शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारच्या कामांवर यंत्रणेचीच टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 22:27 IST

जलयुक्तशिवारच्या कोट्यवधी रुपयांच्या कामातील मुख्य अडथळा यंत्रणेतील काम करणारा विभागच झाला आहे. ई टेंडरिंग होऊनही अनेक ठिकाणी कामाला सुरुवात झाली नाही.

ठळक मुद्देकामे रखडली : कोट्यवधींचा खर्च मातीमोल

ऑनलाईन लोकमतमहागाव : जलयुक्तशिवारच्या कोट्यवधी रुपयांच्या कामातील मुख्य अडथळा यंत्रणेतील काम करणारा विभागच झाला आहे. ई टेंडरिंग होऊनही अनेक ठिकाणी कामाला सुरुवात झाली नाही. तर दुसरीकडे या कामामुळे जलस्तर कुठेही वाढलेला दिसत नाही. त्यावरील कोट्यवधींचा खर्च मात्र मातीमोल झाला आहे.महागाव तालुक्यात झालेली ४२१ कामांपैकी अपवाद वगळता किती उपयुक्त ठरली, याचा शोध घेणे गरजेचे आहे. तीन-चार कामे एकत्र करुन ई-टेंडरला लावलेली कामे पूर्ण होऊ शकलेली नाही. या कामांबाबत वरिष्ठ गंभीर नसल्याने कोट्यवधींची कामे ठप्प आहे. गावोगाव कामांची मागणी असूनही यंत्रणेकडून कृती आराखड्यात घेण्यात आले नाही. यंत्रणेत समन्वय नसल्यामुळे एरिया कमांडमध्ये सिंचन उपविभागातर्फे ६६ लाखांची कामे अंबोडा येथे करण्यात आली. हा भाग सिंचनाच्या कमांड एरियात येत असल्याने अन्य विभागाने येथे काम घेतले नाही, हे विशेष.गावकऱ्यांची मागणी असूनही तेथे काम सूचविण्यात आले नाही. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याचा ठपका ठेवत वन विभागाच्या तीन अधिकाºयांना महागाव तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. सामाजिक वनीकरण विभागाने नोटीसला उत्तर पाठविले असून रोहयो आणि प्रादेशिक विभागाने अद्याप दखल घेतली नाही. तसाच अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. बाबासाहेब नगर, बोरी, दगडथर, धारेगाव, काळीटेंभी, कासारबेहळ, कासोळा, कातरवाडी, पेढी इजारा, पिंपरी इजारा, शीरमाळ, वाकद येथे जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. परंतु पाण्याचा स्तर उंचावला नाही. नेमकी याच परिसरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.तालुक्यातील या गावांचा पाणी ताळेबंद बघितला असता त्यांना आठ हजार ७१४ सघमी पाण्याची आवश्यकता आहे. जलयुक्तच्या कामामुळे एक हजार ४५५ सघमी पाण्याचा अपधाव अडविण्यात आला आहे, असे असूनही पाणीटंचाई का, हा संशोधनाचा विषय आहे.चौकशी करणे गरजेचेसिंचन विभाग, जिल्हा परिषद लघु सिंचन विभाग, पंचायत समिती व अन्य यंत्रणेकडून करण्यात आलेली जलयुक्तची कामे तपासण्याची गरज आहे. यंत्रणेकडून ई टेंडर झालेली कामे सुरुच करण्यात आली नाही. त्यामुळे वाहून जाणाऱ्या पाण्याला अडविता आले नाही. पर्यायाने तालुक्यात जलयुक्त शिवार योजना राबविताना अपयश आले आणि दुसरीकडे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.