शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

यवतमाळ ग्रामीण परिसरात सुविधांचा अभाव

By admin | Updated: February 16, 2015 01:54 IST

शहरालगत असलेला भाग मागील ३० वर्षांपासून नगरपरिषद आणि ग्रामपंचायतीमध्ये येत नव्हता. त्याची यवतमाळ ग्रामीण अशी शासन दप्तरी स्वतंत्र नोंद होती.

यवतमाळ : शहरालगत असलेला भाग मागील ३० वर्षांपासून नगरपरिषद आणि ग्रामपंचायतीमध्ये येत नव्हता. त्याची यवतमाळ ग्रामीण अशी शासन दप्तरी स्वतंत्र नोंद होती. दोन वर्षापूर्वीच उच्च न्यायालयाच्या निर्देशावरून हा भाग नगरपरिषदेत समाविष्ठ करण्यात आला आहे. मात्र मूलभूत सुविधा देण्यासाठी स्थानिक पातळीवर ठोस प्रयत्न होत नसल्याने येथील नागरिकांची परवड होत आहे. या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची अनेक वर्षांपासून भीषण समस्या आहे. याशिवाय नाल्या, रस्ते, शाळा, वीज पुरवठा, समाज मंदिर, रुग्णालय अशी कुठलीही अत्यावश्यक सेवा उपलब्ध नाही. तायडेनगर या मुस्लिमबहुल भागातील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेवर मागील आठ महिन्यांपासून शिक्षक दिला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशा एक ना अनेक समस्या या भागात निर्माण झाल्या आहे. यवतमाळ ग्रामीण ही ओळख मिटविण्यासाठी त्याला नगरपरिषदेत समाविष्ठ करण्यात आले. त्यानंतरही येथील समस्या कायम आहेत. नगरपरिषदेत आल्यानंतर पालिका प्रशासनाने येथील समस्या निकाली काढण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार केला नाही. इतर योजना येथे राबविण्यात येतात. या योजनांच्या माध्यमातून इतक्या वर्षांचा बॅक लॉग भरून काढणे शक्य नाही. त्यासाठी ठोण कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे. अनेक वर्ष प्रशासनाच्या लेखी दुर्लक्षित असलेला यवतमाळ ग्रामीणचा परिसर विकासापासून कोसे दूर आहे. दाट लोकवस्ती असल्याने येथे इतर वॉर्डांच्या तुलनेत अधिक साधनसामग्रीची गरज आहे. प्रत्यक्ष समस्या पाहूनच नियोजन करण्याची गरज आहे. यासाठी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने निवेदन देण्यात येतात. (कार्यालय प्रतिनिधी)