शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सोयाबीन, कपाशीने पोळलेले शेतकरी वळले उसाकडे

By admin | Updated: February 23, 2015 00:12 IST

निसर्गाच्या अवकृपेने सोयाबीन, कपाशीमुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी आता ऊस लागवडीकडे वळत आहे. यंदा पुसद उपविभागात लागवड क्षेत्रात दुप्पट वाढ झाली...

रितेश पुरोहित  महागाव निसर्गाच्या अवकृपेने सोयाबीन, कपाशीमुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी आता ऊस लागवडीकडे वळत आहे. यंदा पुसद उपविभागात लागवड क्षेत्रात दुप्पट वाढ झाली असून पाच हजार हेक्टर नवीन आणि चार हेक्टर खोडवा असा नऊ हजार हेक्टर उसाची लागवड झाली आहे. मात्र साखर कारखान्यांची क्षमता अपुरी असल्याने पुढल्या वर्षी ऊस विक्रीचा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहणार आहे.पुसद आणि उमरखेड उपविभागात गेल्या काही वर्षांपासून शेतकरी उसाची लागवड करीत आहे. वसंत सहकारी साखर कारखाना आणि सुधाकर नाईक सहकारी साखर कारखान्यामुळे ऊस लागवड मोठ्या प्रमाणात होत होती. मात्र काही वर्षातच गुंज येथील सुधाकरराव नाईक साखर कारखाना बंद पडला. एकमेव पोफाळीच्या कारखान्याला ऊस द्यावा लागतो. यामुळे शेतकऱ्यांनी ऊसाकडे पाठ फिरविली होती. परंतु गेल्या तीन-चार वर्षात सतत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कपाशी आणि सोयाबीन दरवर्षी दगा देत आहे. यातून शेतकरी कर्जबाजारी होत आहे. परिणामी पुन्हा महागाव, पुसद आणि उमरखेड तालुक्यातील शेतकरी ऊस लागवडीकडे वळला आहे. यावर्षी नऊ हजार हेक्टरवर या तीन तालुक्यात उसाची लागवड झाली आहे. त्यात चार हजार हेक्टर खोडवा आणि पाच हजार हेक्टर नवीन ऊस आहे. वसंत साखर कारखान्याने आतापर्यंत यापरिसरातील ऊस मोठ्या प्रमाणात उचलला आहे. या कारखान्याची गाळप क्षमता चार लाख हेक्टरची आहे. परंतु आतापर्यंत केवळ एक लाख ९० हजार मेट्रीक टनाचे गाळप यंदा झाले आहे. पुसद महागाव आणि उमरखेड परिसरात ४०० हेक्टरवर सध्या ऊस उभा आहे. पुढल्या वर्षी क्षेत्र वाढल्याने मोठ्या प्रमाणात ऊस शेतातच उभा राहण्याची भीती व्यक्त होत आहे.