शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

उच्चभ्रू, सुशिक्षितच फसव्या गुंतवणूकीच्या जाळ्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 21:23 IST

आर्थिक गुंतवणूक करताना मिळणाºया मोबदल्याकडे अधिक लक्ष दिले जाते. प्रत्यक्षात गुंतविली जाणारी रक्कम किती सुरक्षित याचे भानच ठेवले जात नाही.

ठळक मुद्दे आर्थिक फसवणुकीची एकामागून एक अनेक प्रकरणे पुढे येत असतानाही डोळे बंद करून गुंतवणूक करणाºयांची संख्याही वाढत आहे.

आर्थिक गुंतवणूक करताना मिळणाºया मोबदल्याकडे अधिक लक्ष दिले जाते. प्रत्यक्षात गुंतविली जाणारी रक्कम किती सुरक्षित याचे भानच ठेवले जात नाही. आर्थिक फसवणुकीची एकामागून एक अनेक प्रकरणे पुढे येत असतानाही डोळे बंद करून गुंतवणूक करणाºयांची संख्याही वाढत आहे. समाजातील सुशिक्षित व उच्चभ्रू घटक या जाळ्यात सर्वाधिक अडकल्याचे पोलिसांकडे असलेल्या प्रकरणातून दिसून येते.कुणाला १८ महिन्यात दुप्पट रक्कम हवी असते, तर कुणाला फार तुटपुंज्या मोबदल्यात एखाद्या प्राईम लोकेशनवर मालमत्ता मिळणार असल्याचे आमिष दाखविले जाते. संस्था किंवा ग्रुप गुंतवणूक करत असून त्यावर तुम्हाला आमच्या व्यवसायात थेट भागिदारी दिली जाईल, असेही दाखविले जाते. या आमिषाचा फास हळूहळू आवळला जातो. त्यासाठीच जवळच्या व्यक्तीचा पद्धतशीरपणे वापर होतो. एखाद्या कार्यालयातील किंवा कुटुंबातील व्यक्ती अशा आर्थिक गुंतवणुकीच्या स्कीम राबविणाºया संस्थेशी जुळली की त्या व्यक्तीच्या माध्यमातून चेन मार्केटिंग राबविली जाते. ही व्यक्ती आपल्या कुटुंबीयांना, मित्रांना भावनिक साद घालून माझ्याकडे पाहून गुंतवणूक कर, काही बरे-वाईट झाल्यास मी जबाबदारी घेईल, अशी हमी देवून कष्टाने जमविलेला पैसा गुंतवणूक करण्यास भाग पाडते.जिल्ह्यात सर्वाधिक फसवणूक झालेल्यांची संख्या मैत्रेय या गुंतवणूक कंपनीकडून तब्बल तीन कोटी रुपयांची गुंतवणूक चार हजार नागरिकांची डुबल्याचे उघड झाले आहे. अजून किमान सात कोटींचे गुंतवणुकदार यात फसल्याचे पोलीस तपासात दिसत आहे.याच पद्धतीने श्रीसूर्या या कंपनीतही ९४ लाख २५ हजारांनी ६५ गुंतवणुकदार अडकले आहेत. समृद्धी प्रा.लि. या कंपनीतही १८० सभासदांचे ७२ लाख रुपये अडकले आहेत. जागृती अ‍ॅग्रो प्रा.लि. या कंपनीत ५० सभासदांचे ८० लाखांपेक्षा अधिकची रक्कम अडकली आहे. तसेच व्याजाच्या लालसेपोटी रायसोनी, आर्यरूप आणि इतरही पतसंस्थांमध्ये फसगत झालेल्यांची आकडेवारी हजारोंच्या घरात आहे. आता तर पॅनकार्ड क्लबच्या माध्यमातूनही नवीन प्रकरणे बाहेर येत आहेत. या प्रत्येकच कंपनी संस्थेकडून आम्ही अतिशय कमी गुंतवणुकीत भरपूर मोबदला देत असल्याचे सांगितले जाते.कायदेशीर पळवाट शोधण्यासाठी प्रत्येकाकडून घेतलेली रक्कम ही ठेवी स्वरूपात न दाखविता गुंतवणूक (शेअर्स) म्हणून दाखविली जाते. यात कुणाला ११ ते १२ टक्के व्याज दिले जाईल, असे आमिष दिले जाते. जागृती अ‍ॅग्रोने तर शेळी पालन उद्योगाच्या नावाखाली शेतकºयाचीच जमीन लीजवर घेऊन तिथे शेळी प्रकल्प उभारला. त्या प्रकल्पावर व्यवस्थापक म्हणून त्याच शेतमालकाला नोकरी दिली. त्यासाठी महिना ४० हजारांचे आमिष दाखविले. नंतर त्याच शेतकºयाकडून या प्रकल्पामध्ये दहा लाखांपर्यंतची गुंतवणूक करून घेतली. अशा विविध पद्धतीच्या प्रलोभनातून या कंपन्या सर्वसामान्य व सुशिक्षित बेरोजगारांना आपल्या जाळ्यात ओढत असतात.शासकीय, निमशासकीय सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारीसुद्धा आपल्या पेन्शनची रक्कम अशा ठगबाजांच्या हाती बिनबोभाटपणे देतात. मैत्रेयच्या गुंतवणुकीत तर सर्वसामान्य कुटुंबातील गृहिणींचा समावेश अधिक आहे. त्यांनी आपल्या जवळच्याच महिलांना मैत्रेयमध्ये गुंतवणुकीसाठी बाध्य केले. २००८-०९ पासून हा गुंतवणुकीचा खेळ सुरू आहे. रक्कम छोटी वाटत असल्याने गुंतवणुकदारही फारसी तसदी घेत नाही. याचाच फायदा घेऊन या कंपन्या नेटवर्क मार्केटिंग, चेन मार्केटिंगच्या माध्यमातून हजारो कोटींची माया जमा करण्यात यशस्वी होतात. आता तक्रारी दाखल झाल्यानंतर अनेकजण आर्थिक गुन्हे शाखेत पैसे परत मिळविण्यासाठी चकरा मारताना दिसत आहे. श्रीसूर्याचे समीर जोशी, जागृती अ‍ॅग्रोचे राज गायकवाड, समृद्धीचे मोतेवार या ठगबाजांकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यानंतरही अनेकांनी या व्यक्तींकडे आपली गुंतवणूक केल्याचे धक्कादायक वास्तवही दिसते.आर्थिक गुन्हे शाखेत २००१ पासूनच्या प्रकरणांचा तपास सुरू आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या प्रकरणांचा तपास पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर, सहायक पोलीस निरीक्षक नितीन पतिंगे, उपनिरीक्षक प्रेमदास आडे, सहायक फौजदार राजू झाडे, दीपक आस्कर, विजय पवार, सुनील बोटरे आदी करत आहेत.निवृत्त अपर जिल्हाधिकारीही अडकले जाळ्यातसेवानिवृत्तीचा पैसा डबल करण्याच्या नादात अपर जिल्हाधिकारीही जागृतीच्या शेळी पालन उद्योगात अडकले. त्यांच्यासोबत बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक, लोकप्रतिनिधीचे स्वीय सहायक हेसुद्धा विविध गुंतवणुकदार कंपन्यांकडून ठगले आहेत. फसवणूक झालेल्यांमध्ये सर्वसाधारण व अशिक्षित व्यक्तींचा समावेश नगण्य आहे. आर्थिक सुबत्ता व काय चूक-बरोबर याचे ज्ञान असलेली व्यक्तीच अशा ठगांच्या गळाला लागलेली दिसून येते.आर्थिक गुन्हे शाखेने जिल्ह्यातील संस्था, पतसंस्था व कंपन्या ज्यांच्याकडून आर्थिक व्यवहार केले जातात, अशा सर्वांना पत्र दिले आहे. शिवाय जिल्हा उपनिबंधकांकडे अशा संस्थांची सविस्तर माहिती मागविली आहे. त्यानंतर प्रत्येक महिन्यात बैठक घेऊन जनजागृती केली जाणार आहे. आर्थिक गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.- दिलीप वडगावकर, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, यवतमाळ