शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
3
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
4
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
5
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
6
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
7
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
8
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
9
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
10
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
11
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
12
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
13
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
14
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
15
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
16
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न
17
Kangana Ranaut : "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल
18
पुणे : बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश
19
Video - संतापजनक! राजस्थानमध्ये उद्घाटनापूर्वीच वाहून गेला नवा रस्ता; पावसाने केली पोलखोल
20
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात

आरोग्य सेवेच्या नावाखाली लूट

By admin | Updated: September 9, 2015 02:41 IST

आरोग्य सेवेच्या नावावर रुग्णांना लुटण्याचा गोरखधंदा काही डॉक्टरांनी सुरू केला असून विविध तपासण्या आणि औषधाच्या नावाखाली हजारो रुपये उकळले जात आहे.

स्वप्नील कनवाळे पोफाळीआरोग्य सेवेच्या नावावर रुग्णांना लुटण्याचा गोरखधंदा काही डॉक्टरांनी सुरू केला असून विविध तपासण्या आणि औषधाच्या नावाखाली हजारो रुपये उकळले जात आहे. त्यातच वैद्यकीय क्षेत्रातही कमिशनखोरी सुरू झाल्याने गावखेड्यातील डॉक्टर रुग्णांना शहरातील मोठ्या डॉक्टरांकडे पाठवितात. आणि तेथूनच खऱ्या अर्थाने लूट सुरू होते. खासगी दवाखान्यांचा कारभार सरकारी नियंत्रणाबाहेर असून गोरगरिबांना मात्र पैशाअभावी खासगीत उपचार मिळत नसल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील शासकीय आरोग्य यंत्रणा ढेपाळल्याचा फायदा खासगी डॉक्टर घेत आहे. गावातील बीएएमएस अथवा समकक्ष पदवीधारक डॉक्टरांकडे गेल्यानंतर तो उपचार करतो. परंतु औषधी दिल्यानंतरही रुग्णालया बरे वाटले नाही की तो शहरातील मल्टीस्पेशालिटी अथवा स्पेशालिट डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला देतो आणि येथून सुरू होतो रुग्णाला लुटण्याचा गोरखधंदा. गावातील डॉक्टर संबंधित रुग्णालया चिठ्ठी लिहून शहरातील डॉक्टरांकडे पाठविले जाते. या चिठ्ठीतच सर्व काही दडलेले असते. पाठविलेल्या रुग्णाच्या मोबदल्यात गावातील डॉक्टरला कमिशन दिले जाते. एकदा हा रुग्ण शहरात पोहोचला की, त्या ठिकाणी सर्व प्रथम तपासणीचे २०० ते ३०० रुपये मोजावे लागतात. डॉक्टरांनी तपासल्यानंतर छापील कागदावरील तपासण्यावर खुणा करून डॉक्टर चिठ्ठी रुग्णाच्या हातात देतो. त्यात विविध तपासण्या लिहिलेल्या असतात. एक्स-रे, सोनोग्राफी, रक्त यासह इतरही तपासण्यांचा समावेश असतो. काही रुग्णालयात तर थेट पॅथॉलॉजीचे तंत्रज्ञ हजरच असतात. डॉक्टरांनी चिठ्ठी दिली की त्याच ठिकाणी रुग्णाचे रक्त काढून तपासणीसाठी तत्पर असतात. यात रुग्णाचे ५०० ते हजार रुपये निश्चितच जातात. त्यानंतर तपासण्याचा रिपोर्ट आल्यावर डॉक्टर औषधाची यादी लिहून देतो. या यादीतील औषधी घेताना रुग्णाचे डोळे पांढरे होण्याची वेळ येते. रिपोर्टमध्ये काही आढळल्यास रुग्णाला भरती होण्याचा सल्ला दिला जातो. औषधा पेक्षाही तेथील सेवेचाच पैसा अधिक मोजावा लागतो. एका खोलीचे भाडे दिवसाला एक ते दीड हजार रुपये, डॉक्टरांची फी, नर्सिंग चार्ज आदी करून १५ ते २० हजाराच्या आसपास साध्या तापातही बिल रुग्णाच्या हाती येऊ शकते. गोरगरीब, सर्वसामान्य रुग्ण मोठ्या आशेने खासगी रुग्णालयात येतात. परंतु तेथील फी आणि खर्च पाहून अर्धवट उपचार करून घरी जातात. त्यामुळे धड आजारही बरा होत नाही. शासकीय रुग्णालयात जावे तर तेथे केवळ पांढऱ्या गोळ्याच हातात दिल्या जातात, असे रुग्ण व त्यांचे नातेवाईक सांगतात.