शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

शिक्षकीपेशाला नव्या पिढीची ना!

By admin | Updated: September 28, 2015 02:51 IST

गेल्या काही वर्षात शिक्षकीपेशाचा सन्मान काहीसा घटला आहे. त्यामुळे नवी पिढी या पेशाच्या अभ्यासक्रमाकडे वळताना दिसत नाही.

यवतमाळ : गेल्या काही वर्षात शिक्षकीपेशाचा सन्मान काहीसा घटला आहे. त्यामुळे नवी पिढी या पेशाच्या अभ्यासक्रमाकडे वळताना दिसत नाही. त्यामुळेच जिल्ह्यातील अध्यापक महाविद्यालयाच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही वर्षांपूर्वी डीएड किंवा बीएड करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अक्षरश: उड्या पडत होत्या. बारावी किंवा पदवीच्या परीक्षेला गुणवत्ता यादीत झळकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकत होता. निकालाची टक्केवारी किंचितही घसरली तरी डीएड, बीएडच्या प्रवेशापासून हजारो विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत होते. त्यातूनच पुढे व्यवस्थापन कोटा हा प्रकार अध्यापक महाविद्यालयांमध्ये निर्माण करण्यात आला. कमी टक्केवारी असणाऱ्या श्रीमंत विद्यार्थ्यांना या २० टक्के व्यवस्थापन कोट्यामधून प्रवेश दिला जात होता. त्यासाठी एक ते दीड लाखांपर्यंत शुल्कही विद्यार्थी स्वखुशीने भरत होते. मात्र गेल्या तीन-चार वर्षांपासून या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील डीएड आणि बीएड महाविद्यालयांच्या अनेक जागा रिक्त राहात आहे. एकीकडे टीईटी, सीईटी सध्या परीक्षांना बेरोजगार उमेदवारांची खच्चून गर्दी होत आहे. मात्र नोकऱ्या त्यातील काही जणांनाच मिळू शकत आहे. त्यामुळे डीएड आणि बीएडधारक उमेदवारांची बेरोजगारी वाढत आहे. समाजातील असे हजारो बेरोजगार पाहून नवी पिढी हा अभ्यासक्रम टाळत आहे. यंदा तर जागाच न भरल्याने जिल्ह्यातील बीएडची महाविद्यालये अद्यापही सुरू झालेली नाही. वास्तविक जुलैमध्येच सत्र सुरू होण्याची गरज आहे. यंदा मात्र आधी प्रवेश देऊन नंतर त्या जागांना मान्यता मिळविण्याची औपचारिकता पार पाडली जात आहे.यवतमाळ जिल्ह्यात बीएडची साधारण १२-१३ महाविद्यालये आहेत. यावर्षी बीएड प्रवेशासाठी दोन प्रवेशफेऱ्या पार पडल्या. तरीही प्रत्येक महाविद्यालयात केवळ १४ ते १५ विद्यार्थ्यांचे प्रवेश आतापर्यंत होवू शकले. वास्तवात या महाविद्यालयांची प्रवेश क्षमता ५० विद्यार्थ्यांची आहे. त्यामुळे या महाविद्यालयांनी आता प्रतीक्षा यादीची तिसरी फेरी आजमावून पाहण्याचे ठरविले आहे. यावेळी स्पॉट अ‍ॅडमिशनद्वारे थेट महाविद्यालयातच प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठीही २९ सप्टेंबर ते १ आॅक्टोबर अशा तीनच दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित ७५ टक्के रिक्त जागा या तीन दिवसात भरल्या जाण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. या जागा न भरल्यास अनेक बीएड महाविद्यालयांची मान्यता धोक्यात येण्याची शक्यता आहे. (स्थानिक प्रतिनिधी)