शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

४५ गावांत पाणीटंचाई

By admin | Updated: May 20, 2015 00:09 IST

उन्हाच्या तीव्रतेने पाणीटंचाईची तीव्रता वाढली असून, त्यातच पैनगंगा कोरडी पडल्याने उमरखेड तालुक्यातील ४५ गावात भीषण...

पैनगंगा कोरडी : ढाणकी, बिटरगावची नळयोजना बंदअविनाश खंदारे उमरखेड उन्हाच्या तीव्रतेने पाणीटंचाईची तीव्रता वाढली असून, त्यातच पैनगंगा कोरडी पडल्याने उमरखेड तालुक्यातील ४५ गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बिटरगाव, ढाणकी येथील नळयोजना बंद पडली असून, पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे पाणीटंचाईकडे दुर्लक्ष होत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून सातत्याने पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागात भूगर्भातील जलस्त्रोत खालावले आहे. बोअरवेल आणि विहिरींनीही तळ गाठला आहे. उमरखेड तालुक्याची जीवनवाहिनी असलेली पैनगंगा नदी हिवाळ्यातच आटली आहे. नदी पात्रात ठणठणाट असल्याने तीरावरील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तिवरंग, भांबरखेडा, झाडगाव, हातला, दिवटपिंप्री, पळशी, बारा, मेलखेड, संगमचिंचोली, मार्लेगाव, बिटरगाव, लिंबगव्हाण, तिवडी, राजापूर, टाकळी, विडूळ, लोहरा, साखरा, कारखेड, देवसरी, दिघडी, उंचवडद, चातारी, बोरी, मानकेश्वर, कोप्रा, सोईट, सिंगदी, ब्राह्मणगांव, गांजेगाव, सावळेश्वर, खिरटगाव, भोजनगर, पिंपळगाव, जेवली, मुरली, सोनदाबी, एकंबा, परोटी, जवराळ, थेरडी, गाडी, बोरी आदी गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावातील नागरिक रात्रंदिवस पाण्याच्या शोधात फिरत आहेत. अनेक गावातील नळयोजनाही कोरड्या पडल्या आहे. जनावरांना पाणी उपलब्ध करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. इसापूर धरणात पाणीसाठा आहे. परंतु उमरखेड तालुक्यातील प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या उदासिन धोरणामुळे नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहे. नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी अनेक ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव घेतले. तहसील, पंचायत समितीला निवेदन दिले. परंतु कोणत्याही हालचाली दिसत नाही. नागरिकांना पाच ते सहा किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. नदीपात्रात पाणी सोडले नाही तर नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. बिटरगावात पाण्यासाठी झुंबडबिटरगाव या १० हजार लोकसंख्येच्या गावातही तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विहिरी आटल्या आहेत. एकाच विहिरीवरून पाणी भरावे लागते. त्यामुळे याठिकाणी मोठी झुंबड असते. मन्याळी गावातील एका विहिरीवरून नळयोजना होती, परंतु ही विहिरी आटल्याने पाणीपुरवठा ठप्प आहे. दुसरी नळयोजना पैनगंगा नदीवरून आहे. मात्र नदी पात्रात पाणी नसल्याने या योजनेला घरघर लागली आहे.