शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
3
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
4
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
5
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
6
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
7
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
8
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
9
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
10
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
11
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
12
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
13
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
14
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
15
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
16
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
17
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
18
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
19
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
20
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)

पोलीस संरक्षणात तूर खरेदी

By admin | Updated: April 23, 2017 02:26 IST

शासकीय तूर खरेदीच्या शेवटच्या दिवशी शनिवारी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना चक्क

४० हजार क्विंटलची मोजणीच नाही : टोकनवरील सव्वातीन लाख तुरीचे काय? यवतमाळ : शासकीय तूर खरेदीच्या शेवटच्या दिवशी शनिवारी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना चक्क पोलीस संरक्षणात तूर खरेदी करावी लागली. तरीही ४० हजार क्विंटल तूर खरेदी होऊ शकली नाही. आता खरेदी बंद झाल्याने हजारो शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. सव्वा तीन लाख क्विंटलची शेतकऱ्यांनी टोकनव्दारे नोंदणी केली होती. त्या तुरीचे आता काय होणार, असा प्रश्न आहे. शासकीय तूर खरेदी केंद्र असलेल्या बाजार समित्यांमध्ये अखेरच्या दिवशी मोठ्या प्रमाणात तुरीची आवक झाली. शुक्रवारी रात्रीपासूनच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केंद्रावर तूर विक्रीसाठी आणली. परिणामी या केंद्रावरील गर्दी अवाक्याबाहेर गेली होती. अशी स्थिती उद्भवण्याची शक्यता गृहित धरूनच जिल्हाधिकाऱ्यांनी आधीच बाजार समित्यांना पोलीस संरक्षण मागण्याचे निर्देश दिले होते. तसेच त्यांनी स्थिती स्फोटक होण्याचा धोकाही हेरला होता. त्यानुसार बाजार समित्यांनी गर्दी हाताळण्यासाठी शेवटच्या दिवशी पोलिसांना पाचारण केले. जिल्ह्यात शनिवारी सर्वच बाजार समित्यांमध्ये चक्क पोलीस संरक्षणात तुरीचे मोजमाप करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत तूर खरेदी सुरू होती. तरीही दिवसाअखेर जिल्ह्यातील ४० हजार क्विंटल तुरीचे मोजमाप झालेच नाही. ही तूर अद्यापही या केंद्रावर उघड्यावर पडून आहे. आता ती खरेदी केली जाईल किंवा नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सव्वा तीन लाख क्विंटल तुरीची नोंद टोकनावर करण्यात आली आहे. त्यांचे मोजमापही बाकी आहे. या समस्येवर चर्चा करण्यासाठी रविवार, २३ एप्रिलला यवतमाळात सर्व बाजार समितींच्या सभापतींची तातडीची बैठक होत आहे. जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनचे ११ केंद्र आहे. विदर्भ को-आॅपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन व एफसीआयचे प्रत्येकी दोन, असे एकूण १५ केंद्र सुरू करण्यात आले होते. या सर्व केंद्रांना २२ एप्रिलपर्यंत तूर खरेदीचे आदेश होते. त्यामुळे या सर्व केंद्रांवर अखेरच्या दिवशी तुफान गर्दी झाली होती. राळेगाव व आर्णी येथील केंद्रांवर अखेरच्या दिवशीही खरेदी झाली नाही. यामुळे तेथील शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. यवतमाळ केंद्रावर अखेरच्या दिवशी सर्वाधिक गर्दी होती. येथे पोलीस उपनिरीक्षक योगेश हिवशे यांच्या नेतृत्वातील पोलीस पथकाच्या बंदोबस्तात दुपारी खरेदी सुरू झाली. यात मोजक्याच शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली. इतर शेतकऱ्यांवर आता खुल्या बाजार मातीमोल भावाने तूर विकण्याची वेळ ओढवली आहे. बाजारात व्यापाऱ्यांनी दर पाडले. त्यामुळे शेतकऱ्यांकडून खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी तूर उत्पादकांची स्थिती जाणून घेण्यासाठी शासकीय खरेदी केंद्रांना तत्काळ अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहे. त्यांनी किती तूर खरेदी झाली, किती तूर बाकी आहे, याचा अहवाल मागितला. (शहर वार्ताहर) चाळणी अन् काट्यांची ओढाओढ निदान अखेरच्या दिवशी आपल्या तुरीची खरेदी व्हावी म्हणून यवतमाळ केंद्रांवर शेतकऱ्यांची चाळणी आणि काट्यांची ओढाओढ सुरू होती. अनेकांचा तास न् तास प्रतीक्षा करूनही नंबर लागत नसल्याने त्यांना प्रतीक्षा करावी लागत होती. अशात लगतच्या तुरीची मोजणी होताच काही शेतकरी काटे आणि चाळण्या आपल्याकडे ओढून मोजणीची मागणी करीत होते. २१ कोटींचे चुकारे रखडले नाफेडने आत्तापर्यंत एक लाख २० हजार ५८७ क्विंटल तूर खरेदी केली. त्यापोटी ६० कोटी ८९ लाख ६५ हजार १२ रूपयांचा चुकारा अदा करावा लागणार आहे. मात्र त्यातील ४६ कोटी ५४ लाख ८८ हजार ५९८ रूपयांचे चुकारेच आत्तापर्यंत अदा झाले आहे. अद्याप १४ कोटी ३४ लाख ७७ हजाराचे चुकारे थांबले आहे. व्हीसीएमएसने २५ कोटी ७१ लाख ९७ हजारांची ५० हजार २३० क्विंटल तूर खरेदी केली. यापैकी १८ कोटी २९ लाख रूपयांचे चुकारे अदा झाले. अद्याप ७ कोटींचे चुकारे बाकी आहे.