शहरं
Join us  
Trending Stories
1
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या प्रवाशांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
2
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
3
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
4
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
5
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
6
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
7
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
8
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
9
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
10
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
11
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
12
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
13
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
14
अवकाशातून अत्यंत स्पष्ट फोटो मिळाले असते, पण...; पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम अयशस्वी
15
अबोल वेदना, गोंधळलेली मने : पुरुषांच्या मानसिक आरोग्याची वेळीच दखल घ्या! मानसोपचारतज्ज्ञांचे आवाहन
16
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
17
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
18
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
19
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
20
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव

हंगामापूर्वीच बाजारपेठ गडगडली

By admin | Updated: August 20, 2016 00:28 IST

केंद्र शासनाने महागाई नियंत्रित करण्यासाठी विदेशातून डाळींची आयात केली. याचा थेट परिणाम बाजारपेठेवर झाला आहे.

शेतमालाचे भाव निम्म्यावर : आयात डाळींचा परिणाम, अस्थिर दराने शेतकरी संभ्रमात यवतमाळ : केंद्र शासनाने महागाई नियंत्रित करण्यासाठी विदेशातून डाळींची आयात केली. याचा थेट परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. खरीप हंगाम संपण्यापूर्वीच बाजारात शेतमालाचे दर घसरले आहेत. हे दर निम्म्यापर्यंत खाली आल्याने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. आताच दर घसरल्याने हंगामात दर मिळणार किंवा नाही, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. डाळीचा तुटवडा दूर करण्यासाठी बाजारात ८ लाख मेट्रीक टन डाळाची आयात केली आहे. यामध्ये तूर, मूग, उडीद, चणा डाळीचा समावेश आहे. आयातीमुळे डाळीचे दर घसरले आहेत. याचाच परिणाम कडधान्यावर झाला आहे. साधारणत: जुलै-आॅगस्टमध्ये कडधान्याचे भाव वाढतात. हा अनुभव गृहीत धरून अनेक शेतकऱ्यांनी शेतमालाची विक्री केलीच नाही. परंतु, केंद्र शासनाने खरीप हंगामापूर्वीच डाळीची मोठ्या प्रमाणात आयात केली. यामुळे शेतमालाचे दर बाजारपेठेत निम्म्यावर आले आहे. यातून शेतकऱ्यांना जबर फटका सोसावा लागणार आहे. खरीप हंगाम संपण्यापूर्वी बाजारात शेतमालाचे दर निम्म्यावर आल्याने शेतकरी चिंतेत पडले आहे. हंगामाला प्रारंभ होताच शेतमालाच्या दराची अवस्था काय होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. डाळ आयात झाल्याने खुल्या बाजारात डाळीचे दर पडले आहेत. याचा परिणाम तुरीच्या दरावर झाला आहे. पूर्वी १० हजार रूपये क्विंटल असलेली तूर आता ५ हजार ते ५ हजार ६०० रूपये क्विंटलच्या घरात आहे. या दरात ५० टक्के घट नोंदविण्यात आली आहे. ९ हजार २०० रूपये क्विंटलच्या घरात असलेला चणा ४ हजार १०० ते सहा हजार ८०० रूपये क्विंटलच्या घरात आहे. यामध्ये निम्मी घसरण नोंदविण्यात आली आहे. चार हजार रूपये क्विंटलच्या घरात असलेले सोयाबीन ३२०० ते ३४५० रूपये क्विंटलच्या घरात आहेत. सात हजार रूपये क्विंटलचा मूग ४,७५० रूपये क्विंटलच्या घरात आहे. दर निम्म्यावर येण्याची पहिलीच वेळ कुठल्याही वस्तूचे दर किती वाढावे आणि किती घसरावे याचे ठोकताळे आहेत. मात्र शेतमालासाठी हे सर्व नियम मोडीत काढण्यात आले आहे. यामुळे शेतमालाचे दर घसरण्याची टक्केवारी एक-दोन नव्हेतर ५० टक्केच्या घरात आली आहे. वाढत्या खर्चाच्या तुलनेत घसरणारे दर शेतकऱ्यांना न परवडणारे आहे. मात्र शेतकऱ्यांच्या या स्थितीचा कुठलाही अभ्यास शासनाने केला नाही. यामुळे शेतमालाचे दर ५० टक्के खाली गेले आहे. ही कृषी धोरणातली पहिली दुर्दैवी घटना आहे.