शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
5
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
6
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
7
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
8
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
9
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ घातलेला फोटो व्हायरल!
10
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
11
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
12
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
13
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
14
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
15
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
16
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
17
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
18
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
20
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळचा पाणी प्रश्न जटील झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:01 IST

यवतमाळ शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात शहरवासीयींची गरज पूर्ण होईल एवढा पाणीसाठा आहे. सुदैवाने या प्रकल्पांनी साथ दिली असली तरी प्राधिकरणाच्या नियोजनाने मात्र सोडली आहे. भर पावसाळ्यातही पाण्याचे वेळापत्रक प्राधिकरणाला पाळता आले नाही.

ठळक मुद्देवेळापत्रकाचे भानच नाही : संपूर्ण उन्हाळाभर चटके

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कारभाराने शहरवासीय त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठ्याच्या कोलमडलेल्या नियोजनामुळे संपूर्ण उन्हाळाभर नागरिकांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहे. ठरलेल्या दिवशी नळाला पाणी आले, असे अपवादानेही घडले नाही. एवढेच नव्हे तर काही भागात आठ ते दहा दिवसाआड नळ येत आहे.यवतमाळ शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात शहरवासीयींची गरज पूर्ण होईल एवढा पाणीसाठा आहे. सुदैवाने या प्रकल्पांनी साथ दिली असली तरी प्राधिकरणाच्या नियोजनाने मात्र सोडली आहे. भर पावसाळ्यातही पाण्याचे वेळापत्रक प्राधिकरणाला पाळता आले नाही. खंडित वीज पुरवठा, लिकेज पाईपलाईन आदी कारणे त्यावेळी सांगितली गेली. उन्हाळ्यात तरी लोकांना पाण्यासाठी भटकावे लागणार नाही, अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली.शहराच्या अनेक भागात असलेल्या खासगी स्रोतांनी तळ गाठला आहे. विहिरी, हातपंपांना पाणी नाही. अशावेळी प्राधिकरणाचे पाणी हा एकमेव प्रमुख स्रोत ठरतो. परंतु या विभागानेही लोकांचा हा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही. शहरात अनेक ठिकाणी लिकेजचा प्रश्न निर्माण झाला आहे. विकास कामांच्या नावाखाली हे सर्व ढकलले जात आहे. एकदा काढण्यात आलेला बिघाड वारंवार निघतो. अर्थातच झालेले काम निकृष्ट राहिले हे स्पष्ट होते. काही ठिकाणी पाण्याचा प्रचंड प्रमाणात अपव्यय होताना दिसत आहे.अनेक लोकांकडे पाण्याची साठवणूक करण्यासाठी आवश्यक तेवढी साधने नाही. जास्तीत जास्त चार किंवा पाच दिवस पुरेल एवढेच पाणी ते साठवून ठेवू शकतात. अशावेळी निर्धारित काळात नळ येईल अशी अपेक्षा त्यांना असते. परंतु सात-आठ काही भागात तर नऊ-दहा दिवस लोटूनही पाणी येत नाही. त्रस्त झालेल्या नागरिकांनी प्राधिकरणाकडे वारंवार तक्रारी करूनही उपयोग होत नाही. नेमकी काय अडचण आहे हेसुद्धा स्पष्टपणे सांगितले जात नाही. थातुरमातूर कारण सांगून नागरिकांना परत पाठविले जाते. बहुतांश वेळा तर या विभागाचे जबाबदार अधिकारी उपलब्ध होत नसल्याची ओरड आहे.कमी दाबाने पाणीपुरवठायवतमाळ शहरातील काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नळ जाईपर्यंत दोन ते तीन हजार लिटर पाण्याचीही साठवणूक होत नाही. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर कधीतरी एखादा कर्मचारी पाहून जातो. पुढे मात्र काहीही उपाययोजना होत नाही. अनेक भागात अमृत योजनेंतर्गत नवीन पाईपलाईन टाकण्यात आली आहे. त्यावर जुने कनेक्शन जोडण्याची गती गेली अनेक महिन्यांपासून अतिशय संथ आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात