शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

सोयाबीन, कपाशीने पोळलेले शेतकरी वळले उसाकडे

By admin | Updated: February 23, 2015 00:12 IST

निसर्गाच्या अवकृपेने सोयाबीन, कपाशीमुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी आता ऊस लागवडीकडे वळत आहे. यंदा पुसद उपविभागात लागवड क्षेत्रात दुप्पट वाढ झाली...

रितेश पुरोहित  महागाव निसर्गाच्या अवकृपेने सोयाबीन, कपाशीमुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी आता ऊस लागवडीकडे वळत आहे. यंदा पुसद उपविभागात लागवड क्षेत्रात दुप्पट वाढ झाली असून पाच हजार हेक्टर नवीन आणि चार हेक्टर खोडवा असा नऊ हजार हेक्टर उसाची लागवड झाली आहे. मात्र साखर कारखान्यांची क्षमता अपुरी असल्याने पुढल्या वर्षी ऊस विक्रीचा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहणार आहे.पुसद आणि उमरखेड उपविभागात गेल्या काही वर्षांपासून शेतकरी उसाची लागवड करीत आहे. वसंत सहकारी साखर कारखाना आणि सुधाकर नाईक सहकारी साखर कारखान्यामुळे ऊस लागवड मोठ्या प्रमाणात होत होती. मात्र काही वर्षातच गुंज येथील सुधाकरराव नाईक साखर कारखाना बंद पडला. एकमेव पोफाळीच्या कारखान्याला ऊस द्यावा लागतो. यामुळे शेतकऱ्यांनी ऊसाकडे पाठ फिरविली होती. परंतु गेल्या तीन-चार वर्षात सतत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कपाशी आणि सोयाबीन दरवर्षी दगा देत आहे. यातून शेतकरी कर्जबाजारी होत आहे. परिणामी पुन्हा महागाव, पुसद आणि उमरखेड तालुक्यातील शेतकरी ऊस लागवडीकडे वळला आहे. यावर्षी नऊ हजार हेक्टरवर या तीन तालुक्यात उसाची लागवड झाली आहे. त्यात चार हजार हेक्टर खोडवा आणि पाच हजार हेक्टर नवीन ऊस आहे. वसंत साखर कारखान्याने आतापर्यंत यापरिसरातील ऊस मोठ्या प्रमाणात उचलला आहे. या कारखान्याची गाळप क्षमता चार लाख हेक्टरची आहे. परंतु आतापर्यंत केवळ एक लाख ९० हजार मेट्रीक टनाचे गाळप यंदा झाले आहे. पुसद महागाव आणि उमरखेड परिसरात ४०० हेक्टरवर सध्या ऊस उभा आहे. पुढल्या वर्षी क्षेत्र वाढल्याने मोठ्या प्रमाणात ऊस शेतातच उभा राहण्याची भीती व्यक्त होत आहे.