शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

१२ वर्षांपासून पाण्यासाठी टाहो

By admin | Updated: February 16, 2015 01:52 IST

तालुक्यातील चिकणी (डोमगा) येथील नागरिकांना गेली १२ वर्षांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. दरवर्षी निर्माण होणारी ही समस्या निकाली काढण्यासाठी निवेदने,

नेर : तालुक्यातील चिकणी (डोमगा) येथील नागरिकांना गेली १२ वर्षांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. दरवर्षी निर्माण होणारी ही समस्या निकाली काढण्यासाठी निवेदने, घागर मोर्चा आदी प्रकारचे आंदोलन करण्यात आले. मात्र ही समस्या सोडविली गेली नाही. परिणामी याहीवर्षी नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याचे चित्र आहे. या परिसरातील लोकप्रतिनिधी मात्र उदासीन आहेत.नेर-कारंजा मार्गावर असलेल्या या गावाची लोकसंख्या अडीच हजार आहे. या गावाला दूरवर असलेल्या एका विहिरीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र या योजनेच्या पाईपलाईनचे काम निकृष्ट झाल्याने गावकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचलेच नाही. अखेर ही योजना बंद पडली. प्रशासनाने या गावात कुपनलिका खोदली. मात्र हे स्रोतही उन्हाळ्यात कोरडे पडतात. गावातील दोन विहिरींमध्येही ठणठणाट असतो. या स्रोतांना पाणी राहात नसल्याने गावकऱ्यांना गावापासून तीन किलोमीटर दूर अंतरावरून पाणी आणावे लागते. मजूर वर्गाला कामधंदा सोडून पाण्यासाठी भटकावे लागते. कालांतराने ही समस्या एवढी तीव्र होते की आंघोळही तीन दिवसांच्या अंतराने करावी लागते. पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. मात्र परिसराशी संबंधित लोकप्रतिनिधी गावामध्ये योजना खेचून आणण्यात फारसे गंभीर दिसत नाही. परिणामी जनतेला विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. यातीलच एक गंभीर समस्या पाण्याची आहे. (तालुका प्रतिनिधी)