शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

परीक्षेची चिंता घालविण्यासाठी शाळांमध्ये आता विपश्यनेचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 15:54 IST

विद्यार्थ्यांच्या मनातून परीक्षेची चिंता घालविण्यासाठी आता प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना दररोज विपश्यना साधनेचे धडे दिले जाणार आहेत.

ठळक मुद्देदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणारसमता विभागाच्या उपक्रमासाठी शिक्षण आयुक्त आग्रही

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दहावी, बारावीचे विद्यार्थी प्रचंड चिंताग्रस्त असतात. निकालाच्या काळात दरवर्षी विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रकारही पुढे येत आहेत. त्यामुळ विद्यार्थ्यांच्या मनातून परीक्षेची चिंता घालविण्यासाठी आता प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना दररोज विपश्यना साधनेचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी आधी शिक्षकांनी विपश्यना साधना शिकावी, यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे.शाळेत विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने शिकता यावे, याकरिता विद्या प्राधिकरणाने काही वर्षांपूर्वी ‘मित्र’ उपक्रम सुरू केला आहे. विद्या प्राधिकारणाच्या समता विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत आता विद्यार्थ्यांना विपश्यना साधना शिकविली जाणार आहे. ही ध्यान साधना विद्यार्थ्यांकडून दररोज करवून घेतली जाणार आहे. हा उपक्रम प्रत्येक शाळेत राबविण्याबाबत शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी आधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.आयुक्तांच्या निर्देशानुसार, पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही साधना आवश्यक आहे. त्यासाठी आधी शिक्षकांनी त्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. विद्या प्राधिकरणाच्या मित्र उपक्रमात आजवर १५ हजार शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले. मात्र प्रत्येक शाळेतील किमान एका शिक्षकाने विपश्येनेचे किमान १० दिवसांचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच शाळेत दररोज विद्यार्थ्यांकडून ही साधना करवून घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे शिक्षण आयुक्तांनी राज्य स्तरापासून तालुका स्तरापर्यंत या उपक्रमासाठी नोडल आॅफिसरही निश्चित केले आहेत. समता विभागाचे प्रमुख हे राज्य स्तरावर, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक संस्थेचे प्रमुख हे जिल्हास्तरावर तर पालिकेचे प्रशासन अधिकारी तसेच गट साधन केंद्राचे समन्वयक हे तालुका पातळीवरील नोडल आॅफिसर आहेत. लवकरच शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शाळांमधून दररोज १०-१० मिनिटांची विपश्यना साधना सुरू होण्याची शक्यता आहे.विपश्यनेने होणारे फायदेपरीक्षेची काळजी, चिंता विद्यार्थी पूर्ण आत्मविश्वासाने हाताळू शकतात.या साधनेच्या दैनंदिन सरावाने विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते.मनाची जागृती, सतर्कता वाढते.स्वयंशासन, स्मरणशक्ती, निर्णय क्षमता वाढते.भीती, राग, चिड, उदासीनता कमी होते.अभ्यास आणि खेळासह इतरही उपक्रमांमध्ये सहभाग वाढतो.शिक्षकांमध्येही उत्साह वाढतो. शिक्षक-विद्यार्थी स्नेहभाव वाढतो.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र