शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

नगरपरिषद हद्दवाढीची गावपुढाऱ्यांत धडकी

By admin | Updated: April 29, 2015 02:30 IST

नगरपरिषदेच्या हद्दवाढीची अधिसूचना जाहीर झाली असून, त्यावर आक्षेपही मागविण्यात आले आहेत.

यवतमाळ : नगरपरिषदेच्या हद्दवाढीची अधिसूचना जाहीर झाली असून, त्यावर आक्षेपही मागविण्यात आले आहेत. तब्बल ११ ग्रामपंचायतींचे विलिनीकरण होणार असल्याने गावपुढऱ्यांमध्ये धडकी भरली आहे. अनेकांनी तर नगरपरिषद कार्यालयात येरझाऱ्या घालायला सुरूवात केली असून, संभाव्य वार्ड रचना कशी राहिल अशी विचारणाही होत आहे. नगरपरिषदेच्या हद्दवाढीमुळे ग्रामपंचायतींचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात होत असलेल्या राजकीय घडामोडीत पूर्णत: थांबून नव्याने नगरपरिषद लढावी लागणार आहे. ग्रामपंचायतींच्या वार्डापेक्षा नगरपरिषदेचा वार्ड हा तुलनेने मोठा असतो. शिवाय ६५ ते ७० सदस्य संख्या असलेल्या नगरपरिषदेमध्ये आपला टिकाव लागणार की नाही अशी धडकी ग्रामीण भागातील पुढाऱ्यांमध्ये भरली आहे. त्यामुळेच २५ एप्रिलपर्यंत ग्रामीण भागातील २६ जणांनी नगरपरिषदेच्या हद्दवाढीवर आक्षेप दाखल केले आहे. या आक्षेपावर अजूनही सुनावणी झालेली नाही. सर्व आक्षेप नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आले आहे. हद्दवाढ झालेल्या भागात सहा महिन्यांच्या आत सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकृत हद्दवाढ होण्या अगोदरच काही ग्रामपंचायत सदस्यांनी वार्डाच्या रचनेचा अंदाज घ्यायला सुरूवात केली आहे. नव्याने समाविष्ठ झालेल्या ग्रामीण भागाची वार्ड फेररचना करूनच येथील निवडणुका होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी ही रचना कशी राहिल याचा अंदाज घेण्यासाठी नगरपरिषदेच्या कामकाजाची संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी ग्रामीण भागातील पुढाऱ्यांनी नगरपरिषद कार्यालयात येरझाऱ्या घालणे सुरू केले आहे. मर्यादित क्षेत्रात काम करून असलेल्या ग्रामपंचायतीतील पुढाऱ्यांना आता विस्तीर्ण अशा नगरपरिषदेत लढावे लागणार असल्याने अनेकांची पाचावर धारण बसली आहे. काही झाले तरी नगरपरिषद हद्दवाढ थांबली पाहिजे असा खटाटोपही अनेकांकडून सुरू आहे. त्यासाठी कोणकोणत्या कायदेशीर बाजू आहेत याचा शोध या गावपुढाऱ्यांकडून घेतला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)