शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

बारा नद्यांच्या किनाऱ्यावर दीड हजार किलोमीटरमध्ये वृक्षलागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 12:45 IST

पाणीटंचाई, महापुराच्या समस्यांवर मात करण्यासोबत नद्यांचे पात्र सुरक्षित ठेवण्यासाठी आता नद्यांच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जाणार आहे.

ठळक मुद्देयवतमाळ, वाशिम, अकोल्यातील नद्या दोन कोटी ४० लाख वृक्षांची तजवीज

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाणीटंचाई, महापुराच्या समस्यांवर मात करण्यासोबत नद्यांचे पात्र सुरक्षित ठेवण्यासाठी आता नद्यांच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जाणार आहे. यवतमाळ, वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील नदीपात्रात ही मोहीम राबविली जाणार आहे. त्याकरिता वनविभागाकडून १२ नद्यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे उन्हाळ्यात नदीपात्र कोरडे पडणार नाही, तर पावसाळ्यात नदीकाठावरील भूस्खलन थांबविता येणार आहे.यवतमाळ, वाशिम आणि अकोला जिल्ह्यात पावसाळ्यात सरासरी ८०० ते १००० मिलीमीटर पावसाची नोंद केली जाते. मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही उन्हाळ्यात नदी कोरडी पडते. गेल्या १५-२० वर्षात नदीपात्र कोरडे होण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर मात करण्यासाठी नदीच्या किनारा क्षेत्रात वृक्षलागवड करण्याचा कृती आराखडा वनविभागाने तयार केला आहे. यासाठी तीन जिल्ह्यातील प्रमुख १२ नद्यांची निवड झाली आहे. नदी किनारा क्षेत्रातील १३१६ किलोमिटर परिसरात लागवड होणार आहे. यामध्ये बारमाही हिरवे वृक्ष तसेच साग, आजन आणि इतर वृक्षांचा समावेश राहणार आहे.या मोहिमेसाठी दोन कोटी ४० लाख राखीव वृक्षांमधून काही वृक्ष वनविभाग पुरविणार आहे. पैनगंगा नदीच्या किनाऱ्यावरील ४७५ किलोमिटर परिसरात वृक्ष लागवड होणार आहे. यासोबतच वाघाडी ५९ किलोमिटर, अरुणावती १४ किलोमिटर, अडाण ४५ किलोमिटर, वर्धा नदी १४५ किलोमिटर, खुनी नदी ३४ किलोमिटर, पूस नदी २७ किलोमिटर, बेंबळा नदी २७ किलोमिटर, विदर्भा नदी २२ किलोमिटर, काटेपूर्णा, मोर्णा, पूर्णा नदीच्या ३१३ किलोमिटर परिसरात वृक्षलागवड होणार आहे.

लागवड होणारे नदीपात्रतीन जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्यांलगत ही वृक्षलागवड होणार आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगेच्या काठावरील ४७५ किलोमिटरमध्ये लागवड होईल. वाघाडी ५९ किमी, अरुणावती १४, अडाण ४५, वर्धा १४५.५, खुनी ३४, पूस २७, बेंबळा २७, तर विदर्भा नदी काठावर २२ किलोमिटरमध्ये लागवड केली जाईल. शिवाय अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा, मोर्णा, पूर्णा नदीकाठावर ३१३ किलोमिटरमध्ये तर वाशिम जिल्ह्यात अडाण, पैनगंगा, मोर्णा नदी काठावरील १६० किलोमिटरमध्ये लागवड होणार आहे.असा होणार फायदानदी काठावर वृक्षलागवड झाल्याने पाण्याचे स्त्रोत दीर्घकाळ टिकण्यास मदत होईल. नदीपात्रात होणारे अतिक्रमण थांबविता येणार आहे. पर्यावरण संरक्षण होणार आहे. नदीपात्राचे वारंवार होणारे भूस्खलन थांबेल. वन्यप्राणी, पक्षी आणि नागरिकांना येथे थोडा विसावा घेता येणार आहे.नद्यांच्या किनारा क्षेत्रात वृक्षलागवड होणार आहे. त्यासाठी वनविभाग वृक्ष पुरविणार आहे. यातून पर्यावरण समृद्धीचा प्रयत्न होणार आहे. नद्यांचे जलस्त्रोत बळकट केले जाणार आहे.- अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, यवतमाळ

टॅग्स :riverनदी