शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
7
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
8
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
9
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
10
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
11
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
12
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
13
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
14
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
15
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
16
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
17
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
18
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
19
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
20
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलच्या डॉक्टरांची ‘कट प्रॅक्टिस’

By admin | Updated: July 8, 2017 00:30 IST

वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील काही डॉक्टरांनी चक्क ‘कट प्रॅक्टिस’ सुरू केल्याने गरीब रूग्णांचा जीव टांगणीला लागला.

तपासणीसाठी खासगीचा सल्ला : रूग्णांची परवड, नाहक आर्थिक भुर्दंड सुरेंद्र राऊत । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील काही डॉक्टरांनी चक्क ‘कट प्रॅक्टिस’ सुरू केल्याने गरीब रूग्णांचा जीव टांगणीला लागला. रूग्णांना विविध तपासण्यांसाठी खासगी रूग्णालयाचा रस्ता दाखविला जात असल्याने गरीब रूग्णांना ‘रोगापेक्षा ईलाज भयंकर’ वाटू लागला आहे. शासकीय रूग्णालयात दाखल रूग्णाला अतिशय महागड्या तपासण्यांसाठी चक्क शहरातील एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या लॅबमध्ये पाठविण्यात येते. तेथून शासकीय रूग्णालयातील संबंधित डॉक्टरांना पद्धतशीर रॉयल्टी मिळत असल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे, तर शासकीय रूग्णालयातील काही डॉक्टरांकडून अनेकदा रूग्णाला महागडी औषधे लिहून दिली जातात. त्यांचा प्रत्यक्षात उपयोग किती, याची पडताळणीच केली जात नाही. रूग्णालयात बाह्यरूग्ण तपासणी विभागात विविध औषध कंपन्याचे प्रतिनिधी हजेरी लावतात. त्यातून रूग्णालयात उपलब्ध औधषांना डावलून अनेकदा रूग्णाला महागडी औषधी ठरावीक दुकानातून खरेदी करण्यास सांगितले जाते. त्वरित आराम पडावा म्हणून बाहेरून औषध लिहून देतो, असे सांगून डॉक्टर रूग्णांच्या असहाय्यतेचा लाभ घेतात. मात्र औषध लिहणाऱ्याच्या नावाने तिकडे ‘कमिशन’ तयार असते. गंभीर रूग्ण रेफर करण्यावरही फिक्सींग केले जाते. त्यासाठी नागपुरातील मोठ्या हॉस्पीटलकडून पायघड्या घातल्या जातात. परिणामी त्याच रूग्णालयात रूग्णाला दाखल करण्याची पद्धतशीर तजवीज केली जाते. त्याकरिता काही विभागातील मशीन बंद असूनही त्या सुुरू करण्याची तसदी घेतली जात नाही. उलट पुरवठादार कंपनी सहकार्य करत नसल्याचे ठेवणीतील उत्तर दिले जाते. यातून मोठी आर्थिक उलाढाल होते. त्यातील ठरावीक ‘रसद’ थेट वरिष्ठांपर्यंत पोहोचत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकप्रकारे या ‘कट प्रॅक्टीस’ला वरिष्ठांकडूनच खतपाणी घातले जात असल्याचे दिसून येते. प्रसूती विभागात दाखल महिलेला एका श्रध्दा नामक डॉक्टरने एलएफटी, केएफटी, मलेरिया, डेंग्यू व सीबीसी तपासणी करण्यासाठी ‘त्या’ मल्टीस्पेशालिटीत जाण्याचा सल्ला दिला. तेथे तपासणी केली नाही, तर संबंधित डॉक्टरकडून रूग्णाला अतिशय हिन वागणूक दिली जाते. यापूवी याच डॉक्टरने प्रसूती झालेल्या महिलेच्या आईला चक्क मारहाण केली होती. तरीही प्रशासनाकडून डॉक्टरची पाठराखण सुरू आहे. असा प्रकार रूग्णालयातील सर्व विभागात कमी-अधिक प्रमाणात सुरू आहे. परिणामी रूग्णाला तब्बल दोन हजार रूपयांपर्यंतचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. औषधांच्या बाबतीतही महागडे अन्ॅटीबायोटीक बाहेरून आणण्यास सांगितले जाते. त्यावर संबंधितांना मोठी ‘मार्जीन’ मिळते. मात्र रूग्ण भरडले जातात. त्यामुळे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असा ठरू लागला आहे. रूग्णसेवेचा आव आणणारे गप्प शासकीय रूग्णालय परिसरात राजकीय पक्षांमध्ये रूग्णसेवेची स्पर्धा लागलेली असते. मात्र त्यांचे या कट प्रॅक्टीसकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. त्यांच्या नेत्यांकडेसुद्धा याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. केवळ रूग्णसेवेचा आव आणून आपण किती दक्ष लोकसेवक आहोत, याची प्रसिद्धी करण्यातच ते धन्यता मानतात. इकडे रूग्णांच्या जीवाशी होणारा खेळखंडोबा त्यांना दिसत आहे. ग्रामीण भागातील गरीब रूग्ण यात भरडले जात असल्याने त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. यातून त्यांची सुटका कोण करणार, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.