शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
3
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
4
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
5
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
6
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
7
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
8
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
9
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
10
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
11
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
12
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
13
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
14
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
15
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
16
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
17
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
18
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

जलयुक्त शिवारच्या कामांवर यंत्रणेचीच टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 22:27 IST

जलयुक्तशिवारच्या कोट्यवधी रुपयांच्या कामातील मुख्य अडथळा यंत्रणेतील काम करणारा विभागच झाला आहे. ई टेंडरिंग होऊनही अनेक ठिकाणी कामाला सुरुवात झाली नाही.

ठळक मुद्देकामे रखडली : कोट्यवधींचा खर्च मातीमोल

ऑनलाईन लोकमतमहागाव : जलयुक्तशिवारच्या कोट्यवधी रुपयांच्या कामातील मुख्य अडथळा यंत्रणेतील काम करणारा विभागच झाला आहे. ई टेंडरिंग होऊनही अनेक ठिकाणी कामाला सुरुवात झाली नाही. तर दुसरीकडे या कामामुळे जलस्तर कुठेही वाढलेला दिसत नाही. त्यावरील कोट्यवधींचा खर्च मात्र मातीमोल झाला आहे.महागाव तालुक्यात झालेली ४२१ कामांपैकी अपवाद वगळता किती उपयुक्त ठरली, याचा शोध घेणे गरजेचे आहे. तीन-चार कामे एकत्र करुन ई-टेंडरला लावलेली कामे पूर्ण होऊ शकलेली नाही. या कामांबाबत वरिष्ठ गंभीर नसल्याने कोट्यवधींची कामे ठप्प आहे. गावोगाव कामांची मागणी असूनही यंत्रणेकडून कृती आराखड्यात घेण्यात आले नाही. यंत्रणेत समन्वय नसल्यामुळे एरिया कमांडमध्ये सिंचन उपविभागातर्फे ६६ लाखांची कामे अंबोडा येथे करण्यात आली. हा भाग सिंचनाच्या कमांड एरियात येत असल्याने अन्य विभागाने येथे काम घेतले नाही, हे विशेष.गावकऱ्यांची मागणी असूनही तेथे काम सूचविण्यात आले नाही. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याचा ठपका ठेवत वन विभागाच्या तीन अधिकाºयांना महागाव तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. सामाजिक वनीकरण विभागाने नोटीसला उत्तर पाठविले असून रोहयो आणि प्रादेशिक विभागाने अद्याप दखल घेतली नाही. तसाच अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. बाबासाहेब नगर, बोरी, दगडथर, धारेगाव, काळीटेंभी, कासारबेहळ, कासोळा, कातरवाडी, पेढी इजारा, पिंपरी इजारा, शीरमाळ, वाकद येथे जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. परंतु पाण्याचा स्तर उंचावला नाही. नेमकी याच परिसरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.तालुक्यातील या गावांचा पाणी ताळेबंद बघितला असता त्यांना आठ हजार ७१४ सघमी पाण्याची आवश्यकता आहे. जलयुक्तच्या कामामुळे एक हजार ४५५ सघमी पाण्याचा अपधाव अडविण्यात आला आहे, असे असूनही पाणीटंचाई का, हा संशोधनाचा विषय आहे.चौकशी करणे गरजेचेसिंचन विभाग, जिल्हा परिषद लघु सिंचन विभाग, पंचायत समिती व अन्य यंत्रणेकडून करण्यात आलेली जलयुक्तची कामे तपासण्याची गरज आहे. यंत्रणेकडून ई टेंडर झालेली कामे सुरुच करण्यात आली नाही. त्यामुळे वाहून जाणाऱ्या पाण्याला अडविता आले नाही. पर्यायाने तालुक्यात जलयुक्त शिवार योजना राबविताना अपयश आले आणि दुसरीकडे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.