शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

सव्वा हेक्टरात दोन लाखांचे उत्पादन

By admin | Updated: February 27, 2015 01:32 IST

पारंपरिक शेतीला फळपिकाची जोड दिल्यास परंपरेने डबघाईस आलेल्या शेतकऱ्यास आर्थिक आधार मिळू शकतो हे हिवरी येथील शेतकरी शे.रशीद शे.महम्मद यांनी दाखवून दिले आहे.

लोकमत प्रेरणावाटयवतमाळ : पारंपरिक शेतीला फळपिकाची जोड दिल्यास परंपरेने डबघाईस आलेल्या शेतकऱ्यास आर्थिक आधार मिळू शकतो हे हिवरी येथील शेतकरी शे.रशीद शे.महम्मद यांनी दाखवून दिले आहे. कापूस, सोयाबीन या पिकासोबतच १.२० हेक्टरात पपई हे फळपीक घेवून यापासून वार्षिक एक लाख ७५ हजाराचे उत्पन्न त्यांनी मिळविले आहे.शे.रशीद शे.महम्मद यांच्याकडे चार हेक्टर शेतजमीन आहे. ते परंपरेने कापूस, सोयाबीन, गहू या पिकाचे उत्पन्न घेतात. दरम्यान त्यांनी कृषी विभाग आणि आत्मा योजनेंतर्गत फळपिकांची माहिती घेवून त्याबाबतचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी पपई हे पीक घेण्याचे ठरविल्यानंतर सन २०१२-१३ मध्ये १.२० लाख हेक्टरवर लागवड केली. १२ रुपये प्रती झाड याप्रमाणे पपईची १६०० रोपे विकत घेतली. कृषी विभागाने ५० टक्के अनुदानावर ठिंबक सिंचन संच आणि पाच एचपीचा इलेक्ट्रीक मोटर पंप उपलब्ध करून दिला. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत क्षेत्र विस्तार योजनेतून ५० टक्के अनुदानावर किटकनाशके आणि खते उपलब्ध करून दिली. लागवडीनंतर ११ महिन्यांनी पपईच्या काढणीस सुरुवात झाली. १.२० हेक्टरमध्ये एकूण २५ टन इतके उत्पादन झाले. यासाठी एकूण ४० हजार इतका खर्च आला. खर्च वजा जाता प्रती टन सात हजार याप्रमाणे एक लाख २५ हजार इतका निव्वळ नफा त्यांना झाला. पारंपरिक पिकांसोबत पपईतूनही चांगले उत्पन्न मिळाल्याने शे.रशीद शे.महम्मद यांना चार हेक्टर शेतात एकूण तीन लाख ३३ हजार निव्वळ नफा शिल्लक राहिला आहे. कृषी विभागाने फळपिकाबाबत दिलेल्या प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास वाढला. ठिंबक सिंचन संचामुळे पिकांना संरक्षित ओलीत मिळू शकले. त्यामुळेच शेत उत्पादनात प्रगती साधता आली, असे शे.रशीद शे.महम्मद यांनी सांगितले. (वार्ताहर)