शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

दोन वर्षानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात ७४ कोटी

By admin | Updated: January 28, 2017 02:22 IST

काँग्रेसच्या सत्ताकाळात उशिरा दिल्या जाणाऱ्या मदतीवर युतीने खरपूस टीका केली. आता तोच कित्ता युती शासनाने गिरविला आहे.

दुष्काळी मदत : नुकसानग्रस्तांसाठी जिल्हा प्रशासनाचा पाच कोटींचा प्रस्तावरूपेश उत्तरवार  यवतमाळ काँग्रेसच्या सत्ताकाळात उशिरा दिल्या जाणाऱ्या मदतीवर युतीने खरपूस टीका केली. आता तोच कित्ता युती शासनाने गिरविला आहे. २०१५ मध्ये झालेल्या मदतीच्या घोषणेचा निधी २०१७ मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वळता केला आहे. न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतर महसूल विभागाने तातडीची बैठक घेतली. यातून कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना ७४ कोटी रूपये मिळणार आहेत. पाच तालुक्यातील गारपीटग्रस्तांना ११ कोटी तर अतिवृष्टीग्रस्तांसाठी पाच कोटींचा प्रस्ताव प्रशासनाने पाठविला आहे. या मदतीची आशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोडली होती. यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या खात्यात कशाचे पैसे जमा झाले, याची माहितीही मिळाली नाही. ७४ कोटी रूपयांच्या मदतीसाठी पावणे दोन लाख शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यांच्या खात्यात पैसे वळते करण्याचे पत्र १० जानेवारीला जिल्हा प्रशासनाकडे आले. जिल्हा प्रशासनाने लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर करण्याचे आदेश तहसील प्रशासनाला दिले. यादीनुसार बँक खात्यात रक्कम वळती करण्यात आली आहे.२०१५ मध्ये अपुऱ्या पावसाने पीक परिस्थिती चिंताजनक झाली होती. शेतीचे उत्पादन घटले. शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात करण्यात आली होती. त्यात काही अटी टाकण्यात आल्या होत्या. ज्या शेतकऱ्यांना पीकविम्याची मदत मिळाली, त्यांना ही मदत मिळणार नाही. मात्र ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला नव्हता, अशा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे. कळंब तालुका मात्र कापसाच्या मदतीपासून वंचित राहणार आहे. गारपीटग्रस्तांना ११ कोटी २०१६ मध्ये झालेल्या गारपिटीत बाभूळगाव, पुसद, दिग्रस, उमरखेड आणि महागाव या पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांना ११ कोटी ७४ लाख ८६ हजार रूपयांची मदत मिळणार आहे. ही मदत तालुक्याकडे वळती करण्यात आली आहे. यासोबतच मे, जून, जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली. यात शेतपिकांचे पाच कोटींचे नुकसान झाले. याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्याकडे पाठविला आहे.सोयाबीनला ५४, तर कापसासाठी १९ कोटीजिल्ह्याकडे वळत्या झालेल्या ७४ कोटी रूपयांच्या मदतीत सर्वाधिक ५४ कोटी ३४ लाख ९३ हजार ६२३ रूपयांची मदत सोयाबीन उत्पादकांना मिळणार आहे. तर १९ कोटी ६५ लाख ९४ हजार ९४८ कोटींची मदत कापूस उत्पादकांना मिळाली आहे. यवतमाळ ४ कोटी २४ लाख ७८ हजार १५४ रूपये, बाभूळगाव सात कोटी सहा लाख ७८ हजार ६६२ , आर्णी ५० लाख १२ हजार २३१, कळंब दोन कोटी ४५ लाख ५९ हजार ८८७, राळेगाव १ कोटी ९६ लाख २४ हजार ४५८, घाटंजी पाच कोटी ५५ लाख ५९ हजार ९४२, केळापूर ३० लाख ५६ हजार ७४५, वणी १२ लाख ७५ हजार ८५, दारव्हा तीन कोटी १० लाख ४१ हजार २३२, नेर १४ कोटी ७८ लाख ५८ हजार ६६१, पुसद १२ कोटी ४८ लाख ८८ हजार ७९४, दिग्रस नऊ कोटी ८८ लाख ५९ हजार २०५, उमरखेड नऊ कोटी २२ लाख ५८ हजार ८२८, महागाव दोन कोटी २९ लाख ३६ हजार ६९७ रूपये मिळाले आहेत.