंचाईची तीव्रता वाढली असून, त्यातच पैनगंगा कोरडी पडल्याने उमरखेड तालुक्यातील ४५ गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बिटरगाव, ढाणकी येथील नळयोजना बंद पडली असून, पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे पाणीटंचाईकडे दुर्लक्ष होत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून सातत्याने पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागात भूगर्भातील जलस्त्रोत खालावले आहे. बोअरवेल आणि विहिरींनीही तळ गाठला आहे. उमरखेड तालुक्याची जीवनवाहिनी असलेली पैनगंगा नदी हिवाळ्यातच आटली आहे. नदी पात्रात ठणठणाट असल्याने तीरावरील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तिवरंग, भांबरखेडा, झाडगाव, हातला, दिवटपिंप्री, पळशी, बारा, मेलखेड, संगमचिंचोली, मार्लेगाव, बिटरगाव, लिंबगव्हाण, तिवडी, राजापूर, टाकळी, विडूळ, लोहरा, साखरा, कारखेड, देवसरी, दिघडी, उंचवडद, चातारी, बोरी, मानकेश्वर, कोप्रा, सोईट, सिंगदी, ब्राह्मणगांव, गांजेगाव, सावळेश्वर, खिरटगाव, भोजनगर, पिंपळगाव, जेवली, मुरली, सोनदाबी, एकंबा, परोटी, जवराळ, थेरडी, गाडी, बोरी आदी गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावातील नागरिक रात्रंदिवस पाण्याच्या शोधात फिरत आहेत. अनेक गावातील नळयोजनाही कोरड्या पडल्या आहे. जनावरांना पाणी उपलब्ध करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. इसापूर धरणात पाणीसाठा आहे. परंतु उमरखेड तालुक्यातील प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या उदासिन धोरणामुळे नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहे. नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी अनेक ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव घेतले. तहसील, पंचायत समितीला निवेदन दिले. परंतु कोणत्याही हालचाली दिसत नाही. नागरिकांना पाच ते सहा किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. नदीपात्रात पाणी सोडले नाही तर नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. बिटरगावात पाण्यासाठी झुंबडबिटरगाव या १० हजार लोकसंख्येच्या गावातही तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विहिरी आटल्या आहेत. एकाच विहिरीवरून पाणी भरावे लागते. त्यामुळे याठिकाणी मोठी झुंबड असते. मन्याळी गावातील एका विहिरीवरून नळयोजना होती, परंतु ही विहिरी आटल्याने पाणीपुरवठा ठप्प आहे. दुसरी नळयोजना पैनगंगा नदीवरून आहे. मात्र नदी पात्रात पाणी नसल्याने या योजनेला घरघर लागली आहे.