शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग भूसंपादनाचा मोबदला वितरित

By admin | Updated: April 7, 2017 02:21 IST

जिल्ह्याच्या विकासातील महत्वाकांक्षी वर्धा- यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी थेट जमिनीची खरेदी करण्याची मुभा शासनाने दिली.

सहा कोटींचे वाटप : कळंब तालुक्यातील ४८ शेतकऱ्यांना लाभ यवतमाळ : जिल्ह्याच्या विकासातील महत्वाकांक्षी वर्धा- यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी थेट जमिनीची खरेदी करण्याची मुभा शासनाने दिली. आता या मार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाली. त्यानुसार गुरुवारी कळंब तालुक्यातील चापर्डा व घोटी या दोन गावांतील शेतकऱ्यांना थेट त्यांच्या गावात जाऊन खरेदी-विक्री दराच्या चारपटीने जादा मोबदला वितरित करण्यात आला.या मार्गासाठी कळंब आणि यवतमाळ तालुक्यातील २९४ हेक्टर जमीन, तर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील एकूण एक हजार १४६ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. जुन्या भूसंपादन कायद्यानुसार ११ प्रकरणातील ४३ हेक्टर जमिनीचा पाच कोटी ४८ लाखांचा मोबदला जानेवारी २०१६ मध्ये देण्यात आला. त्यानंतर नवीन भूसंपादन कायदा लागू झाला. नवीन कायद्यानुसार जमीन संपादित करताना जनसुनावणी घेणे बंधनकारक होते. मात्र जिल्हा प्रशासन व भूसंपादन अधिकारी विजय भाकरे यांनी यातून सूट मिळण्यासाठी राज्य शासनाकडे प्रयत्न केले. ही सूट मिळाल्यानंतर कलम ११ ची प्रक्रिया तीन वर्षात पूर्ण करण्याऐवजी दहा महिन्यातच पूर्ण करून अवार्ड घोषित करून शेतकऱ्यांना मोबदला वाटप केले जात आहे.कळंब तालुक्यातील घोटी येथील २२.०९ हेक्टर, तर चापर्डा येथील १४.५९ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. त्यापोटी घोटी येथील ३१ शेतकऱ्यांना तीन कोटी ४० लाख ७६ हजार ७३५, तर चापर्डा येथील १७ शेतकऱ्यांना दोन कोटी ४८ लाख ९८ हजार १६५ रूपयांच्या मोबदल्याचे गुरूवारी गावात जाऊन वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, विशेष भूसंपादन अधिकारी विजय भाकरे, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, कळंबचे तहसीलदार रणजित भोसले, चापर्डाच्या सरपंच सरला बंडाते यांच्यासह रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते या मोबदला व जमीन संपादन प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी परिसराच्या विकासासाठी रेल्वेचे फार मोठे योगदान असते, असे सांगितले. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार असून व्यापारासोबतच शिक्षण व अन्य क्षेत्रातील विकासालाही हा मार्ग सिंहाचा वाटा उचलेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात यापूर्वीच रेल्वे मार्ग असता तर, शेतकऱ्यांवर यावर्षी कमी दरात तूर विकण्याची वेळ ओढवली नसती. किमान हजार ते पंधराशे रूपये त्यांना जादा मिळाले असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. (शहर प्रतिनिधी)शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी मदतया मोबदल्यामुळे पुढील हंगामाकरिता शेतकऱ्यांना भांडवल उपलब्ध झाले. तसेच त्यांना दुसरीकडे मालमत्ता खरेदीसाठी ही रक्कम उपयोगी पडणार आहे. याशिवाय या प्रकरणातील संपूर्ण दस्तावेज अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. यात संयुक्त मोजणी अहवाल, मूल्यांकन, फळझाडे, वनझाडे, विहीर, अंतिम निवाडा आदी बाबी शेतकऱ्यांना आर्नलाईन उपलब्ध असणार आहे.