शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मराठ्यांनो एकजूट ठेवा, आरक्षण मिळणारच: मनोज जरांगे पाटील

By अविनाश साबापुरे | Updated: December 7, 2023 17:45 IST

उमरखेडच्या जाहीर सभेला लाखोंचा जनसमुदाय

उमरखेड (यवतमाळ) : मराठा समाजाला ७० वर्षात सिस्टीमने घेरुन नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. मराठा समाजाची नोंद असतानाही आरक्षण दिले नाही. आता गरजवंत मराठ्यांचा लढा सुरू झाल्यानंतर ३५ लाख मराठा बांधवांच्या नोंदी आढळल्या. त्यामुळे मराठा बांधवांनो एकजूट राहा. आता सरसकट आरक्षण मिळाल्याशिवाय समाज शांत होणार नाही, असा इशारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

स्थानिक ढाणकी मार्गावरील गो. सी. गावंडे महाविद्यालयाच्या प्रांगणात गुरुवारी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. आपली मुले उच्चशिक्षित होऊन नोकरीवर लागावी, हे प्रत्येक मराठा आईवडिलांचे स्वप्न होते. मात्र मराठ्यांची मुले शेतीभोवती वेदना सांभाळत व्यसनाधीन व्हावी, असेच प्रयत्न आतापर्यंत सरकारकडून होत आले. आता मराठा समाजाची ताकद पाहता २४ डिसेंबर रोजी मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळेलच, असा आशावाद मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. या लढ्यात राजकारण येऊ देऊ नका.

ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणे लावण्याची काम छगन भुजबळकडून होत आहे. मराठा बांधवांनी कुणाच्याही अंगावर जाऊ नये. आंदोलन शांततेच्या मार्गाने केले तर आंदोलनाची ताकद वाढेल. ७० वर्षानंतर आरक्षण निर्णय प्रक्रियेत आपण आता आलोय. त्यामुळे आंदोलनाला कुठेही गालबोट लागू न देण्याचे आवाहन त्यांनी केले. ७० वर्षांपूर्वीच्या नोंदीप्रमाणे आरक्षण दिले असते तर या देशात प्रगत जात म्हणून मराठा समाज नंबर एकवर असता. आता आरक्षण मिळाल्याशिवाय सरकारला सुट्टी देणार नसल्याचेही जरांगे पाटील म्हणाले.

छगन भुजबळ यांना सरकारने आवरावे. त्यांचे उभे आयुष्य लोकांच्या मुंडक्यावर पाय ठेवण्यात गेले. त्यांच्यात कुटूनकुटून जातीवाद भरला आहे. दंगली घडविण्याचा भाषा बोलणारा माणूस, महापुरुषांच्या जाती काढणारा माणूस, हा सज्जन असू शकत नाही, अशी टीका जरांगे पाटील यांनी केली. आपण ओबीसीमधूनच आरक्षण घेणार या भूमिकेवर ठाम असल्याचेही जरांगे पाटील यांनी सांगितले. या सभेचे आयोजन उमरखेड येथील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले होते. सभेसाठी लाखो नागरिकांचा जनसमुदाय उसळला होता. 

सभेपूर्वी रोड शो

सभेपूर्वी सकाळी दहा वाजता उमरखेड शहरातून मनोज जरांगे पाटील यांचा रोड शो करण्यात आला. दुपारी साडेबारा वाजता सभा सुरू झाली. सभास्थळी सातशे ते आठशे स्वयंसेवकाकडून पाणी, खिचडीचे वाटप करण्यात आले. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त होता. 

मुस्लीम समाजाकडून स्वागत

उमरखेड शहरातून सभास्थळी जात असताना मनोज पाटील जरांगे यांचे मुस्लिम समाजाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. या स्वागत समारंभाला मोठ्या प्रमाणात मुस्लिम युवक उपस्थित होते.

छत्रपती चौकात जेसीपीने केले स्वागत 

मनोज पाटील जरांगे यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आगमन होताच उपस्थितांनी चार जेसीपीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. शहरातून जात असताना जरांगे पाटील यांच्या ताफ्याच्या मागे हजारोच्या संख्येने मराठा बांधव होते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील