शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

शाहू महाराजांचा सर्वाधिक खर्च शिक्षणावर

By admin | Updated: July 6, 2017 00:44 IST

ब्रिटिशांचे मुंबई प्रांताचे शिक्षणासाठीचे बजेट ७० हजार रुपये होते. त्या तुलनेत अगदीच लहान असलेल्या कोल्हापूर संस्थानचे बजेट एक लाख रुपये होते.

हरी नरके : बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशनतर्फे व्याख्यान लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : ब्रिटिशांचे मुंबई प्रांताचे शिक्षणासाठीचे बजेट ७० हजार रुपये होते. त्या तुलनेत अगदीच लहान असलेल्या कोल्हापूर संस्थानचे बजेट एक लाख रुपये होते. संस्थानच्या उत्पन्नाचा २३ टक्के खर्च राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणावर केला. एवढे पैसे शिक्षणावर खर्च करणारा राजर्षी हा जगातील एकमेव राजा होता. याशिवाय १९१७ साली सार्वजनिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणारा हा पहिला राजा आहे. पाल्य शाळेत गैरहजर राहिला तर दरदिवशी एक रुपया दंड किंवा तुरुंगवास अशी कडक शीक्षा ठोकणारा कायदा त्यांनी लागू केला होता. महात्मा फुलेंचा हा वैचारिक वारसदार शिक्षणाच्या बाबतीत अत्यंत कठोर होता, असे प्रतिपादन प्रा.डॉ. हरी नरके यांनी केले. आज पश्चिम महाराष्ट्रात जी सहकार चळवळ फोफावली, त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेसारखी संस्था उभी राहिली त्याचे श्रेयही राजर्षीकडे जाते, असे ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशन यवतमाळद्वारा आयोजित राजर्षी शाहू महाराज जयंती समारोहाप्रसंगी ‘फुले-शाहू-आंबेडकर यांचा सामाजिक न्याय’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राठोड होते. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात डॉ. नरके पुढे म्हणाले, शिक्षणाचा प्रारंभ खालून वर म्हणजे, शुद्र, अतीशुद्र, स्त्रिया यांच्यापासून व्हावा ही महात्मा फुलेंची इच्छा होती. याच विचाराने प्रेरित होऊन बडोदे येथील संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांनीही १९०६ साली सार्वजनिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले होते. शेती आणि औद्योगिक शिक्षण लहानपणापासूनच मुलांना सक्तीचे आणि मोफत करावे, ही फुलेंची इच्छा मात्र अजूनही अपूर्णच आहे. ती अंमलात आली असती तर आज शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली नसती. विशेष म्हणजे, १०० वर्षांपूर्वी डॉ. आंबेडकर यांनीसुद्धा शेतकऱ्यांसाठी पुस्तक लिहून त्यात पाच सूत्री कार्यक्रमाचे विवेचन केले आहे. राजर्षी शाहूंची जयंती १९९९ पर्यंत फक्त पश्चिम महाराष्ट्रात साजरी होत असे. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी चर्चा करून आणि पाठपुरावा करून ती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी होण्याचे श्रेय आपले आहे, असे त्यांनी नम्रपणे सांगितले. याशिवाय डॉ. आंबेडकरांच्या एका पत्रामुळे शाहू महाराजांची जयंती २६ जुलैला नसून २६ जूनला असल्याचे अस्सल पुरावे शोधल्यानंतरच २६ जून ही जयंती तारीख सर्वमान्य झाली. हाही माझ्यासाठी अभिमानाचा विषय आहे, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे संचालन विनंती इंगळे हिने केले.