शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

१२ वर्षांपासून पाण्यासाठी टाहो

By admin | Updated: February 16, 2015 01:52 IST

तालुक्यातील चिकणी (डोमगा) येथील नागरिकांना गेली १२ वर्षांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. दरवर्षी निर्माण होणारी ही समस्या निकाली काढण्यासाठी निवेदने,

नेर : तालुक्यातील चिकणी (डोमगा) येथील नागरिकांना गेली १२ वर्षांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. दरवर्षी निर्माण होणारी ही समस्या निकाली काढण्यासाठी निवेदने, घागर मोर्चा आदी प्रकारचे आंदोलन करण्यात आले. मात्र ही समस्या सोडविली गेली नाही. परिणामी याहीवर्षी नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याचे चित्र आहे. या परिसरातील लोकप्रतिनिधी मात्र उदासीन आहेत.नेर-कारंजा मार्गावर असलेल्या या गावाची लोकसंख्या अडीच हजार आहे. या गावाला दूरवर असलेल्या एका विहिरीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र या योजनेच्या पाईपलाईनचे काम निकृष्ट झाल्याने गावकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचलेच नाही. अखेर ही योजना बंद पडली. प्रशासनाने या गावात कुपनलिका खोदली. मात्र हे स्रोतही उन्हाळ्यात कोरडे पडतात. गावातील दोन विहिरींमध्येही ठणठणाट असतो. या स्रोतांना पाणी राहात नसल्याने गावकऱ्यांना गावापासून तीन किलोमीटर दूर अंतरावरून पाणी आणावे लागते. मजूर वर्गाला कामधंदा सोडून पाण्यासाठी भटकावे लागते. कालांतराने ही समस्या एवढी तीव्र होते की आंघोळही तीन दिवसांच्या अंतराने करावी लागते. पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. मात्र परिसराशी संबंधित लोकप्रतिनिधी गावामध्ये योजना खेचून आणण्यात फारसे गंभीर दिसत नाही. परिणामी जनतेला विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. यातीलच एक गंभीर समस्या पाण्याची आहे. (तालुका प्रतिनिधी)