शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

ग्रामपंचायत रणकंदनात पक्ष सक्रिय

By admin | Updated: February 23, 2015 00:10 IST

पंचायतराज व्यवस्थेची पहिली कडी असलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली आहे. तब्बल ४६८ ग्रामपंचातींच्या निवडणुका घेण्यासाठी पहिल्या टप्प्यातील ...

यवतमाळ : पंचायतराज व्यवस्थेची पहिली कडी असलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली आहे. तब्बल ४६८ ग्रामपंचातींच्या निवडणुका घेण्यासाठी पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याच निवडणुकींच्या माध्यमातून पक्ष विस्तारासाठी धडपडत असलेल्या भाजप व शिवसेनेने व्युव्हरचना आखली आहे. वार्ड फॉरमेशनच्या आक्षेपापासून सर्वच गोष्टींवर स्थानिक आमदार व पदाधिकाऱ्यांचे बारीक लक्ष आहे. ऐरवी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांपासून स्वत:ला अलिप्त ठेवणाऱ्या जिल्हा व तालुक्यातील नेत्यांनी रस घ्यायला सुरूवात केली आहे. प्रथमच ग्रामपंचायतीच्या रणकंदात राजकीय पक्ष सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात म्हणजेच एप्रील-मे महिन्यात ४६८ तर दुसऱ्या टप्प्यात जुलै ते डिसेंबर महिन्यात ५२० ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. नवनिर्वाचित आमदारांनी आपल्या समर्थकांचे हात बळकट करण्यासाठी या निवडणुकांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. सत्तेत आलेल्या शिवसेना व भाजपाकडून पक्ष विस्तारासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे. कुणी सदस्यता नोंदणीवर तर कुणाचा शाखा स्थापनेवर भर आहे. यास्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष अजूनही पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले दिसत नाही. गावपातळीवरचे राजकारण पक्षाला बाजुला ठेऊन गटातटात केले जाते. या निवडणुकांमध्ये जिल्हा व तालुक्याची नेते मंडळी जाणीवपूर्वकच हस्तक्षेप करण्याचे टाळतात. यंदा मात्र स्थिती उलट दिसत आहे. वार्ड फॉरमेशनमध्ये आपल्या गटालाच अनुकुल स्थिती निर्माण व्हावी यासाठी थेट नेतेमंडळींनी दबावतंत्राचा वापर सुरू केला. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात आक्षेप वार्ड फॉरमेशन प्रक्रियेवर घेण्यात आले. गाव पातळीवरील कार्यकर्त्यांच्या पाठीशी मोठे नेते असल्याने आता उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी आहे. (कार्यालय प्रतिनिधी)