शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
9
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
10
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
11
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
12
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
13
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
14
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
15
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
16
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
17
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
18
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
19
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
20
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला

सरळसेवेच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 22:16 IST

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : दोन वर्षे संधी देऊनही अवजड वाहन चालविण्याचे लायसन्स सादर केले नसल्याने ‘एसटी’तील सरळसेवा भरतीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. यवतमाळ विभागातील नऊ कर्मचारी या कारवाईच्या कक्षेत आहे. प्रसंगी त्यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई होऊ शकते. नियमाची पूर्तता करून घेण्यात घटक प्रमुखांचेही प्रयत्न झाले नसल्याची बाब यानिमित्ताने पुढे आली ...

ठळक मुद्दे‘एसटी’चे नियम तोडले : अवजड वाहन चालविण्याचे लायसन्स नाही

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : दोन वर्षे संधी देऊनही अवजड वाहन चालविण्याचे लायसन्स सादर केले नसल्याने ‘एसटी’तील सरळसेवा भरतीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. यवतमाळ विभागातील नऊ कर्मचारी या कारवाईच्या कक्षेत आहे. प्रसंगी त्यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई होऊ शकते. नियमाची पूर्तता करून घेण्यात घटक प्रमुखांचेही प्रयत्न झाले नसल्याची बाब यानिमित्ताने पुढे आली आहे.सरळसेवा भरतीचे यवतमाळ विभागात १८ कर्मचारी आहेत. यातील काही आगार व्यवस्थापक, वाहतूक निरीक्षक, सहायक वाहतूक अधीक्षकांनी आपल्या सेवेची सात ते वर्षे होऊनही अवजड वाहन चालविण्याचे लायसन्स सादर केलेले नाही. विशेष म्हणजे पर्यवेक्षकीय पदावरील कर्मचारी याविषयी गंभीर नसल्याचा ठपका महामंडळाने वारंवार ठेवला आहे.सरळसेवा भरतीने सहायक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, वरिष्ठ कार्यदेशक, कनिष्ठ कार्यदेशक, प्रभारक, सहायक कार्यशाळा अधीक्षक या पदावर नियुक्ती दिली जाते. या कर्मचाºयांना रुजू होताच लर्निंग लायसन्स सादर करावे लागते. नियुक्ती दिल्यानंतर दोन वर्षांच्या कालावधीत अवजड वाहन चालविण्याचे लायसन्स सादर करण्याची अट आहे. ही प्रक्रिया पूर्ण करून घेण्याची जबाबदारी विभाग व घटक प्रमुखांवर सोपविण्यात आलेली आहे. तरीही कर्मचारी अटीची पूर्तता करीत नाही, तर घटक प्रमुखांकडून प्रयत्न होत नाही. लायसन्स मुदतीत सादर केली नसल्याची बाब पदाच्या अर्हतेचा भंग करणारी असल्याने कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. वार्षिक वेतनवाढ रोखणे आणि पुढे सेवा समाप्तीची कारवाई निश्चित करण्यात आली आहे. यवतमाळ विभागातील नऊ कर्मचाºयांनी लायसन्स सादर केलेले नाही. एसटी महामंडळाच्या राज्यातील इतर विभागातही अशा कर्मचाºयांची संख्या मोठी असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर काय कारवाई होते, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.चालकांवर अन्यायअपघातग्रस्त बसचा अहवाल सरळसेवा भरतीचे कर्मचारी अर्थात आगार व्यवस्थापक, वाहतूक निरीक्षक, अधीक्षक देतात. काही कर्मचाºयांजवळ अवजड वाहन चालविण्याचे लायसन्स नाही. अर्थातच त्यांनी अशा प्रकारचे वाहन हाताळले नाही. अपघात कसा झाला असेल, जबाबदार कोण याची माहिती अहवालात नोंदविली जाते. अनुभव नसलेले कर्मचारी अहवाल देतात. यामध्ये चालकांवर अन्याय होत असल्याची ओरड आहे.