शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

सरळसेवेच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 22:16 IST

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : दोन वर्षे संधी देऊनही अवजड वाहन चालविण्याचे लायसन्स सादर केले नसल्याने ‘एसटी’तील सरळसेवा भरतीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. यवतमाळ विभागातील नऊ कर्मचारी या कारवाईच्या कक्षेत आहे. प्रसंगी त्यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई होऊ शकते. नियमाची पूर्तता करून घेण्यात घटक प्रमुखांचेही प्रयत्न झाले नसल्याची बाब यानिमित्ताने पुढे आली ...

ठळक मुद्दे‘एसटी’चे नियम तोडले : अवजड वाहन चालविण्याचे लायसन्स नाही

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : दोन वर्षे संधी देऊनही अवजड वाहन चालविण्याचे लायसन्स सादर केले नसल्याने ‘एसटी’तील सरळसेवा भरतीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. यवतमाळ विभागातील नऊ कर्मचारी या कारवाईच्या कक्षेत आहे. प्रसंगी त्यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई होऊ शकते. नियमाची पूर्तता करून घेण्यात घटक प्रमुखांचेही प्रयत्न झाले नसल्याची बाब यानिमित्ताने पुढे आली आहे.सरळसेवा भरतीचे यवतमाळ विभागात १८ कर्मचारी आहेत. यातील काही आगार व्यवस्थापक, वाहतूक निरीक्षक, सहायक वाहतूक अधीक्षकांनी आपल्या सेवेची सात ते वर्षे होऊनही अवजड वाहन चालविण्याचे लायसन्स सादर केलेले नाही. विशेष म्हणजे पर्यवेक्षकीय पदावरील कर्मचारी याविषयी गंभीर नसल्याचा ठपका महामंडळाने वारंवार ठेवला आहे.सरळसेवा भरतीने सहायक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, वरिष्ठ कार्यदेशक, कनिष्ठ कार्यदेशक, प्रभारक, सहायक कार्यशाळा अधीक्षक या पदावर नियुक्ती दिली जाते. या कर्मचाºयांना रुजू होताच लर्निंग लायसन्स सादर करावे लागते. नियुक्ती दिल्यानंतर दोन वर्षांच्या कालावधीत अवजड वाहन चालविण्याचे लायसन्स सादर करण्याची अट आहे. ही प्रक्रिया पूर्ण करून घेण्याची जबाबदारी विभाग व घटक प्रमुखांवर सोपविण्यात आलेली आहे. तरीही कर्मचारी अटीची पूर्तता करीत नाही, तर घटक प्रमुखांकडून प्रयत्न होत नाही. लायसन्स मुदतीत सादर केली नसल्याची बाब पदाच्या अर्हतेचा भंग करणारी असल्याने कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. वार्षिक वेतनवाढ रोखणे आणि पुढे सेवा समाप्तीची कारवाई निश्चित करण्यात आली आहे. यवतमाळ विभागातील नऊ कर्मचाºयांनी लायसन्स सादर केलेले नाही. एसटी महामंडळाच्या राज्यातील इतर विभागातही अशा कर्मचाºयांची संख्या मोठी असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर काय कारवाई होते, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.चालकांवर अन्यायअपघातग्रस्त बसचा अहवाल सरळसेवा भरतीचे कर्मचारी अर्थात आगार व्यवस्थापक, वाहतूक निरीक्षक, अधीक्षक देतात. काही कर्मचाºयांजवळ अवजड वाहन चालविण्याचे लायसन्स नाही. अर्थातच त्यांनी अशा प्रकारचे वाहन हाताळले नाही. अपघात कसा झाला असेल, जबाबदार कोण याची माहिती अहवालात नोंदविली जाते. अनुभव नसलेले कर्मचारी अहवाल देतात. यामध्ये चालकांवर अन्याय होत असल्याची ओरड आहे.