शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

गावप्रशासन ताळ्यावर - जिल्हाधिकाऱ्यांची मात्रा

By admin | Updated: July 10, 2015 02:21 IST

गावाच्या विकासात तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांचे मोठे महत्व आहे. मात्र हे तीनही कर्मचारी गावकऱ्यांना शोधूनही सापडत नव्हते.

सुरेंद्र राऊत  यवतमाळ गावाच्या विकासात तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांचे मोठे महत्व आहे. मात्र हे तीनही कर्मचारी गावकऱ्यांना शोधूनही सापडत नव्हते. त्यांचा शहरात जाऊन शोध घ्यावा लागत होता. आता जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिलेल्या मात्रेने हे गावप्रशासन ताळ्यावर आले आहे. ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात फलक लावून त्यावर भेटीचा दिवस आणि मोबाईल क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे. यामुळे शहरात भेटणारे तीनही कर्मचारी आता नित्यनेमाने गावात दिसू लागले आहे. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यवतमाळात रुजू झाले तेव्हापासून त्यांनी कामाचा धडाका लावला. एका पाठोपाठएक विभागाला सूतासारखे सारखे सरळ केले. जिल्हाधिकाऱ्यांचा एवढा वचक निर्माण झाला की, प्रत्येक कर्मचारी कामालाच लागला. यातून अधिकारीही सुटले नाही. बैठकांचा धडाका लावत प्रत्येक अधिकाऱ्याला सर्वसामान्यांचे प्रश्न तातडीने सोडवा अन्यथा गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड दमही भरला. जिल्हाधिकाऱ्यांची ही मात्रा अधिकारी वर्गात चांगलीच लागू झाली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आपला मोर्चा आता ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांकडे वळविला आहे. त्यातूनच तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांना आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी ठरलेल्या दिवशी आणि वेळेत उपस्थित राहण्याचे आदेश दिले. एवढ्यावरच जिल्हाधिकारी थांबले नाही तर दर्शनी भागात फलक लावून कामाचा दिवस आणि संबंधित कर्मचाऱ्याचा मोबाईल क्रमांकही गावकऱ्यांना उपलब्ध करून दिला. तसेच कर्मचाऱ्यांनी आपला मोबाईल २४ तास सुरू ठेवण्याची तंबीही दिली. यानंतर ग्रामस्थांच्या तक्रारी आल्या तर खैर नाही, असा इशाराही दिला. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश निघताच जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींवर फलक लागले. कधी न दिसणारे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक गावकऱ्यांच्या भेटीला नियमित येऊ लागले. नागरिकांची कामे गावातल्या गावात विनासायास होऊ लागली. कलेक्टरच्या मोबाईलचा धसका सातबारा अथवा विविध प्रमाणपत्रासाठी गावकऱ्यांना तलाठी किंवा ग्रामसेवकाचा शोध घ्यावा लागत होता. मोफत मिळणाऱ्या दाखल्यांसाठी पैसे तर मोजावे लागत होते. त्यासोबतच मन:स्तापही सहन करावा लागत होता. एका कामासाठी शहरात जाऊन तलाठ्याचा अथवा ग्रामसेवकाचा शोध घेणे म्हणजे आर्थिक भुर्दंडही पडत होता. परंतु आता जिल्हाधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना गावात नियोजित दिवशी थांबण्याची सक्ती केल्याने गावकऱ्यांची पायपीट थांबली. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी पहिल्याच दिवशी आपला मोबाईल क्रमांक सार्वजनिक केला. कुणीही २४ तास यावर संपर्क करू शकतो. संपर्क केल्यानंतर तत्काळ रिझल्ट मिळाल्याची उदाहरणे आहे. त्यामुळे आपण गावात गेलो नाही आणि गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली तर याच धास्तीतून आता गावप्रशासन गाव पातळीवर राबताना दिसत आहे. कधी काळी अशक्यप्राय वाटणारी ही गोष्ट आता सहज साध्य झाली.