शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

सरपणासाठी ग्रामीण महिलांची भटकंती

By admin | Updated: May 23, 2016 02:31 IST

पावसाळ्यात इंधनाची सोय व्हावी म्हणून ग्रामीण महिलांची सरपणासाठी भटकंती आहे. देशात एलपीजी गॅसच्या वितरणाचे जाळे पसरलेले असले,

जंगले झाली विरळ : दगडी कोळशाचा वापर, लाकडांसाठी पायपीट, ग्रामीण भागात सिलिंडर पोहोचलेच नाहीवणी : पावसाळ्यात इंधनाची सोय व्हावी म्हणून ग्रामीण महिलांची सरपणासाठी भटकंती आहे. देशात एलपीजी गॅसच्या वितरणाचे जाळे पसरलेले असले, तरी गरिबीमुळे ग्रामीण महिलांना अद्याप चूल पेटविण्यासाठी सरपणाची गरज असते. सकाळ-सायंकाळी चूल पेटविण्यासाठी ग्रामीण महिलांना दिवसभर वणवण भटकून सरपण गोळा करावे लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येते.देशातील नागरिकांना आता ‘अच्छे दिन‘ची प्रतीक्षा आहे. तथापि ३० टक्के जनता अद्यापही अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांपासून वंचित आहेत. या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी त्यांना प्रचंड आटापिटा करावा लागतो. केंद्र व राज्य शासनाने गरिबीचे उच्चाटन करण्यासाठी अनेक योजना अंमलात आणल्या. मात्र त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ खऱ्या गरजूंना मिळत नाही, अशी नेहमीच ओरड होते. शासनाने गरिबांसाठी अंत्योदय धान्य योजना सुरू केली. यात अतिशय माफक दरात गरिबांना धान्य मिळते. तथापि धान्य शिजविण्यासाठी मात्र अखेर ग्रामीण महिलांना सरपणाचाच सहारा घ्यावा लागतो. अद्याप ग्रामीण भागात सिलिंडर पोहोचलेच नाही. ग्रामीण भागात केवळ मोजक्याच कुटुंबाकडे गॅस सिलिंडर आहे. अन्न शिजविण्यासाठी इंधन म्हणून गॅस, रॉकेल, सरपण व दगडी कोळशाचा वापर केला जातो. सध्या देशातील ७० टक्के घरांत एलपीजी गॅस सिलिंडर पोहोचले आहे. मात्र अद्यापही किमान ३० टक्के कुटुंब इंधन म्हणून रॉकेल व सरपणाचा वापर करत आहे. शहरात बहुतांश घरांत गॅस आहे. कुणाकडे स्टोव्ह आहेत. शहरात सरपणाची उपलब्धता नसते. त्यामुळे सिलिंडर अथवा स्टोव्ह नसलेल्या कुटुंबात रॉकेल व दगडी कोळसा वापरला जातो. वणी परिसरात दगडी कोळसा सहज उपलब्ध होत असल्याने अनेक कुटुंबात या कोळशाचा पाणी गरम करणे आणि शेगडी लावून स्वयंपाकासाठी वापर केला जातो. वणी परिसरात दगडी कोळसा सहज उपलब्ध होतो. अनेक खाणींतून हा कोळसा कोलडेपो अथवा रेल्वे सायडींगवर पोहोचतो. यातून अनेकदा कोळशाची तस्करीही होते. आत्ताही शिरपूर, निळापूर मार्गावर काही ठिकाणी वाहनातून कोळसा उतरविला जात असल्याच्या खुणा आढळून येतात. खाणीलगतच्या गावामध्ये स्वयंपाकासाठी कोळशाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तथापि दगडी कोळसा पेटविल्याने हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. त्यातून सारवण्यासाठी आता काही कुटुंबातील महिला सरपणासाठी झाडेझुडपे शोधतात. ग्रामीण भागात तर बहुतांश कुटुंब इंधन म्हणून लाकडी सरपण व शेणाच्या गोवऱ्यांचाच अजूनही वापर करतात. उन्हाळ्यात हे इंधन गोळा केले जाते. सरपण गोळा करण्याची जबाबदारी महिलांवरच असते. परिणामी ग्रामीण भागातील अनेक महिला उन्हातान्हात काट्या-गोट्यातून वणवण भटकून सरपण व जनावरांचे शेण गोळा करतात. प्रसंगी मोलमजुरी बुडवून, कामधंदा सोडून महिलांना रानावनात सरपणासाठी भटकावे लागते. झाडावर कुऱ्हाडीचा प्रहार करून लाकडे तोडावी लागतात. तोडलेली लाकडांची मोळी डोक्यावर वाहून आणावी लागते. ग्रामीण भागात जनावरांचे शेण शेतीसाठी खत म्हणून उपयोगी पडते. मात्र नाईलाजाने त्याच्या गोवऱ्या बनवून त्या इंधन म्हणून महिलांना वापराव्या लागतात. (कार्यालय प्रतिनिधी)