शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

यवतमाळचा पाणी प्रश्न जटील झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:01 IST

यवतमाळ शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात शहरवासीयींची गरज पूर्ण होईल एवढा पाणीसाठा आहे. सुदैवाने या प्रकल्पांनी साथ दिली असली तरी प्राधिकरणाच्या नियोजनाने मात्र सोडली आहे. भर पावसाळ्यातही पाण्याचे वेळापत्रक प्राधिकरणाला पाळता आले नाही.

ठळक मुद्देवेळापत्रकाचे भानच नाही : संपूर्ण उन्हाळाभर चटके

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कारभाराने शहरवासीय त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठ्याच्या कोलमडलेल्या नियोजनामुळे संपूर्ण उन्हाळाभर नागरिकांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहे. ठरलेल्या दिवशी नळाला पाणी आले, असे अपवादानेही घडले नाही. एवढेच नव्हे तर काही भागात आठ ते दहा दिवसाआड नळ येत आहे.यवतमाळ शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात शहरवासीयींची गरज पूर्ण होईल एवढा पाणीसाठा आहे. सुदैवाने या प्रकल्पांनी साथ दिली असली तरी प्राधिकरणाच्या नियोजनाने मात्र सोडली आहे. भर पावसाळ्यातही पाण्याचे वेळापत्रक प्राधिकरणाला पाळता आले नाही. खंडित वीज पुरवठा, लिकेज पाईपलाईन आदी कारणे त्यावेळी सांगितली गेली. उन्हाळ्यात तरी लोकांना पाण्यासाठी भटकावे लागणार नाही, अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली.शहराच्या अनेक भागात असलेल्या खासगी स्रोतांनी तळ गाठला आहे. विहिरी, हातपंपांना पाणी नाही. अशावेळी प्राधिकरणाचे पाणी हा एकमेव प्रमुख स्रोत ठरतो. परंतु या विभागानेही लोकांचा हा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही. शहरात अनेक ठिकाणी लिकेजचा प्रश्न निर्माण झाला आहे. विकास कामांच्या नावाखाली हे सर्व ढकलले जात आहे. एकदा काढण्यात आलेला बिघाड वारंवार निघतो. अर्थातच झालेले काम निकृष्ट राहिले हे स्पष्ट होते. काही ठिकाणी पाण्याचा प्रचंड प्रमाणात अपव्यय होताना दिसत आहे.अनेक लोकांकडे पाण्याची साठवणूक करण्यासाठी आवश्यक तेवढी साधने नाही. जास्तीत जास्त चार किंवा पाच दिवस पुरेल एवढेच पाणी ते साठवून ठेवू शकतात. अशावेळी निर्धारित काळात नळ येईल अशी अपेक्षा त्यांना असते. परंतु सात-आठ काही भागात तर नऊ-दहा दिवस लोटूनही पाणी येत नाही. त्रस्त झालेल्या नागरिकांनी प्राधिकरणाकडे वारंवार तक्रारी करूनही उपयोग होत नाही. नेमकी काय अडचण आहे हेसुद्धा स्पष्टपणे सांगितले जात नाही. थातुरमातूर कारण सांगून नागरिकांना परत पाठविले जाते. बहुतांश वेळा तर या विभागाचे जबाबदार अधिकारी उपलब्ध होत नसल्याची ओरड आहे.कमी दाबाने पाणीपुरवठायवतमाळ शहरातील काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नळ जाईपर्यंत दोन ते तीन हजार लिटर पाण्याचीही साठवणूक होत नाही. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर कधीतरी एखादा कर्मचारी पाहून जातो. पुढे मात्र काहीही उपाययोजना होत नाही. अनेक भागात अमृत योजनेंतर्गत नवीन पाईपलाईन टाकण्यात आली आहे. त्यावर जुने कनेक्शन जोडण्याची गती गेली अनेक महिन्यांपासून अतिशय संथ आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात