शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

जिल्हा परिषदेत मंत्री-आमदारांची कसोटी

By admin | Updated: February 4, 2017 01:01 IST

राजकीयदृष्ट्या विचार करता जिल्ह्यात भाजपासाठी सर्वाधिक पोषक राजकीय वातावरण तयार झाले आहे.

वातावरण भाजपाला पोषक : सत्तेची सर्वाधिक फौजही भाजपाकडेच, मिनी मंत्रालय काबीज करण्याचे आव्हान राजेश निस्ताने  यवतमाळ राजकीयदृष्ट्या विचार करता जिल्ह्यात भाजपासाठी सर्वाधिक पोषक राजकीय वातावरण तयार झाले आहे. त्याचा फायदा जिल्हा परिषद व पंचायत समित्या ताब्यात घेण्यासाठी भाजपाची नेते मंडळी कितपत उचलू शकतात आणि त्यांना ग्रामीण मतदार किती तारतो, यावर या पक्षाच्या मंत्री व आमदारांची प्रतिष्ठा अवलंबून आहे. जिल्ह्याच्या राजकारणात बहुतांश पैलू हे भाजपाच्या बाजूने झुकलेले आहेत. सर्व काही भाजपाचेच, असे चित्र आहे. सत्तेचा प्रचंड मोठा फौजफाटा भाजपाकडे असल्याने सहाजिकच जिल्हा परिषद पूर्णत: भाजपाच्या ताब्यात राहील, असा अंदाज जनतेतून वर्तविला जात आहे. पालकमंत्र्यांनी भाजपाला चारवरून ४४ जागांवर पोहोचविण्याचे ठेवलेले उद्दीष्ट एवढ्या सर्व राजकीय ताकदीच्या बळावर सहज गाठता येईल, अशी स्थिती आहे. त्यामुळेच जिल्ह्यात भाजपाच्या मंत्री, आमदार व अन्य नेते-पदाधिकाऱ्यांची या निवडणुकीत चांगलीच कसोटी लागणार आहे. ग्रामीण भागात भाजपाचे पाच आमदार असले, तरी या पक्षाचे गाव-खेड्यापर्यंत तेवढे नेटवर्क नाही. त्यामुळे या आमदारांच्या बळावर भाजपाला सत्तेत किती वाटा मिळतो, हे पाहणे महत्वाचे ठरते. या निवडणूकीत आमदारांचे आपल्या मतदारसंघात खरोखरच नेटवर्क किती, हेसुद्धा स्पष्ट होणार आहे. आजच्या घडीला १६ पैकी एकाही पंचायत समितीवर भाजपाचा सभापती नाही. भाजपाच्या नेत्यांना जिल्हा परिषदेसोबतच अधिकाधिक पंचायत समित्यांवर सत्ता काबीज करून आपली ताकद पक्षाला व जनतेला दाखवून द्यावी लागणार आहे. शिवसेनेलाही वर्चस्वाची संधी भाजपासारखीच कमी-अधिक प्रमाणात जमेची बाजू शिवसेनेची आहे. राज्यातील युती सरकारच्या प्रारंभापासूनच सेनेकडे लाल दिवा आहे. सोबतीला यवतमाळ-वाशिम मतदारसंघाची खासदारकीही आहे. लालदिव्याचा लाभ उठवित सेनेने सुरुवातीच्या दोन वर्षात पक्ष विविध अंगांनी मजबूत केला. सेनेचे आधीच गाव-खेड्यापर्यंत नेटवर्क आहे. आता लाल दिवा व खासदारकी असल्याने त्यात आणखी भर पडली. त्यातच सेनेने भाजपाशी उघड पंगा घेतला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व अधिकाधिक पंचायत समित्यांवर सत्ता काबीज करून भाजपाला आडवे करण्याची आपली घोषणा प्रत्यक्षात आणण्याचे आव्हान शिवसेनेच्या नेत्यांपुढे आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा व शिवसेना नेत्यांची खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नोटाबंदीची जखम अन् काँग्रेसची फुंकर भाजपा-सेनेच्या तुलनेत काँग्रेसची ताकद कमी आहे. त्यांच्याकडे केवळ एक लाल दिवा असून त्यालाही घटनात्मक मर्यादा आहेत. मात्र नोटाबंदीमुळे ग्रामीण जनतेचे झालेले हाल व त्यातून भाजपा-सेनेबाबत त्यांच्या मनात निर्माण झालेल्या रागावर फुंकर घालण्याची संधी काँग्रेसकडे आहे. नेत्यांनी गटातटातील भांडणे विसरुन एकदिलाने या निवडणुकीत काम केल्यास जिल्हा परिषदेत आहे त्या जागा राखणे किंवा त्यात आठ-दहा जागांची भर घालणे कठीण नाही. कारण मुळातच सव्वाशे वर्षाच्या या पक्षाची ग्रामीण भागात सर्वदूर खोलवर पाळेमुळे रुजलेली आहे. गावागावात त्यांच्या विचाराचा कार्यकर्ताही आहे. केवळ त्यांना नेत्यांनी विश्वासाने सोबत घेऊन चालणे तेवढे गरजेचे आहे. बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीच्या तोंडाला फेस राष्ट्रवादी काँग्रेस ४२ जागांवर लढत असली, तरी मुळात या पक्षाच्या नेत्यांना आपल्या पुसद, उमरखेड, महागाव या बालेकिल्ल्यातच तोंडाला फेस आला आहे. घरातच भाजपाने सुरुंग लावल्याने हे आव्हान उभे झाले आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत घरातील या नेत्याने आपली उपयोगिता सिद्ध केली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्येही ती सिद्ध करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी बालेकिल्ल्यात किती तग धरणार, हे वेळच सांगेल. पुसद विभागाबाहेर राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही. केवळ चेहऱ्यांच्या बळावर काही जागा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत केवळ पुसदमध्ये राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.