शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

सरपणासाठी ग्रामीण महिलांची भटकंती

By admin | Updated: May 23, 2016 02:31 IST

पावसाळ्यात इंधनाची सोय व्हावी म्हणून ग्रामीण महिलांची सरपणासाठी भटकंती आहे. देशात एलपीजी गॅसच्या वितरणाचे जाळे पसरलेले असले,

जंगले झाली विरळ : दगडी कोळशाचा वापर, लाकडांसाठी पायपीट, ग्रामीण भागात सिलिंडर पोहोचलेच नाहीवणी : पावसाळ्यात इंधनाची सोय व्हावी म्हणून ग्रामीण महिलांची सरपणासाठी भटकंती आहे. देशात एलपीजी गॅसच्या वितरणाचे जाळे पसरलेले असले, तरी गरिबीमुळे ग्रामीण महिलांना अद्याप चूल पेटविण्यासाठी सरपणाची गरज असते. सकाळ-सायंकाळी चूल पेटविण्यासाठी ग्रामीण महिलांना दिवसभर वणवण भटकून सरपण गोळा करावे लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येते.देशातील नागरिकांना आता ‘अच्छे दिन‘ची प्रतीक्षा आहे. तथापि ३० टक्के जनता अद्यापही अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांपासून वंचित आहेत. या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी त्यांना प्रचंड आटापिटा करावा लागतो. केंद्र व राज्य शासनाने गरिबीचे उच्चाटन करण्यासाठी अनेक योजना अंमलात आणल्या. मात्र त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ खऱ्या गरजूंना मिळत नाही, अशी नेहमीच ओरड होते. शासनाने गरिबांसाठी अंत्योदय धान्य योजना सुरू केली. यात अतिशय माफक दरात गरिबांना धान्य मिळते. तथापि धान्य शिजविण्यासाठी मात्र अखेर ग्रामीण महिलांना सरपणाचाच सहारा घ्यावा लागतो. अद्याप ग्रामीण भागात सिलिंडर पोहोचलेच नाही. ग्रामीण भागात केवळ मोजक्याच कुटुंबाकडे गॅस सिलिंडर आहे. अन्न शिजविण्यासाठी इंधन म्हणून गॅस, रॉकेल, सरपण व दगडी कोळशाचा वापर केला जातो. सध्या देशातील ७० टक्के घरांत एलपीजी गॅस सिलिंडर पोहोचले आहे. मात्र अद्यापही किमान ३० टक्के कुटुंब इंधन म्हणून रॉकेल व सरपणाचा वापर करत आहे. शहरात बहुतांश घरांत गॅस आहे. कुणाकडे स्टोव्ह आहेत. शहरात सरपणाची उपलब्धता नसते. त्यामुळे सिलिंडर अथवा स्टोव्ह नसलेल्या कुटुंबात रॉकेल व दगडी कोळसा वापरला जातो. वणी परिसरात दगडी कोळसा सहज उपलब्ध होत असल्याने अनेक कुटुंबात या कोळशाचा पाणी गरम करणे आणि शेगडी लावून स्वयंपाकासाठी वापर केला जातो. वणी परिसरात दगडी कोळसा सहज उपलब्ध होतो. अनेक खाणींतून हा कोळसा कोलडेपो अथवा रेल्वे सायडींगवर पोहोचतो. यातून अनेकदा कोळशाची तस्करीही होते. आत्ताही शिरपूर, निळापूर मार्गावर काही ठिकाणी वाहनातून कोळसा उतरविला जात असल्याच्या खुणा आढळून येतात. खाणीलगतच्या गावामध्ये स्वयंपाकासाठी कोळशाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तथापि दगडी कोळसा पेटविल्याने हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. त्यातून सारवण्यासाठी आता काही कुटुंबातील महिला सरपणासाठी झाडेझुडपे शोधतात. ग्रामीण भागात तर बहुतांश कुटुंब इंधन म्हणून लाकडी सरपण व शेणाच्या गोवऱ्यांचाच अजूनही वापर करतात. उन्हाळ्यात हे इंधन गोळा केले जाते. सरपण गोळा करण्याची जबाबदारी महिलांवरच असते. परिणामी ग्रामीण भागातील अनेक महिला उन्हातान्हात काट्या-गोट्यातून वणवण भटकून सरपण व जनावरांचे शेण गोळा करतात. प्रसंगी मोलमजुरी बुडवून, कामधंदा सोडून महिलांना रानावनात सरपणासाठी भटकावे लागते. झाडावर कुऱ्हाडीचा प्रहार करून लाकडे तोडावी लागतात. तोडलेली लाकडांची मोळी डोक्यावर वाहून आणावी लागते. ग्रामीण भागात जनावरांचे शेण शेतीसाठी खत म्हणून उपयोगी पडते. मात्र नाईलाजाने त्याच्या गोवऱ्या बनवून त्या इंधन म्हणून महिलांना वापराव्या लागतात. (कार्यालय प्रतिनिधी)