शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

‘एसबीआय’चे १०० ग्राहकसेवा केंद्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 22:01 IST

जिल्ह्यातील सर्वाधिक ग्राहक असलेल्या भारतीय स्टेट बँकेचे १०० पेक्षा अधिक ग्राहक सेवा केंद्र नव्या आर्थिक वर्षापासून बंद पडले आहेत. त्यामुळे जनधनचे खातेदार, विद्यार्थी, रोहयोचे मजूर आणि पेन्शनर्स मंडळी यांना आपले पैसे काढता येणे कठीण झाले आहे. तर केंद्र चालकांवरही बेरोजगारीचे संकट ओढवले आहे.

ठळक मुद्देकोडच नाही : जनधनचे खातेदार संकटात, पेन्शनर्सची अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील सर्वाधिक ग्राहक असलेल्या भारतीय स्टेट बँकेचे १०० पेक्षा अधिक ग्राहक सेवा केंद्र नव्या आर्थिक वर्षापासून बंद पडले आहेत. त्यामुळे जनधनचे खातेदार, विद्यार्थी, रोहयोचे मजूर आणि पेन्शनर्स मंडळी यांना आपले पैसे काढता येणे कठीण झाले आहे. तर केंद्र चालकांवरही बेरोजगारीचे संकट ओढवले आहे.तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेची नाळ राष्ट्रीयकृत बँकांशी जोडण्यासाठी हे केंद्र उघडण्यात आले होते. मात्र बँकेच्या मुंबई कॉर्पोरेट कार्यालयाने या केंद्रांचे कोड १ एप्रिलपासून आकस्मिकपणे बंद केले. त्यामुळे ग्राहक सेवा केंद्रातून कोणतेही व्यवहार होणे अशक्य झाले आहे. त्याचा सर्वाधिक फटका जनधनच्या खातेदारांना बसत आहे. शालेय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध योजनांतील छोट्या रकमा, रोहयोच्या मजुरांची मजुरी, निराधारांचे मानधन, पेन्शनर्सचे निवृत्तीवेतन अशा ग्राहकसेवा केंद्रातून विड्राल करणे सोयीचे जाते. स्टेट बँकेच्या व्यवसाय प्रतिनिधींमार्फत ही योजना ग्रामीण भागात पोहोचली. अटल पेन्शन, जीवन ज्योती, सुकन्या व्यक्तिगत अपघात विमा, शिष्यवृत्ती, सामाजिक अर्थसहाय्य आदी योजनांची माहिती ग्राहकांना मिळत असताना गेल्या वर्षभरापासून ही योजना बंद पाडण्याचा घाट घातला जातोय.जनधन खात्यात व्यवहार वाढले असताना बँकेने आॅक्टोबरपासून राज्यातील साडेपाच लाख खाती ‘होल्ड’ केली आहेत. आता १ एप्रिलपासून ग्राहकसेवा केंद्रांचे कोडच बंद करण्यात आल्याने ग्राहकांची मोठी हेळसांड होत आहे. यवतमाळच्या आर्णी रोडवरील केंद्रात रोज ४० ग्राहक येऊन परत जात आहेत.बुधवारी येथे आलेला श्याम तेलेवार हा विद्यार्थी म्हणाला, मी मूळचा किनवटचा माझे खातेही तेथेच आहे. पण आता मी यवतमाळात शिकतोय. माझ्या खात्यात मेसचे ६०० रुपये जमा झाले, ते विड्राल करायचे आहे. माझ्याकडे एटीएम नाही. पण ग्राहकसेवा केंद्र बंद असल्याने आता मला ते पैसे काढता येत नाही. असे अनेक मजूर, पेन्शनर्स या ठिकाणी येऊन परत जात आहेत. याचा मन:स्ताप सहन करावा लागतो.मुंबईत करणार उपोषणमहाराष्ट्राप्रमाणेच गुजरात, राज्यस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यातील ग्राहक सेवा केंद्रांचेही कोड बंद करण्यात आले आहे. याविरोधात व्यवसाय प्रतिनिधी कल्याणकारी संघटना मुंबईत आंदोलन करणार आहे. येत्या ९ एप्रिल रोजी मुंबईच्या आझाद मैदानात करस्पॉन्डंट वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून उपोषण सुरू करण्यात येणार आहे. या उपोषणात महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, उत्तरप्रदेश आदी राज्यातूनही प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.