शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

इसापूरचे भूकंपमापक यंत्र १५ वर्षांपासून बंद

By admin | Updated: April 27, 2015 02:00 IST

गुजरातमधील भूज, कोयना, बीड एवढेच नाही तर जपान, इंडोनेशियात झालेल्या भूकंपाची नोंद घेणाऱ्या पुसद तालुक्यातील इसापूर धरणावरील ....

ज्ञानेश्वर मुंदे यवतमाळ गुजरातमधील भूज, कोयना, बीड एवढेच नाही तर जपान, इंडोनेशियात झालेल्या भूकंपाची नोंद घेणाऱ्या पुसद तालुक्यातील इसापूर धरणावरील भूकंपमापक यंत्रणा गत १५ वर्षांपासून बंद आहे. जुजबी दुरुस्तीसाठी नाशिकला गेलेले यंत्र अद्यापही परतच आले नाही. नेपाळसह देशात झालेल्या प्रलयंकारी भूकंपानंतर इसापूर धरणावरील या भूकंपमापक यंत्रणेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुसद तालुक्यातील इसापूर येथे पैनगंगा नदीवर उर्ध्व पैनगंगा प्रकल्प आहे. विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील या धरणावर १९९० च्या दरम्यान पाटबंधारे विभागाने भूकंप मापक यंत्रणा उभारली होती. ३०० चौरस फूट आकाराच्या खोलीत पाच लाख रुपये खर्च करून भूकंप मापक मशीन बसविली होती. ही मशीन जपानमधून आणण्यात आली होती. भारतासह जगात अलिकडच्या काळात झालेल्या भूकंपाच्या नोंदी येथील यंत्रावर घेतल्या जात होत्या. जगात कुठेही भूकंप झाला की, त्याची नोंद येथे होत होती. भूकंप केव्हा झाला, कुठे झाला, किती अंतरावर झाला त्याचा केंद्र बिंदू किती आहे. तीव्रता किती याची नोंद होत होती. २४ तास सुरू राहणाऱ्या या मशीनवर दररोज सकाळी विशिष्ट कागद लावून माहिती घेतली जात होती. या ठिकाणी तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली होती. या भूकंप मापकाने गुजरातमध्ये झालेल्या भूज, कोयना धरणातील मुदखेड, जपान, इंडोनेशिया आदी भूकंपाची नोंद घेतली होती. पुणे येथील भूकंपमापक यंत्राच्या तोडीचे हे यंत्र होते. मात्र सुमारे १५ वर्षापूर्वी भूकंप मापक यंत्र अचानक नादुरुस्त झाले. दुरुस्तीसाठी ते नाशिकला पाठविण्यात आले. मात्र ते यंत्र अद्यापही दुरुस्त होऊन परत आले नाही. या यंत्राच्या मोटारमध्ये बिघाड झाल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. त्यावेळी दुरुस्तीसाठी केवळ ५० हजार रुपये खर्च अपेक्षित होता. परंतु याकडे कुणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे इसापूर धरणावरील भूकंपमापक यंत्र दुर्लक्षित झाले. जलसंपदा विभागानेही याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान येथील केंद्रात पाच वर्षापूर्वी चोरी होऊन १२ लाख रुपये किंमतीची यंत्रणा चोरीस गेली होती. या चोरीचाही अद्याप थांगपत्ता नाही. शनिवारी नेपाळसह भारतात झालेल्या प्रलयंकारी भूकंपाने जग हादरुन गेले. शेकडो लोकांचे प्राण गेले. या भूकंपाचे धक्के चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला आदी शहरांनाही जाणवले. इसापूर येथील भूकंपमापक यंत्रणा सुरू असती तर यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाची तीव्रता नेमकी किती होती हे कळू शकले असते.