शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

शिक्षकांची १७० पदे रिक्त

By admin | Updated: December 1, 2014 23:01 IST

तालुक्यातील शिक्षणाची स्थिती अतिशय वाईट असून प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची कमतरता आहे. शिक्षकच नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ केवळ खेळण्यात येतो.

महागाव : तालुक्यातील शिक्षणाची स्थिती अतिशय वाईट असून प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची कमतरता आहे. शिक्षकच नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ केवळ खेळण्यात येतो. तालुक्यात तब्बल १७० शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महागाव तालुक्यात शिक्षकांअभावी अनेक गावातील शाळांना कुलूप ठोकण्याची पाळी आली आहे. काही शाळांना गावकऱ्यांनी कुलूप ठोकल्याच्या घटनाही घडल्या आहे. तरीदेखील जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा भरायला तयार नसल्याचे दिसून येते. जिल्हा परिषद सदस्यांना ग्रामीण जनतेच्या शिक्षणासारख्या आवश्यक प्रश्नाविषयी कोणतेही घेणे-देणे नसल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब व आदिवासींच्या मुलांचा शैक्षणिक पाया कच्चा राहात आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या २७ हजारांच्या घरात असून त्या तुलनेत त्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांची संख्या नगन्य असल्याचे दिसून येते. शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांना केवळ शाळेत टाईमपास करावा लागतो. उपस्थित शिक्षकही विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी सुटी देऊन टाकतो. कसेतरी दिवस ढकलण्याची कसरत शिक्षण विभागाची दिसून येत आहे. शिक्षक मिळावा म्हणून कासारबेहळ व वनोली येथील गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले होते. परंतु त्यांना आश्वासनांपलीकडे काहीच मिळाले नाही. ही स्थिती एक-दोन गावातील नाही तर तालुक्यातील विविध गावातील आहे. तब्बल ११७ शिक्षकांची पदे रिक्त आहे. शिक्षकांच्या अनुशेषाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर होत असून जिल्हा परिषदेचे पदाधिकारी मात्र तालुक्यातील शिक्षकांचा अनुशेष दूर करण्यास असमर्थ ठरलेले दिसून येत आहे. शिक्षकच नसल्यामुळे अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळांमधून काढून खासगी शाळेत टाकले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या झपाट्याने घसरत आहे. खासगी शाळेच्या वर्गण्या, संस्थेची मनमानी असली तरी जिल्हा परिषदेच्या कोलमडलेल्या शिक्षण विभागाच्या कारभारामुळे पोटाला पिळ देवून मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी त्यांना खासगी शाळेत टाकण्याशिवाय आता पर्याय नसल्याचे एका पालकाने ‘लोकमत’ला सांगितले. (शहर प्रतिनिधी)