शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

बारा नद्यांच्या किनाऱ्यावर दीड हजार किलोमीटरमध्ये वृक्षलागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 12:45 IST

पाणीटंचाई, महापुराच्या समस्यांवर मात करण्यासोबत नद्यांचे पात्र सुरक्षित ठेवण्यासाठी आता नद्यांच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जाणार आहे.

ठळक मुद्देयवतमाळ, वाशिम, अकोल्यातील नद्या दोन कोटी ४० लाख वृक्षांची तजवीज

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाणीटंचाई, महापुराच्या समस्यांवर मात करण्यासोबत नद्यांचे पात्र सुरक्षित ठेवण्यासाठी आता नद्यांच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जाणार आहे. यवतमाळ, वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील नदीपात्रात ही मोहीम राबविली जाणार आहे. त्याकरिता वनविभागाकडून १२ नद्यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे उन्हाळ्यात नदीपात्र कोरडे पडणार नाही, तर पावसाळ्यात नदीकाठावरील भूस्खलन थांबविता येणार आहे.यवतमाळ, वाशिम आणि अकोला जिल्ह्यात पावसाळ्यात सरासरी ८०० ते १००० मिलीमीटर पावसाची नोंद केली जाते. मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही उन्हाळ्यात नदी कोरडी पडते. गेल्या १५-२० वर्षात नदीपात्र कोरडे होण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर मात करण्यासाठी नदीच्या किनारा क्षेत्रात वृक्षलागवड करण्याचा कृती आराखडा वनविभागाने तयार केला आहे. यासाठी तीन जिल्ह्यातील प्रमुख १२ नद्यांची निवड झाली आहे. नदी किनारा क्षेत्रातील १३१६ किलोमिटर परिसरात लागवड होणार आहे. यामध्ये बारमाही हिरवे वृक्ष तसेच साग, आजन आणि इतर वृक्षांचा समावेश राहणार आहे.या मोहिमेसाठी दोन कोटी ४० लाख राखीव वृक्षांमधून काही वृक्ष वनविभाग पुरविणार आहे. पैनगंगा नदीच्या किनाऱ्यावरील ४७५ किलोमिटर परिसरात वृक्ष लागवड होणार आहे. यासोबतच वाघाडी ५९ किलोमिटर, अरुणावती १४ किलोमिटर, अडाण ४५ किलोमिटर, वर्धा नदी १४५ किलोमिटर, खुनी नदी ३४ किलोमिटर, पूस नदी २७ किलोमिटर, बेंबळा नदी २७ किलोमिटर, विदर्भा नदी २२ किलोमिटर, काटेपूर्णा, मोर्णा, पूर्णा नदीच्या ३१३ किलोमिटर परिसरात वृक्षलागवड होणार आहे.

लागवड होणारे नदीपात्रतीन जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्यांलगत ही वृक्षलागवड होणार आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगेच्या काठावरील ४७५ किलोमिटरमध्ये लागवड होईल. वाघाडी ५९ किमी, अरुणावती १४, अडाण ४५, वर्धा १४५.५, खुनी ३४, पूस २७, बेंबळा २७, तर विदर्भा नदी काठावर २२ किलोमिटरमध्ये लागवड केली जाईल. शिवाय अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा, मोर्णा, पूर्णा नदीकाठावर ३१३ किलोमिटरमध्ये तर वाशिम जिल्ह्यात अडाण, पैनगंगा, मोर्णा नदी काठावरील १६० किलोमिटरमध्ये लागवड होणार आहे.असा होणार फायदानदी काठावर वृक्षलागवड झाल्याने पाण्याचे स्त्रोत दीर्घकाळ टिकण्यास मदत होईल. नदीपात्रात होणारे अतिक्रमण थांबविता येणार आहे. पर्यावरण संरक्षण होणार आहे. नदीपात्राचे वारंवार होणारे भूस्खलन थांबेल. वन्यप्राणी, पक्षी आणि नागरिकांना येथे थोडा विसावा घेता येणार आहे.नद्यांच्या किनारा क्षेत्रात वृक्षलागवड होणार आहे. त्यासाठी वनविभाग वृक्ष पुरविणार आहे. यातून पर्यावरण समृद्धीचा प्रयत्न होणार आहे. नद्यांचे जलस्त्रोत बळकट केले जाणार आहे.- अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, यवतमाळ

टॅग्स :riverनदी