शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

अल्पभूधारक शेतकरी आले अडचणीत

By admin | Updated: June 18, 2014 00:26 IST

खरिपाची पेरणी तोंडावर आली आहे़ त्यासाठी लागणारी खते व बियाणे खरेदीकरिता पैसा जवळ नसल्याने काबाडकष्ट करणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांवर जनावरे विक्री करण्याची वेळ आली आहे़

वणी : खरिपाची पेरणी तोंडावर आली आहे़ त्यासाठी लागणारी खते व बियाणे खरेदीकरिता पैसा जवळ नसल्याने काबाडकष्ट करणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांवर जनावरे विक्री करण्याची वेळ आली आहे़सध्या खरीपाची लगबग सुरू झाली आहे. बळीराजाला मृगाच्या पावसाची प्रतीक्षा आहे. पेरणीसाठी खत, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने त्यातील अनेकांनी आता आपली पाळीव जनावरे विक्रीसाठी काढली आहेत. गुरांच्या बाजारात व्यापाऱ्यांचा बोलबाला असल्याने शेतकऱ्यांना स्वमालकीच्या जनावरांना कवडीमोल भावाने विक्री करण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही़ व्यापारी मागेल त्या किंमतीत जनावरांची विक्री जोरात सुरू आहे़निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी दरवर्षी अडचणीत येतो़ कधी कमी पावसामुळे पीक करपून जाते, तर कधी अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी होते. या दरवर्षीच्या स्थितीमुळे शेतकरी पुरता अडचणीत सापडतो़ दरवर्षी होणाऱ्या पिकांची नुकसान भरपाई करण्यासाठी शेतकरी प्रशासनाकडे मागणी करतो. मात्र त्याला तुटपुंजी मदत दिली जाते़ बँकेकडूनही त्यांना अत्यल्प कर्ज दिले जाते़ त्यात त्यांच्या शेतीचा खर्चही भागत नाही़ त्यातच महागाईचा फटकाही सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे़ सोबतच खत, बियाणे यांचे वाढलेले भाव शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसले आहे़ नापिकीमुळे शेतकऱ्यांना कर्जासाठी सावकाराच्या दारात उभे राहावे लागत आहे़ सावकार शेतकऱ्यांना कर्ज देऊन त्यांची वेळ निभावून नेतो. मात्र नंतर व्याजाने शेतकऱ्यांची पुन्हा मान मुरगळली जाते. त्यात जर नापिकी झाली किंवा अतिवृष्टीचा फटका बसला, तर शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरत नाही़ त्यातच शेतीपयोगी साहित्य व मजुरी वाढल्याने लहान शेतकऱ्यांची अडचण झाली आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांची खरी धनदौलत असलेल्या जनावरांची कवडीमोल भावात विक्री करावी लागत आहे. आता बियाणे व खत घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने ते आपल्या लाडक्या पाळीव जनावरांची विक्री करीत आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)