शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

लाल मिरची झोंबू लागली

By admin | Updated: May 10, 2014 00:34 IST

सध्या सर्वत्र लग्नसराईचे दिवस असल्याने लाल मिरचीची मागणी वाढली आहे. परिणामी दर वाढून आता ही मिरची घेणार्‍यांच्या नाकाला झोंबू लागली आहे.

वणी : सध्या सर्वत्र लग्नसराईचे दिवस असल्याने लाल मिरचीची मागणी वाढली आहे. परिणामी दर वाढून आता ही मिरची घेणार्‍यांच्या नाकाला झोंबू लागली आहे. वणी उपविभागात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. आंध्रप्रदेशातील अनेक शेतकरी या उपविभागात येऊन मिरचीसाठी ठेक्याने शेती करतात. प्रतीएकरप्रमाणे ते येथील स्थानिक शेतकर्‍यांची शेती कसतात. ही शेती कंत्राट पद्धतीने केली जाते. वर्ष, दोन वर्षांसाठी आंध्रप्रदेशातील शेतकरी ही शेती करतात. गुढीपाडव्यानंतर ते दाखल होतात. आता तर आंध्रप्रदेशातील अनेक शेतकरी वर्षानुवर्षे उपविभागातच वास्तव्याला आले आहेत. त्यांनी आपले कुटुंबही आणले आहे. शेतातच ते राहात असल्याने त्यांना अधिक उत्पादन घेणे सहज शक्य झाले आहे. लग्नसराईमुळे सध्या मिरची खरेदीला जोर आला आहे. यात गुंटूर, संकरित, भिवापुरी, ज्योती आदी अनेक प्रकारच्या मिरचीचा समावेश आहे. रंगाने लाल आणि तिखट असलेल्या मिरचीला जादा मागणी आहे. अशी मिरची आता बाजारात दाखल झाली आहे. चवीन तिखट व रंगाने लाल असलेल्या मिरचीला जादा मागणी असल्याने विक्रेतेही अशा मिरचीची जादा साठवणूक करतात. उन्हाळ्यात लग्नाप्रमाणेच सामान्य ग्राहकही वर्षरासाठी मिरचीची खरेदी करतात. त्यामुळे विक्रेते सध्या चढ्या दराने मिरचीची विक्री करतात. गेल्या काही दिवसांपासून उपविभागात सतत ढगाळ वातावरण, वादळी पाऊस येत असल्याने मात्र मिरची संकटात सापडली आहे. मिरची ओलसर राहात असल्याने खरेदीदार दराने कचरत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी हिरव्या मिरचीला जादा दर मिळत असल्याने हिरव्या मिरचीचा तोडा करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे सध्या बाजारात हिरवी मिरची मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)