शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

इसापूरचे भूकंपमापक यंत्र १५ वर्षांपासून बंद

By admin | Updated: April 27, 2015 02:00 IST

गुजरातमधील भूज, कोयना, बीड एवढेच नाही तर जपान, इंडोनेशियात झालेल्या भूकंपाची नोंद घेणाऱ्या पुसद तालुक्यातील इसापूर धरणावरील ....

ज्ञानेश्वर मुंदे यवतमाळ गुजरातमधील भूज, कोयना, बीड एवढेच नाही तर जपान, इंडोनेशियात झालेल्या भूकंपाची नोंद घेणाऱ्या पुसद तालुक्यातील इसापूर धरणावरील भूकंपमापक यंत्रणा गत १५ वर्षांपासून बंद आहे. जुजबी दुरुस्तीसाठी नाशिकला गेलेले यंत्र अद्यापही परतच आले नाही. नेपाळसह देशात झालेल्या प्रलयंकारी भूकंपानंतर इसापूर धरणावरील या भूकंपमापक यंत्रणेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुसद तालुक्यातील इसापूर येथे पैनगंगा नदीवर उर्ध्व पैनगंगा प्रकल्प आहे. विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील या धरणावर १९९० च्या दरम्यान पाटबंधारे विभागाने भूकंप मापक यंत्रणा उभारली होती. ३०० चौरस फूट आकाराच्या खोलीत पाच लाख रुपये खर्च करून भूकंप मापक मशीन बसविली होती. ही मशीन जपानमधून आणण्यात आली होती. भारतासह जगात अलिकडच्या काळात झालेल्या भूकंपाच्या नोंदी येथील यंत्रावर घेतल्या जात होत्या. जगात कुठेही भूकंप झाला की, त्याची नोंद येथे होत होती. भूकंप केव्हा झाला, कुठे झाला, किती अंतरावर झाला त्याचा केंद्र बिंदू किती आहे. तीव्रता किती याची नोंद होत होती. २४ तास सुरू राहणाऱ्या या मशीनवर दररोज सकाळी विशिष्ट कागद लावून माहिती घेतली जात होती. या ठिकाणी तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली होती. या भूकंप मापकाने गुजरातमध्ये झालेल्या भूज, कोयना धरणातील मुदखेड, जपान, इंडोनेशिया आदी भूकंपाची नोंद घेतली होती. पुणे येथील भूकंपमापक यंत्राच्या तोडीचे हे यंत्र होते. मात्र सुमारे १५ वर्षापूर्वी भूकंप मापक यंत्र अचानक नादुरुस्त झाले. दुरुस्तीसाठी ते नाशिकला पाठविण्यात आले. मात्र ते यंत्र अद्यापही दुरुस्त होऊन परत आले नाही. या यंत्राच्या मोटारमध्ये बिघाड झाल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. त्यावेळी दुरुस्तीसाठी केवळ ५० हजार रुपये खर्च अपेक्षित होता. परंतु याकडे कुणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे इसापूर धरणावरील भूकंपमापक यंत्र दुर्लक्षित झाले. जलसंपदा विभागानेही याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान येथील केंद्रात पाच वर्षापूर्वी चोरी होऊन १२ लाख रुपये किंमतीची यंत्रणा चोरीस गेली होती. या चोरीचाही अद्याप थांगपत्ता नाही. शनिवारी नेपाळसह भारतात झालेल्या प्रलयंकारी भूकंपाने जग हादरुन गेले. शेकडो लोकांचे प्राण गेले. या भूकंपाचे धक्के चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला आदी शहरांनाही जाणवले. इसापूर येथील भूकंपमापक यंत्रणा सुरू असती तर यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाची तीव्रता नेमकी किती होती हे कळू शकले असते.