शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनाचा मानबिंदू सहस्त्रकुंड उपेक्षितच

By admin | Updated: July 22, 2016 02:24 IST

यवतमाळ जिल्ह्याच्या पर्यटनाचा मानबिंदू असलेला व विदर्भाचा नायगारा समजल्या जाणारा सहस्त्रकुंड धबधब्याचा परिसर ...

समस्या कायम : पर्यटन विभागाचे दुर्लक्षित धोरण, सुविधांची बोंबाबोंब उमरखेड : यवतमाळ जिल्ह्याच्या पर्यटनाचा मानबिंदू असलेला व विदर्भाचा नायगारा समजल्या जाणारा सहस्त्रकुंड धबधब्याचा परिसर मात्र पर्यटन विकासाअभावी गेल्या ५० वर्षापासून उपेक्षितच राहिला आहे. सहस्त्रकुंड धबधबा जिल्ह्यातील पर्यटनाचे प्रमुख आकर्षण आहे. धबधब्याचे मनोहारी दृश्य पर्यटकांना आकृष्ट करतात. धबधब्याचे सौंदर्य डोळ््यात साठवून घेण्यासाठी पावसाळ््यात या ठिकाणी प्रचंड गार्दी असते. मराठवाड्यातील अनेक पर्यटकसुद्धा या ठिकाणी पर्यटणासाठी येत असतात. सहस्त्रकुंड पर्यटनस्थळ शासनाच्या उदासिनतेमुळे उपेक्षितच आहे. याठिकाणी कुठल्याच सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी शसनातर्फे विशेष बसगाड्यांची तथा मुक्कामी राहण्याचीही व्यवस्था नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी पर्यटकांना पिण्याचे शुद्ध पाणीसुद्धा मिळत नाही. विजेचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली नाही. सहस्त्रकुंडकडे जाणाऱ्या रस्त्याचा मार्गदर्शक फलकसुद्घा लावण्याचे सौजन्य संबंधित विभागाकडून दाखविण्यात आलेले नाही. अशाही स्थितीत शेकडो पर्यटक या ठिकाणी रोज गर्दी करून असतात. जिल्ह्याच्या पर्यटनाचा मानबिंदू असलेला हा धबधबा पर्यटनस्थळ म्हणून विकसीत होऊ शकतो. यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून प्रयत्न होत आहे. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना या भागातील पंजाबराव माने, विठ्ठलराव देवसरकर, पांडुरंग राणे, केश्वराव देवसरकर आदींनी दिल्लीत जाऊन निवेदन ही दिले होते. परंतु हा प्रश्न अद्यापही रेंगाळतच आहे. पर्यटक मात्र येथे आल्यानंतर त्रस्त दिसतात. पैनगंगा अभयारण्यातील नयनरम्य देखावे, शेकडो वर्षापासून नांदत असलेली वैविध्यापूर्ण संस्कृती, घरांची सुबक रचना, नागरिकांचा पेहराव लोककला आदीमुळे या परिसराचा विकास होणे अपेक्षित होते. मात्र या बाबीकडे पर्यटन विभागाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. अभयारण्य प्रशासनाकडून पर्यटकांसाठी विविध योजना राबविणे गरजेचे असतात. त्या योजना मात्र कागदावरच आहे. या भागात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, पर्यटनाच्या अनुषंगाने व्यवसायाभिमुख पाऊले उचलली तर स्थानिक बेरोजगारांच्या हाताला कामसुद्धा मिळू शकते. मात्र शासनाच्या उदासिनतेमुळे जिल्ह्याचा मानबिंदू असलेले सहस्त्रकुंड मात्र उपक्षेचा धनी ठरले आहे. यासोबतच या परिसरात पैनगंगा अभयारण्य आहे. अभयारण्यात जंगल सफारी सुरू करण्याची आवश्यकता आहे. यासाठी वन्यजीव विभागाने टिपेश्वर अभयारण्यासारखी व्यवस्था पैनगंगा अभयारण्यात करण्याची गरज आहे. सहस्त्रकुंड सोबतच दुधारी धबधब्याचे वैभवही देखणे आहे. मात्र या धबधब्यापर्यंत पोहोचण्यास पर्यटकांना मोठा अडथळा पार करावा लागतो. तेथे सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी) पर्यटनस्थळाचा विकास झाल्यास गर्दी वाढेल सहस्त्रकुंडामुळे विदर्भ व मराठवाड्यातील अनेक पर्यटक पावसाळ््यात येथील गर्दी करतात. या ठिकाणी पर्यटकांना पाहिजे तशा सुविधा मिळत नाही. त्यामुळे या ठिकाणी पर्यटनासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. जिल्ह्याच्या नियोजन विकास निधीतून दिला गेला तर त्याचा फायदा होईल व पर्यटनस्थळावर खर्च केला तर जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित होतील. आणि या परिसराचा विकास होईल हे तेवढेच खरे. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष सहस्त्रकुंडला पर्यटनाचा दर्जा मिळावा यासाठी व त्यावर लाखो रुपयांचा निधी खेचून आणण्यासाठी मात्र या विभागाचे लोकप्रतिनिधी कमी पडत आहे. दिल्लीमध्ये चांगले वजन असलेले काँग्रेसचे नेते अ‍ॅड़ राजीव सातव हे या विभागाचे खासदार आहेत. त्याचप्रमाणे उमरखेडचे आमदार राजेंद्र नजरधने हे महाराष्ट्र शासनाच्या सत्ताधारी पक्षाचे आहेत. खासदार व आमदार या दोघांनी ममनावर घेतले तर सहस्त्रकुंड व पैनगंगा अभयारण्याला पर्यटनाचा दर्जा मिळाल्यास वेळ लागणार नाही.