शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेची चिंता घालविण्यासाठी शाळांमध्ये आता विपश्यनेचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 15:54 IST

विद्यार्थ्यांच्या मनातून परीक्षेची चिंता घालविण्यासाठी आता प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना दररोज विपश्यना साधनेचे धडे दिले जाणार आहेत.

ठळक मुद्देदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणारसमता विभागाच्या उपक्रमासाठी शिक्षण आयुक्त आग्रही

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दहावी, बारावीचे विद्यार्थी प्रचंड चिंताग्रस्त असतात. निकालाच्या काळात दरवर्षी विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रकारही पुढे येत आहेत. त्यामुळ विद्यार्थ्यांच्या मनातून परीक्षेची चिंता घालविण्यासाठी आता प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना दररोज विपश्यना साधनेचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी आधी शिक्षकांनी विपश्यना साधना शिकावी, यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे.शाळेत विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने शिकता यावे, याकरिता विद्या प्राधिकरणाने काही वर्षांपूर्वी ‘मित्र’ उपक्रम सुरू केला आहे. विद्या प्राधिकारणाच्या समता विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत आता विद्यार्थ्यांना विपश्यना साधना शिकविली जाणार आहे. ही ध्यान साधना विद्यार्थ्यांकडून दररोज करवून घेतली जाणार आहे. हा उपक्रम प्रत्येक शाळेत राबविण्याबाबत शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी आधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.आयुक्तांच्या निर्देशानुसार, पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही साधना आवश्यक आहे. त्यासाठी आधी शिक्षकांनी त्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. विद्या प्राधिकरणाच्या मित्र उपक्रमात आजवर १५ हजार शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले. मात्र प्रत्येक शाळेतील किमान एका शिक्षकाने विपश्येनेचे किमान १० दिवसांचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच शाळेत दररोज विद्यार्थ्यांकडून ही साधना करवून घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे शिक्षण आयुक्तांनी राज्य स्तरापासून तालुका स्तरापर्यंत या उपक्रमासाठी नोडल आॅफिसरही निश्चित केले आहेत. समता विभागाचे प्रमुख हे राज्य स्तरावर, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक संस्थेचे प्रमुख हे जिल्हास्तरावर तर पालिकेचे प्रशासन अधिकारी तसेच गट साधन केंद्राचे समन्वयक हे तालुका पातळीवरील नोडल आॅफिसर आहेत. लवकरच शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शाळांमधून दररोज १०-१० मिनिटांची विपश्यना साधना सुरू होण्याची शक्यता आहे.विपश्यनेने होणारे फायदेपरीक्षेची काळजी, चिंता विद्यार्थी पूर्ण आत्मविश्वासाने हाताळू शकतात.या साधनेच्या दैनंदिन सरावाने विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते.मनाची जागृती, सतर्कता वाढते.स्वयंशासन, स्मरणशक्ती, निर्णय क्षमता वाढते.भीती, राग, चिड, उदासीनता कमी होते.अभ्यास आणि खेळासह इतरही उपक्रमांमध्ये सहभाग वाढतो.शिक्षकांमध्येही उत्साह वाढतो. शिक्षक-विद्यार्थी स्नेहभाव वाढतो.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र