शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
4
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
5
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
6
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
7
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
8
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
9
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
10
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
11
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
12
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
13
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
14
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
15
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
16
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
17
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
18
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
19
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
20
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग भूसंपादनाचा मोबदला वितरित

By admin | Updated: April 7, 2017 02:21 IST

जिल्ह्याच्या विकासातील महत्वाकांक्षी वर्धा- यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी थेट जमिनीची खरेदी करण्याची मुभा शासनाने दिली.

सहा कोटींचे वाटप : कळंब तालुक्यातील ४८ शेतकऱ्यांना लाभ यवतमाळ : जिल्ह्याच्या विकासातील महत्वाकांक्षी वर्धा- यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी थेट जमिनीची खरेदी करण्याची मुभा शासनाने दिली. आता या मार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाली. त्यानुसार गुरुवारी कळंब तालुक्यातील चापर्डा व घोटी या दोन गावांतील शेतकऱ्यांना थेट त्यांच्या गावात जाऊन खरेदी-विक्री दराच्या चारपटीने जादा मोबदला वितरित करण्यात आला.या मार्गासाठी कळंब आणि यवतमाळ तालुक्यातील २९४ हेक्टर जमीन, तर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील एकूण एक हजार १४६ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. जुन्या भूसंपादन कायद्यानुसार ११ प्रकरणातील ४३ हेक्टर जमिनीचा पाच कोटी ४८ लाखांचा मोबदला जानेवारी २०१६ मध्ये देण्यात आला. त्यानंतर नवीन भूसंपादन कायदा लागू झाला. नवीन कायद्यानुसार जमीन संपादित करताना जनसुनावणी घेणे बंधनकारक होते. मात्र जिल्हा प्रशासन व भूसंपादन अधिकारी विजय भाकरे यांनी यातून सूट मिळण्यासाठी राज्य शासनाकडे प्रयत्न केले. ही सूट मिळाल्यानंतर कलम ११ ची प्रक्रिया तीन वर्षात पूर्ण करण्याऐवजी दहा महिन्यातच पूर्ण करून अवार्ड घोषित करून शेतकऱ्यांना मोबदला वाटप केले जात आहे.कळंब तालुक्यातील घोटी येथील २२.०९ हेक्टर, तर चापर्डा येथील १४.५९ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. त्यापोटी घोटी येथील ३१ शेतकऱ्यांना तीन कोटी ४० लाख ७६ हजार ७३५, तर चापर्डा येथील १७ शेतकऱ्यांना दोन कोटी ४८ लाख ९८ हजार १६५ रूपयांच्या मोबदल्याचे गुरूवारी गावात जाऊन वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, विशेष भूसंपादन अधिकारी विजय भाकरे, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, कळंबचे तहसीलदार रणजित भोसले, चापर्डाच्या सरपंच सरला बंडाते यांच्यासह रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते या मोबदला व जमीन संपादन प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी परिसराच्या विकासासाठी रेल्वेचे फार मोठे योगदान असते, असे सांगितले. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार असून व्यापारासोबतच शिक्षण व अन्य क्षेत्रातील विकासालाही हा मार्ग सिंहाचा वाटा उचलेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात यापूर्वीच रेल्वे मार्ग असता तर, शेतकऱ्यांवर यावर्षी कमी दरात तूर विकण्याची वेळ ओढवली नसती. किमान हजार ते पंधराशे रूपये त्यांना जादा मिळाले असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. (शहर प्रतिनिधी)शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी मदतया मोबदल्यामुळे पुढील हंगामाकरिता शेतकऱ्यांना भांडवल उपलब्ध झाले. तसेच त्यांना दुसरीकडे मालमत्ता खरेदीसाठी ही रक्कम उपयोगी पडणार आहे. याशिवाय या प्रकरणातील संपूर्ण दस्तावेज अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. यात संयुक्त मोजणी अहवाल, मूल्यांकन, फळझाडे, वनझाडे, विहीर, अंतिम निवाडा आदी बाबी शेतकऱ्यांना आर्नलाईन उपलब्ध असणार आहे.