शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

अल्पभूधारक शेतकरी आले अडचणीत

By admin | Updated: June 18, 2014 00:26 IST

खरिपाची पेरणी तोंडावर आली आहे़ त्यासाठी लागणारी खते व बियाणे खरेदीकरिता पैसा जवळ नसल्याने काबाडकष्ट करणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांवर जनावरे विक्री करण्याची वेळ आली आहे़

वणी : खरिपाची पेरणी तोंडावर आली आहे़ त्यासाठी लागणारी खते व बियाणे खरेदीकरिता पैसा जवळ नसल्याने काबाडकष्ट करणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांवर जनावरे विक्री करण्याची वेळ आली आहे़सध्या खरीपाची लगबग सुरू झाली आहे. बळीराजाला मृगाच्या पावसाची प्रतीक्षा आहे. पेरणीसाठी खत, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने त्यातील अनेकांनी आता आपली पाळीव जनावरे विक्रीसाठी काढली आहेत. गुरांच्या बाजारात व्यापाऱ्यांचा बोलबाला असल्याने शेतकऱ्यांना स्वमालकीच्या जनावरांना कवडीमोल भावाने विक्री करण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही़ व्यापारी मागेल त्या किंमतीत जनावरांची विक्री जोरात सुरू आहे़निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी दरवर्षी अडचणीत येतो़ कधी कमी पावसामुळे पीक करपून जाते, तर कधी अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी होते. या दरवर्षीच्या स्थितीमुळे शेतकरी पुरता अडचणीत सापडतो़ दरवर्षी होणाऱ्या पिकांची नुकसान भरपाई करण्यासाठी शेतकरी प्रशासनाकडे मागणी करतो. मात्र त्याला तुटपुंजी मदत दिली जाते़ बँकेकडूनही त्यांना अत्यल्प कर्ज दिले जाते़ त्यात त्यांच्या शेतीचा खर्चही भागत नाही़ त्यातच महागाईचा फटकाही सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे़ सोबतच खत, बियाणे यांचे वाढलेले भाव शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसले आहे़ नापिकीमुळे शेतकऱ्यांना कर्जासाठी सावकाराच्या दारात उभे राहावे लागत आहे़ सावकार शेतकऱ्यांना कर्ज देऊन त्यांची वेळ निभावून नेतो. मात्र नंतर व्याजाने शेतकऱ्यांची पुन्हा मान मुरगळली जाते. त्यात जर नापिकी झाली किंवा अतिवृष्टीचा फटका बसला, तर शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरत नाही़ त्यातच शेतीपयोगी साहित्य व मजुरी वाढल्याने लहान शेतकऱ्यांची अडचण झाली आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांची खरी धनदौलत असलेल्या जनावरांची कवडीमोल भावात विक्री करावी लागत आहे. आता बियाणे व खत घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने ते आपल्या लाडक्या पाळीव जनावरांची विक्री करीत आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)